Skip to main content

भोग आणि ईश्वर १५८

भोग आणि ईश्वर  १५८
 
आज रेल्वेचा जिना चढून उतरताना एक गोष्ट जाणवली ती म्हणजे मनाची आणि शरीराची क्षमता ही यावेळी सकाळी उत्तम असते आणि त्यामुळे कोणतंही कार्य वा कर्म हे उत्तमप्रकारे होतं. त्यात आपली योग्य ती ऊर्जा वापरली जाते आणि पुरेश्या सक्षमपणे आणि उत्साहाने आपण ते कार्य पार पाडतो. त्यामुळेच कार्याची विभागणी त्यानुसार करावी , जेणे करून, थोडी कठीण व सक्षमता लागणारी कामं सकाळच्या वेळात करावी 

याउलट संध्याकाळी आल्यावर आपल्याला जास्त श्रम करावे लागतात आणि मन आणि देह यांना अतिरिक्त ऊर्जेची गरज असते.  म्हणून कमी श्रमाची आणि उत्साह चेतना वाढवणारी कामं यावेळी करावीत, अशी सर्वसामान्यपणे विभागणी असावी वा असते. आता यातून आपल्या विषयाकडे वळूया. आपण बरेचदा स्तोत्र, मंत्र, श्लोक पठण करतो. अगदी नित्यनेमाने, प्रतिदिन करतो. यामध्ये काही स्तोत्र मंत्र यांचा म्हणण्याची वेळ, बहुदा स्तोत्रकर्त्यांनी सांगितलेली असते, सहसा ती पाळावी. 

काही स्तोत्र, मंत्र इत्यादी परंपरेने ठराविक वेळी म्हणण्याची प्रथा रूढ झाली आहे. पण म्हणजे त्यामध्ये लवचिकता आहे वा असते. काही स्तोत्र पठणाच्या म्हणण्याच्या वेळेनुसार त्या स्तोत्राचे लाभ जास्त प्रमाणात मिळतात अथवा वातावरणा तील दोष जास्त प्रमाणात दूर होतात. म्हणून ते त्या त्यावेळीच म्हणणं हे योग्य आहे. म्हणजेच एखाद्या स्तोत्राने प्राप्त होणारे व आपण इच्छिलेले लाभ आपल्याला त्या विशिष्ट वेळी म्हटल्याने  नक्कीच अधिक मिळू शकतात. पण यामध्ये एक महत्वाची गोष्ट की, हे सर्व स्तोत्र वा मंत्र  पठण करतेवेळी देह व मन पुरेसं सक्षम असणं जरुरी आहे. 

हे कसं काय साध्य होईल हे जरा बघूया. मुळात आपण स्वतःला जर त्या त्या स्तोत्रासाठी त्या विशिष्ट वेळी म्हणण्याची सवय लावून घेतली असेल तर, ते म्हणताना इतिकर्तव्यता म्हणून हे कार्य न करता, आपण काही सत्कृत्य करत असून, त्यायोगे मनःशक्ती, आत्मशक्ती यांच्या माध्यमातून काही विशिष्ट हेतुप्रीत्यर्थ विशिष्ट शक्तीला आवाहन करत आहोत हे मनात दृढ योजावे. 

त्यायोगे ती शक्ती वा त्या शक्तीची इष्टदेवता जागृत व्हावी हा संकल्प मनात धरून पठण वा वाचन करत आहोत हे मनात ठाम असू द्यावे. आता पहिल्या परिच्छेदाचा काय संदर्भ ते समजून घेऊया. मुळात त्या उदाहरणात सकाळी उत्साह ऊर्जा चैतन्य हे पूर्ण प्रमाणात असतं म्हणून आपण कार्य पुरेश्या क्षमतेने करू शकतो. हाच उत्साह संध्याकाळी कमी होऊन ऊर्जा व शक्ती विभागलेली वा कमी झालेली असते. म्हणून तेच कार्य करायला वेळ व श्रम जास्त लागतात. 

हे आता स्तोत्र मंत्र इत्यादी पठण करण्यावर लागू करून पाहूया. मुळात यात दोन प्रकार आधीच्या परिच्छेदात मी सांगितलेत. एक निहित वा स्तोत्राच्या ठरवून दिलेल्या वेळी म्हणायची स्तोत्र, मंत्र इत्यादी आणि तशी कोणतीही विशिष्ट वेळ निहित नसलेली, पण परंपरेने म्हटली जाणारी. आता दुसऱ्या प्रकारात येणारी स्तोत्र वा मंत्र हे ठराविक वेळीच म्हणावेत असं काही रूढ नसल्याने, त्या पठणाला आपण आपल्या मनाच्या, देहाच्या व चैतन्याच्या पूर्ण क्षमतेने म्हणता येईल अशा वेळी पठण करावे. 

सहसा अशी वेळ ही सकाळी उठल्यावर शुचिर्भूत झाल्या नंतरची असावी वा असू शकते. अश्या वेळी म्हणण्यास थोडी कठीण, पूर्ण क्षमता व एकाग्रता लागणारी स्तोत्र, पठण करावीत. जेणेकरून त्यात, मन पूर्णपणे एकाग्र होऊन, उत्पन्न होणाऱ्या लहरी व कंपनं ही योग्य क्षमतेची असतील. 

ज्यामुळे आपल्याला त्या स्तोत्र व मंत्र इत्यादीमागील उद्देशाप्रत, जाता येईल आणि स्तोत्र व मंत्र कर्त्याचा उद्देश सफल होईल. कारण सर्वाचं सार शेवटी मन आणि त्यातून उत्पन्न लहरी इष्टदेवते पर्यंत पोचणं हा आहे, म्हणून पूर्ण एकाग्रता ज्यावेळी असेल वा होऊ शकेल, तेंव्हाच ही स्तोत्र व मंत्र म्हणावेत. म्हणजे आतील चैतन्याचा लाभ मिळेल आणि आत्मसंतुष्टता लाभेल. 

हाच विषय उद्या पूर्ण करूया. 

नामात रहा, साधनेत रहा, विधात्याचा कृपाप्रसाद कधी आपल्यापर्यंत  पोचेल हे विधातासुद्धा जाणत नाही. भेटूया उद्याच्या भागात पुन्हा एकदा.    

अजूनही ज्यांना भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून  वा फोन करून संपर्क करावा. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०७/०५/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...