Skip to main content

भोग आणि ईश्वर १७८

भोग आणि ईश्वर  १७८

चित्तशुद्धी साधून आणि विकल्प बाजूला सारून, संकल्पाच्या मार्गावर दृढपणे चालत, नामाचा रेटा सुरू ठेवणं खरतर सहज व्हायला हवंय. पण वास्तविक तसं होत नाही. याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. आपण त्यांचा परामर्ष घेऊ. मन जे मागील गोष्टी, दुःखाच्या घडून गेलेल्या घटना, भविष्याची चिंता, हातून घडलेल्या चुका वा प्रमाद, मोहाचे क्षण व मार्ग, नात्यातील गुंता आणि नात्यातील मोहमाया इत्यादी अनेक गोष्टी नाम घेताना म्हणजे दृढपणे नाम घेताना आड येतात. 

आपण एक एक गोष्टीचा विचार करू. मागे घडून गेलेल्या गोष्टी अर्थातच आनंदाचे, दुःखाचे प्रसंग हे मनात नेहमी पिंगा घालत असतात. ज्याचा विचार मन मध्ये मध्ये अर्थातच रिकामा वेळ मिळाला की,करत असतं. त्यात दोन गोष्टीचा विचार करायचा. आनंदाचे घडलेले प्रसंग आठवून त्यातील सकारात्मकता पुढे नेऊन, 

त्याचाच उपयोग नामात एकाग्रता साधण्यासाठी करता येईल वा करून घेता येईल. प्रश्न राहिला दुःखाचे प्रसंग, घटना या कितीही आठवल्या तरी त्यातून असाध्य ते साध्य होणार नाही आणि घडलेलं बदलता येणार नसेल तर त्यावर विचार करण्यात काही अर्थ नाही, हे मनाला समजावता आलं पाहिजे. 

किंवा त्याच गोष्टीसाठी नामाचा उपयोग करता येईल. म्हणजे नाम हे सर्व गोष्टी, ज्या एकाग्रता साधण्याच्या मार्गात अडचण  वा अडथळा ठरू शकतील, त्या विसरण्याचा किंवा मागे सारण्याचा उत्तम उपाय आहे. या व्यतिरिक्त भविष्याची चिंता हीदेखील खूप मोठी अडचण असते एकाग्रतेच्या मार्गातील.

एक लक्षात घ्या की, भविष्य हे आपण स्वतःच्या मागील आणि वर्तमान कर्मानी आधीच लिहून ठेवलं आहे. मग जे फक्त समोर यायचं बाकी आहे, त्याबद्दल कशाची चिंता. कारण जे येईल ते कर्मगतीचाच परिणाम असेल. म्हणून सामोरे जाण्याची चिंता करू नये. त्यातही सद्गुरू आणि आपली उपासना आपल्याला नक्कीच योग्य त्या परिणामांना सामोरे जाण्याची हिंमत देतील. 

एकाग्रतेच्या मार्गातील अजून एक मोठा अडसर म्हणजे मोहाचे, लोभाचे, आकर्षणाचे क्षण हे अधून मधून मनाचा वेध घेऊन, मनाला मार्गभ्रष्ट व पदभ्रष्ट करण्यासाठी असतात. साधना वा नामाचा हा असा मार्ग असतो, ज्यावर चालताना अनेकदा आडवळणाचे अडचणीचे क्षण व प्रसंग येणार. पण यामध्ये आपलं ध्येय, लक्ष आणि पुढील जन्मांसाठीची धडपड यामध्ये बाधा येऊ शकते. म्हणून विचलित न होता आपण आपली साधना सुरू ठेवणं हे क्रमप्राप्त आहे. मनाचा निग्रह, दृढपणा हा अश्याच क्षणात कसोटीवर येतो. म्हणून साधना हा प्राण मानून दृढ राहिल्यास लोभ, मोह अश्या क्षणात सद्गुरू नक्कीच योग्य ती दिशा दाखवतील. 

अनेकवेळा नातेसंबंधातील गुंता हा अनेक प्रकारे नामात एकाग्र होताना त्रास देऊ शकतात. कारण बरेचवेळा त्यात मानसिक गुंता निर्माण झालेला असतो. यामध्ये सर्वात सोप्प काम म्हणजे आपण यात आपला अहंकार दुखावला गेला, या दृष्टीने पाहून, त्यातून बाहेर येत नाही. इथेच क्षमाशीलता आणि घडलेली गोष्ट विसरण्याचा मोठेपणा दाखवून आपण, आपल्याला कर्माच्या वाटेवर, आपल्याला मागे नेणाऱ्या घटना विसरून पुढे जाऊया. 

तरच आपलं नाम हे खरेपणाने, दृढतेने, शांतपणे आणि समाधानाने होईल. म्हणून आपलं लक्ष व ध्येय फक्त नाम हेच मनात योजून पुढे जात राहूया. नाम घेत राहूया. उद्या पुढील चिंतन. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक आणि श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ हे लवकरच प्रकाशित होणारं, पुस्तक ज्यांना  हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून  वा फोन करून संपर्क करावा. आता पहिल्या आवृत्तीच्या थोड्याच प्रति शिल्लक आहेत. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२७/०५/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...