Skip to main content

भोग आणि ईश्वर १६१

भोग आणि ईश्वर  १६१

काल म्हटल्याप्रमाणे अनेक प्रकारच्या अनिष्ट व नकारात्मक लहरी, ज्या अनेक माध्यमातून व अनेक कारणांनी उत्पन्न होतात, त्या सर्व अवकाशात वा अंतराळात किंवा ब्रह्मांडात एकत्र होत जातात आणि अश्या तर्हेने एकत्र होत गेलेल्या लहरी, ज्यावेळी पक्व होऊन फल देण्यायोग्य होतात, त्यावेळी त्या सर्व एकत्रितपणे उलट प्रवासाला निघतात. अश्या लहरींचा एकत्र परिणाम हा प्रचंड प्रमाणात असतो, म्हणजेच magnifying effect असतो. 

कारण अर्थातच समूहाची ताकद व मानसिकता यांना सुद्धा लागू होते. त्यामुळेच त्यांची विध्वंसक शक्ती अमर्याद असते. त्यांच्या परिघात येणाऱ्या सर्व प्रदेशाला व्यापण्याची व त्या सर्व परिसरात वातावरण गढूळ करण्याची क्षमता, त्यांच्या ठायी असते. अर्थातच त्यांची भेदकता, संहारकता त्यांच्या निर्माण होण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे. म्हणूनच एखादी लाट एखाद्या प्रदेशावर येत नाही किंवा आली तरी फार विध्वंस करत नाही.

या अश्या सामूहिक विध्वंसक लाटेमध्ये समाजाचा, विश्वाचा बराचसा भाग होरपळून निघतो. यात अनेक जण, कुटुंबच्या कुटुंब वा कुटुंबातील अनेकजण भक्ष्य होतात आणि ग्रासले जातात. अश्या प्रकारच्या सामूहिक लाटेमध्येसुद्धा एक सूत्र लक्षात घेण्यासारखं आहे. मुळात या उलट प्रवासाने आलेल्या लहरी विशिष्ट परिस्थिती निर्माण करतात, ज्यायोगे व्यापक संहार होईल. ही पण एकप्रकारे इष्ट विरुद्ध अनिष्ट लहरींची लढाईच असते. 

यामध्ये या अनिष्ट लहरी नकारात्मक, विध्वंसक, विखारी मनाचा ठाव घेऊन, त्यांना विध्वंसक वातावरण निर्माण करायला उद्युक्त करतात. त्यांच्याकडून या प्रकारच्या युद्ध वा तत्सम सामूहिक आपत्तीला पोषक वातावरण व तयारी करून घेऊन, योग्य वेळ येताच, त्या विध्वंसक बुद्धीचा वापर करण्याची माया निर्माण होते.

माया आपला खेळ दाखवून निघून जाते. कारण खेळ सुरू झाला की मायेचं कार्य सुरू होतं. इथे मायेचा पडदा इतका गडद होतो की, कमजोर मनाचे व कमजोर श्रद्धेचे यात अचूक वेधले जातात. कारण मायेच्या माध्यमातून लहरींचा हा खेळ अविरत सुरूच असतो. फक्त त्याला पोषक वातावरण मानवी मनातील असुर शक्ती, आपसूक तयार करून देतात. 

सुष्ट आणि दुष्ट शक्तींचा विनाश, विध्वंस विरुद्ध सृजन, निर्मितीचा हा खेळ, आपले रंग सहसा व्यक्तिगत पातळीवरच जास्त दाखवतो. परंतु अश्या प्रकारे सामूहिक वा क्वचित वैश्विक पातळीवर त्यांचे रंग, ठराविक कालांतराने दिसत राहतात. पण यामध्ये अडकणाऱ्यांच्या कर्मभोगानुसारच, त्यांना याची क्षती अर्थात नुकसान वा परिणाम भोगायला लागतो. कर्मगती हीच सर्व बाबतीत श्रेष्ठ असल्याकारणाने या शक्तींच्या व्याप्तीत वा परिघात येऊनही वाचणारे वा सुखरूप राहिलेले किंवा कमी क्षती पोचलेले लोकही या वादळात वा लाटेत पहायला मिळतात. 

यामध्ये ज्यांच्या प्रारब्धानुसार जशी गती लिहिली आहे, वा असेल, त्यानुसार, त्यांना यात सहभागी व्हावेच लागते. त्याचप्रमाणे ज्यांना प्रारब्धानुसार  यातून सुखरूप बाहेर पडायचे वा पोचायचे असेल, त्यांना या चक्रात सापडूनही,  उचित वेळी मदत मिळण्याची व्यवस्था त्यांच्या कर्मगतीनुसार ईश्वरी व्यवस्था अर्थात नियती वा विधाता उपलब्ध करून देतात, हे ध्यानात घ्यावे. 

अश्या आपत्तीत परिणाम, फल, पुण्यई, साधना, कर्मगती व सद्गुरूंचं महत्व यावर उद्याच्या भागात चर्चा करूया. तोपर्यंत नाम घ्या, साधना करत रहा, आपल्या आत्म्याच्या पुढील सुखरूप प्रवासाची व्यवस्था हा देह आहे तोपर्यंतच करता येते, ती व्यवस्था करत रहा. कारण मानवी देहाची निर्मिती त्यासाठी आहे. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  "भोग आणि ईश्वर भाग १" हे  ज्यांना पुस्तक हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून  वा फोन करून संपर्क करावा. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१०/०५/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...