Skip to main content

अथर्वशीर्षातील मय आणि श्रीगणेश - लेख १

अथर्वशीर्षातील मय आणि श्रीगणेश - लेख १ 

त्वं वाङ्‍मयस्त्वं चिन्मय:।
त्वमानंदमसयस्त्वं ब्रह्ममय:।
त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि।
त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि।
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि।।4।।

वाङ्मय, चिन्मय, आनंदमय, ब्रह्ममय, ज्ञानमय, विज्ञानमय

या सर्व शब्दात मय हा शब्द समान आहे. या शब्दाने श्रीगणेशाची व्याप्ती, महती आणि कीर्ती अधोरेखित केली गेली आहे. तरीही या शब्दांचे सखोल विश्लेषण करून खालील निरूपण मांडत आहे. 

गणपती हा विश्वात्मक देव आहे. श्रीगणेशाला सृजन शीलता, अर्थात creativity,  साहित्य, कल्पनाविश्व, कला आणि उपलब्ध ज्ञानातून व मार्गाने निर्मिती, अश्या अनेक कलात्मक गोष्टींचा निर्माता म्हटलं जातं. कलेचा, विद्येचा,, शास्त्रांचा, साहित्याचा, ज्ञानाचा, इतकंच काय तर विज्ञानाचा रचयिता किंवा आद्य आणि अंत म्हटलं जातं.

यामध्ये एक मेख दडलेली आहे. आद्य म्हणजे दोन अर्थ. एकतर ज्याने या कला, विद्या, ज्ञान इत्यादीं निर्माण केल्या, असा किंवा त्याच्यापासून या कला, विद्या, ज्ञान इत्यादी निर्माण झाल्या असा. म्हणजेच या सर्व ज्ञान निर्माण केलेला, अर्थात या सर्व ज्ञानाचं मूळ असलेला  त्वं मूलाधार: स्थितोसी नित्यम्,  म्हणजे जिथे मुळाचा आधारच आहे तिथे सर्वच गोष्टींचं उगमस्थान या श्रीगणेशापासूनच सुरू होतं हे अध्याहृत अर्थात obvious आहे. आणि अंत म्हणजे या सर्व ज्ञानाचा शेवट श्रीगणेशाला जाणण्यापर्यंत जाईल, हे नक्की.

म्हणजेच एक फक्त ज्ञान या शब्दात वागङ्मय अर्थात साहित्य, काव्य, लेखन, वक्तृत्व, presentation अर्थात सादरीकरण या सर्वांच्या अनेक ज्ञात आणि आता अज्ञात, पण भविष्यात तांत्रिक प्रगतीमुळे पुढे निर्माण होणाऱ्या सर्व कलांचा आदी हा ईश्वर आहे.  त्वं ज्ञानमयो. मय म्हणजे व्याप्त. या व्याप्त शब्दात अनंत काळापर्यंत येणाऱ्या सर्व ज्ञानाच्या प्रकारांचा समावेश आहे. म्हणजेच काळाच्या उदरात दडलेली ज्ञानाची अजून कित्येक रहस्ये या लंबोदर गजाननाच्या बुद्धिभांडारात सुप्तावस्थेत आहेत.

म्हणजेच येणाऱ्या काळातील कित्येक ज्ञानगंगाचा उगम आज निद्रिस्त असला तरी योग्यवेळी त्या गंगा आपल्या समोर नक्की येतील. आता यामध्ये ज्ञानाची विभागणी करून विधायक ज्ञान गणेशाचं आणि विध्वंसक ज्ञान असुरी शक्तींनी निर्माण केलेलं असा काही भेद अभिप्रेत वा अपेक्षित आहे का. तर नक्कीच नाही. कारण ज्ञान हे ज्ञान आहे आणि त्याचा योग्य आणि मर्यादित वा अयोग्य आणि अमर्याद वापर हा मानवी बुद्धीच्या वापरावर आहे.

तिथे आत्मप्रेरणा, माया, वासना, संमोहन, सारासार विचार, विवेक व अविवेकी अमर्याद वागणूक हे सर्व मानवी बुद्धीच्या आवाक्यात श्रीगणेशाने किंवा विधात्याने आणून ठेवलं. म्हणजे योग्य वापर योग्य परिणाम व अयोग्य वापर विपरीत परिणाम हे समीकरण रूढ आणि दृढ असल्यामुळे, त्या त्या गोष्टींचे परिणाम मर्त्य जगत,  वेगवेगळ्या प्रकारे व वेगवेगळ्या प्रमाणात भोगणारे हे नक्कीच. 

म्हणून ज्ञानाचा उद्गाता आणि आरंभ श्रीगणेश असूनही परिणामांचा जनक मानव आहे, हे नक्की. म्हणजेच खरतर वाङ्मय आणि अवाङ्मयीन ज्ञान या सर्वांचा उगम आणि कर्ता धर्ता श्रीगणेश आहे. मय म्हणजे तो या ज्ञानाने भरून, पुन्हा त्यावर दशांगुळे उरला आहे. किंवा  ज्ञान व वाङ्मय जे आपल्याला ज्ञात आहे आणि पुढे ज्ञात होईल, ते श्रीगणेशाच्या कल्पनेतील ज्ञानाच्या काही अंशमात्र असेल, इतकी व्याप्ती, श्रीगणेशाच्या ठायी असलेल्या ज्ञानाची, कल्पनातीत व अमर्याद आहे. 

अर्थातच ज्याच्या उदरात पूर्ण ब्रह्मांड सामावलेलं आहे, त्याच्याकडील  ज्ञानाची कल्पना करणं, मानवी आकलन शक्तीच्या पलीकडील गोष्ट आहे. वास्तविक ज्ञानाच्या कक्षा, अर्वाचीन काळात रुंदावल्या, हा आपला पाश्चात्यी समज, चुकीच्या शिक्षण पद्धतीमुळे दृढ करून देण्यात आला. जे ज्ञान आपल्याकडे प्राचीन व पुराण काळा पासून मन्त्र व काही प्रमाणात तंत्र, या रुपात अस्तित्वात होतं, तेच यंत्र रुपात विकसित करून मांडण्याचं कार्य पाश्चात्यांनी केलं, हे नक्की. 

पण त्यामुळे जे ज्ञान प्राप्त करण्यासाठी तप साधना, धारणा इत्यादी करावं लागायचं, ते सहजी कोणाच्याही हाताला प्राप्त झाल्यामुळे, सद्यस्थितीसारखी स्थिती वारंवार निर्माण होण्याचे संकेत, आताचा काळ दर्शवतो. त्यामुळे प्राचीन ऋषीमुनींनी हे ज्ञान व त्यामागचं पावित्र्य का जपलं असेल याची कल्पना, आता आली असेल.

अर्थात त्याकाळी अश्या प्रकारचा गैरवापर होत नव्हता असं नाही, पण ते हस्तांतरित करताना प्राप्तकर्त्याचं तपोबल तितक्याच प्रमाणात खर्ची होऊन, मग ते त्यांच्या प्रत पोचत होतं आणि तरीही गैरवापर झाल्यास देणाऱ्या कडे त्याची शिक्षा करण्याची व ते ज्ञान काढून घेण्याची पात्रता आणि बळ असायचं. 

हा विषय खूप गहन व विस्तारित असल्याकारणाने यावर चरचा उद्या सुरू ठेवू. 

जय श्रीगणेश !!🌷🌷🙏🙏

©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१५/०५/२०२१

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...