Skip to main content

भोग आणि ईश्वर १७९

भोग आणि ईश्वर  १७९

खरतर मनात आपण खूप किल्मिष, जाळी, जळमट जमवून मनातील गुंता कसा वाढवतो आणि त्यामुळे अनेक अडथळे आपणच निर्माण करतो, याचा अनुभव आपल्याला येतो. आधीच्या भागात आपण त्यावर बोललो सुद्धा. परंतु आपण या दोन गोष्टीचा संबंध लावत नाही किंवा तसा काही संबंध असतो, हे आपण जाणत नाही अथवा मान्य करत नाही. त्यामुळे आपल्याच वाटेत आपणच खड्डे करून ठेवतो.

त्या खड्ड्यातून आपण कधीच बाहेर पडत नाही, जोपर्यंत त्यांच्याकडे डोळसपणे  पाहून सुधारणा करत नाही. आपण मत्सर, द्वेष, जळफळाट, तुलनात्मक टीका, कुत्सितपणे बोलणं अश्या प्रकारच्या नकारात्मक आणि अविचारी स्वभावातून शेवटी काहीच मिळवत नाही. मला असं म्हणायचं नाही की, सर्वजण पूर्णपणे अश्याच वाईट स्वभावाचे असतात. पण प्रत्येकाच्या स्वभावात काही अंशी हे दोष असतात.

यात त्यांचं कसब आहे, जे यावर नियंत्रण मिळवून, मनात असे विचार येण्यापासून, स्वतःला वाचवू शकतात आणि कर्माच्या या फेऱ्यातून स्वतःला वाचवतात. मुळात कर्म हे फक्त कृतीतून नाही तर काया म्हणजे देहाने कृती वा कर्म, वाचा म्हणजे बोलून केलेलं कर्म आणि मन म्हणजे विचारात आलेलं वा विचाराने झालेलं कर्म. 

मग साधा विचार करा,न बोलता, फक्त मनात आलेले विचारसुद्धा किती घातक असू शकतील. कदाचित आपण करत असलेले विचार त्या व्यक्तीला लागू पडत असतील आणि सत्यसुद्धा असू शकतील, पण त्यावर आपण विचार केला की, समोरच्या माणसाच्या कर्माचा थोडाफार दोष आपल्याकडे येऊन, त्याचं फल कधीनाकधी आपल्याला कोणत्यातरी स्वरूपात प्राप्त होतच.

ज्याला धरून आपणच नन्तर म्हणतो की, मी कोणाचं काय वाकडं केलं की असं घडतंय, माझ्याबाबत. म्हणजे आताच या क्षणापासूनच निश्चय करूया की, कोणा बद्दलही कधीही काहीही चुकीचा, विघातक, नकारात्मक असा कोणताही विचार करणार नाही. अश्या प्रकारचे विचारमंथन मनाबरोबर शरीरातसुद्धा अनेक चुकीचे बदल घडवतं. याचा सखोल विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. चित्तशुद्धीच्या मार्गातील या अश्या अडचणी आपणच आपणहून दूर केल्या पाहिजेत. 

कारण नाम ही विचाराने पुढे घेऊन जाणारी वाट आहे, पण असे विचार या मार्गात पायातील बेडीसमान आहेत. ज्यामुळे आपण नाम घेत धावण्याचा प्रयत्न करतो, पण पायात या अश्या नकारात्मक बेड्या, धावण्यात खीळ घालतात. नन्तर आपणच म्हणतो की, मी इतकं करतो, तरी मला काही फायदा कसा होत नाही. म्हणून शुद्ध चित्ताने घेतलेलं नाम हे अवीट आहेच, पण नामाचा आनंद द्विगुणीत करते. 

हा झाला या क्षणापासून पुढचा विचार. पण या आधी आपण जर असे विचार वा विचारमंथन केलं किंवा करत असू, तर काय. त्यासाठी एक उपाय आहे. तो म्हणजे, नित्य नाम सुरू करताना, किंवा रोज सकाळी नित्य पूजाअर्चा करताना अथवा मुद्दामहून हात जोडून, प्रार्थना करून, मनात देवाची, सद्गुरुंची व आपल्या नामाची क्षमा मागून, माझ्या हातून जाणतेपणी वा अजाणतेपणी, विचारात, कर्मात वा बोलण्यात काही गैर, नको ते वा विघातक अथवा विध्वंसक काही झालं असेल तर त्याबद्दल मी क्षमा मागतो आणि हे ईश्वरा तू शरणागताला कायम क्षमा करत आला आहेस, त्यामुळे माझ्या हातून घडलेल्या या चुका तू मोठ्या मनाने क्षमा करून, त्या कर्मफळाच्या गतीतून माझी सुटका कर. पूर्वीच्या काळी अनेक स्तोत्रात ही क्षमायाचना असायची आणि ती घरोघरी नित्य म्हटली जात असे. 

याप्रमाणे नित्य प्रार्थना करून,खरेपणाने देवाला, सद्गुरूंना आणि नामाला सामोरे जाऊ. ते नक्की यातून अर्थात या कर्मगतीच्या फेऱ्यातून बाहेर काढतील. म्हणून लगेचच कामाला लागूया, पुढचा विचार बंद करून आणि मागील गोष्टींसाठी क्षमा मागून. 

उद्या याबाबत पुढे चिंतन करू. तोपर्यंत नाम सोडू नका, नित्य घेत रहा. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक आणि श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ हे लवकरच प्रकाशित होणारं, पुस्तक ज्यांना  हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून  वा फोन करून संपर्क करावा. आता पहिल्या आवृत्तीच्या थोड्याच प्रति शिल्लक आहेत. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२८/०५/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...