Skip to main content

भोग आणि ईश्वर १६६

भोग आणि ईश्वर  १६६

सद्गुरू, साधना आणि 'स्व'ची आहुती ही त्रिसूत्री सांभाळली की चवथा स अर्थात समाधान हा निश्चित प्राप्त होतो. पण समाधान तर अनेक गोष्टींपासून प्राप्त होतं. मग नक्की आपण अध्यात्मिक वाटेवर का जावं, या समाधानासाठी, याचा शोध घेऊया. 

मुळात समाधानाचं वर्गीकरण होईल का,जेणेकरून हा विषय ,समजून घ्यायला, थोडं सोप्प होईल. समाधान हे ढोबळमानाने, मुख्य दोन प्रकारचं असतं. एक तात्पुरतं समाधान आणि एक कायमस्वरूपी समाधान. हे वर्गी करण मुख्यतः ते कोणत्या वस्तूपासून मिळतं, त्यावर आधारित आहे. तात्पुरतं समाधान हे फार काळ न टिकणारं समाधान आहे आणि कायमस्वरूपी समाधान हे अनंत काळापर्यंत टिकतं.

समाधानात अजून तीन उपप्रकार आहेत, ते म्हणजे शारीरिक मानसिक आणि आत्मिक समाधान. या तिन्ही नावावरून अंदाज येईल, तो म्हणजे ऐहिक समाधान हे शारीरिक व मानसिक प्रकारात येतं. भौतिक सुखाच्या गरजा या मुख्यतः शारीरिक व मानसिक समाधान देतात. एखादा चांगला पदार्थ खाण्यात आला, एखादं उत्तम फळ जसं आंबा खाल्ला, मेजवानी झोडली की मिळणारा आनंद आणि समाधान अवर्णनीय असतो. मुळातच आनंद आणि समाधान हे खूपदा एकाच अर्थाने वापरले जाणारे शब्द आहेत.

पण तरीही या दोन्ही समान संज्ञा नाहीत. एखादी वस्तू, व्यक्ती प्राप्त झाली की एक प्रकारचा आनंद मिळतो.  पण त्यामागे समाधान येईलच असं नाही.किंवा समाधान प्राप्त झालं, तरीही त्यानंतर रुखरुख लागून, त्या समाधानाची जागा अजून लोभ आणि मोह ह्या दोन गोष्टी घेतील. म्हणजे मिळालेलं समाधान तात्पुरतं असेल आणि अतृप्ती त्याची जागा घेईल. म्हणजेच तृप्ती आणि अतृप्ती असा नित्य खेळ सुरू होईल.

एकूणच जीवनप्रवास बघितला तर हा तृप्ती आणि अतृप्तीचा खेळ आहे. काही वस्तू वा गोष्टी या शारीरिक गरजा म्हणून आल्या. जसं अन्न भुकेसाठी, जल तहान भागवण्यासाठी याप्रमाणे शारीरिक भुकेसाठी त्या त्या गोष्टी प्राप्त करण्या साठी माणूस नित्य धडपड करू लागला. यामध्ये सुद्धा आपल्या वासना, त्या शमवण्या साठी त्या त्या वस्तूची, गोष्टींची व व्यक्तींची गरज भासत गेली. शारीरिक गरजा व भूक हे सतत नित्य उत्पन्न होणारं नैसर्गिक चक्र असल्या कारणाने आणि त्यांची गरज भागवणं हे मुख्य कर्तव्य असल्यामुळे, मानवाने अग्रक्रम त्या वासनापूर्तीला दिला, जो एका अर्थी संयुक्तिक आहे. 

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यात अर्थ आणि काम यांना प्राधान्य प्राप्त होत गेलं. खरतर मानवाला विचार, मन या अतिरिक्त इंद्रियांची सोय भगवंतांनी यासाठीच दिली की, मानव त्याचा वापर करून आपल्या कमीतकमी गरजांवर लक्ष केंद्रित करून, उरलेला काळ व श्रम अंतिम उद्देशां साठी उपयोगात आणेल. पण यामध्ये वासना,माया यांनी तृप्ती, अतृप्तीचा खेळ सुरू केला आणि मग मानव कर्म बंधनाच्या चक्रात अडकत गेला. तृप्तीतून तात्पुरतं समाधान, नन्तर पुन्हा अतृप्ती आणि अतृप्तीतून असमाधान हा नित्य क्षण क्षणाचा खेळ झाला. 

यातून भोगवादी आणि उपभोगवादी संस्कृती तयार होत गेली. सहजीवन व सहचर्य यातून संसार, विवाह, संतती अशी सुखाची मापदंड तयार होत गेली. जशी संस्कृती उच्च होत होत गेली, तसतसं गरजा, अतृप्ती आणि असमाधान यांचं चक्र सुरू झालं. यामध्ये सर्वसामान्य मानव अडकत जाऊन मग फक्त शारीरिक गरजा आणि त्यासाठीचा संघर्ष हेच जीवन होऊन राहिलं. या सर्वाला प्राधान्य देता देता बदलत्या संस्कृतीमुळे सर्व समीकरणं आणि परंपरेने घडणारी कर्म बदलत गेली. 

या सर्वांचा सखोल विचार उद्याच्या भागात करूया. आज इथेच थांबू. नाम घेत रहा,नित्य उपासनेत रहा आणि अंतिम समधनाच्या शोधात रहा. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  ज्यांना पुस्तक हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून  वा फोन करून संपर्क करावा. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१५/०५/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...