गोग्रासवाडी (डोंबिवली) १२
त्या वाडीतल्या, चाळीतल्या आणि त्या चार चाळींच्या मधल्या मैदानात तासचे तास अनेक खेळ खेळणं हे नित्याच झालं शाळेतून आल्यावर रोज संध्याकाळी अनेक खेळ खेळले जात होते. सर्व मिळून ३५ ते ४० वेगवेगळ्या वयाची आम्ही मुलं अनेक खेळ खेळत एकत्र असायचो. अगदी संध्याकाळी अंधार होई पर्यंत खेळ चालायचे. अर्थात अंधार पडल्यानन्तर परवजा म्हणून मग गप्पा मारायला चाळीत जमायचो.
त्यात दिवसभर झालेल्या खेळातील घडलेल्या चुका वा भांडण यावर चर्चा व्हायची, किंवा इतर गप्पा होत असत. वेगवेगळ्या वयाची आम्ही मुलं अगदी गुण्यागोविंदानं खेळत खेळत वाढलो. भांडलोसुदधा पण ते खेळातल्या खेळात विसरून पण जायचो. कधीही कोणतही भांडण फार ताणल्याचं आठवत नाहीये. कोणत्याही भांडणाच रूपांतर कधीही मतभेदांमध्ये झाल्याच आठवत नाही. कदाचित त्या वयाचा परिणाम असेल की मन पुरेसं लवचिक असल्यामुळे पटकन विसरुन लगेच पुढे जाणं हा एक सद्गुण त्यावेळी सर्वांच्यात होता. कदाचित ही एक गोष्ट मोठ्या माणसांनी शिकावी अस आज पण वाटतय.
शाळेतल्या त्या जगात वाडी म्हणजे वेगळं जग होत, कसलीही चिंता, काळजी काहीही नसल्याने वा आमच्या पर्यन्त पोचत नसल्यामुळे असेल. खेळात काही ग्रुप्स असले तरी ते त्यावेळी समवयस्क असलेल्या मुलांचे त्या त्या वेळी पडलेले ग्रुप्स असतील. त्याचप्रमाणे टीम पण होत्या खेळानुसार आणि वेळेनुसार पडलेल्या.
या जगात प्रत्येक गोष्टीला जस कुठल्या ना कुठल्या तरी वळणावर वेगळ्या वाटेवर जावंच लागतं. तसच या गोग्रास वाडीतल्या दिवसांना दुसऱ्या वळणावर जावंच लागलं. साधारण जून जुलै १९८१ मध्ये वडिलांच्या आजारपणामुळे चाळीतली जागा सोडावी लागली. दहावीच्या वर्गात होतो. नवीन घेतलेली जागा जवळच होती गोग्रासवाडीतच. पण वडिलांच्या आजारपणामुळे आलेल्या परिस्थितीने अचानक कमी वयात मॅच्युरिटी आली. त्यामुळे खेळ, वाडीत जाण बंद झालं ते कायमचं.
नन्तर आयुष्याने अनेक रंग दाखवले. शिक्षण, नोकरी लग्न , संसार यात गत काळातील सुवर्णक्षणांना मुकलो तो कायमचंच. पण या लेखमालेच्या निमित्ताने त्या सर्व आठवणींना उजाळा मिळाला. कदाचित माझ्या सारखेच गोग्रासवाडीत राहिलेले व राहत असलेले या सर्वांना एक पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला असेल तर ह्यासारखा दुसरा आनंद नाही. आज व्हाट्सअप्प वर त्याच सर्व मित्रांचा ग्रुप आहे. रोज भेटतो वर्चुअल जगात. काही क्षण छान वाटत. पण ती शान, ती मजा, ती गोडी, ती जान कशातच नाही. कदाचित त्या व्हाट्सअप्प ग्रुपवरील माझ्या मित्राना हे गोग्रासवाडीवर लिहिलेले लेख वाचून मागे गेल्यासारख वाटलं असेल.
असो. लोभ आहेच तो असाच माझ्या लेखनावर राहावा, हीच विनंती
समाप्त
© लेखन : प्रसन्न आठवले
१०/०८/२०१८
त्या वाडीतल्या, चाळीतल्या आणि त्या चार चाळींच्या मधल्या मैदानात तासचे तास अनेक खेळ खेळणं हे नित्याच झालं शाळेतून आल्यावर रोज संध्याकाळी अनेक खेळ खेळले जात होते. सर्व मिळून ३५ ते ४० वेगवेगळ्या वयाची आम्ही मुलं अनेक खेळ खेळत एकत्र असायचो. अगदी संध्याकाळी अंधार होई पर्यंत खेळ चालायचे. अर्थात अंधार पडल्यानन्तर परवजा म्हणून मग गप्पा मारायला चाळीत जमायचो.
त्यात दिवसभर झालेल्या खेळातील घडलेल्या चुका वा भांडण यावर चर्चा व्हायची, किंवा इतर गप्पा होत असत. वेगवेगळ्या वयाची आम्ही मुलं अगदी गुण्यागोविंदानं खेळत खेळत वाढलो. भांडलोसुदधा पण ते खेळातल्या खेळात विसरून पण जायचो. कधीही कोणतही भांडण फार ताणल्याचं आठवत नाहीये. कोणत्याही भांडणाच रूपांतर कधीही मतभेदांमध्ये झाल्याच आठवत नाही. कदाचित त्या वयाचा परिणाम असेल की मन पुरेसं लवचिक असल्यामुळे पटकन विसरुन लगेच पुढे जाणं हा एक सद्गुण त्यावेळी सर्वांच्यात होता. कदाचित ही एक गोष्ट मोठ्या माणसांनी शिकावी अस आज पण वाटतय.
शाळेतल्या त्या जगात वाडी म्हणजे वेगळं जग होत, कसलीही चिंता, काळजी काहीही नसल्याने वा आमच्या पर्यन्त पोचत नसल्यामुळे असेल. खेळात काही ग्रुप्स असले तरी ते त्यावेळी समवयस्क असलेल्या मुलांचे त्या त्या वेळी पडलेले ग्रुप्स असतील. त्याचप्रमाणे टीम पण होत्या खेळानुसार आणि वेळेनुसार पडलेल्या.
या जगात प्रत्येक गोष्टीला जस कुठल्या ना कुठल्या तरी वळणावर वेगळ्या वाटेवर जावंच लागतं. तसच या गोग्रास वाडीतल्या दिवसांना दुसऱ्या वळणावर जावंच लागलं. साधारण जून जुलै १९८१ मध्ये वडिलांच्या आजारपणामुळे चाळीतली जागा सोडावी लागली. दहावीच्या वर्गात होतो. नवीन घेतलेली जागा जवळच होती गोग्रासवाडीतच. पण वडिलांच्या आजारपणामुळे आलेल्या परिस्थितीने अचानक कमी वयात मॅच्युरिटी आली. त्यामुळे खेळ, वाडीत जाण बंद झालं ते कायमचं.
नन्तर आयुष्याने अनेक रंग दाखवले. शिक्षण, नोकरी लग्न , संसार यात गत काळातील सुवर्णक्षणांना मुकलो तो कायमचंच. पण या लेखमालेच्या निमित्ताने त्या सर्व आठवणींना उजाळा मिळाला. कदाचित माझ्या सारखेच गोग्रासवाडीत राहिलेले व राहत असलेले या सर्वांना एक पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला असेल तर ह्यासारखा दुसरा आनंद नाही. आज व्हाट्सअप्प वर त्याच सर्व मित्रांचा ग्रुप आहे. रोज भेटतो वर्चुअल जगात. काही क्षण छान वाटत. पण ती शान, ती मजा, ती गोडी, ती जान कशातच नाही. कदाचित त्या व्हाट्सअप्प ग्रुपवरील माझ्या मित्राना हे गोग्रासवाडीवर लिहिलेले लेख वाचून मागे गेल्यासारख वाटलं असेल.
असो. लोभ आहेच तो असाच माझ्या लेखनावर राहावा, हीच विनंती
समाप्त
© लेखन : प्रसन्न आठवले
१०/०८/२०१८
Comments
Post a Comment