Skip to main content

भोग आणि ईश्वर १५२

भोग आणि ईश्वर  १५२
 
साधनेत अजून एक गोष्ट जी अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे चिकाटी आणि सातत्य. सातत्य या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. सतत करणे म्हणजे सातत्याने करणे. सतत आणि नित्य या शब्दांना जोडल्यावर जे साध्य होतं ते सातत्य. ज्याचा उल्लेख, उच्चारण, घोष, चिंतन सतत आणि नित्याने केला जातो, त्या क्रियेला सातत्याने करणे म्हणतात. 

हे सातत्य टिकवण्यासाठी लागते ती चिकाटी.  एखादी गोष्ट वारंवार, नित्य करत राहून, त्यामध्ये हरवून जाणं म्हणजे साधना करणं आणि त्याचा कंटाळा येऊ देण्यासाठी लागते ती चिकाटी. अशी साधना ही अनेक क्षेत्रात अनेक व्यक्ती आपलं ध्येय साध्य करण्यासाठी, इच्छित हेतू प्राप्त करण्यासाठी करतात. मुळात साधना म्हणजे एखादा हेतू साध्य व्हावा म्हणून नेमाने केलेली आराधना. 

अगदी व्यवहारातसुद्धा जर एखादी व्यक्ती, एखादया लक्षाचा पाठलाग करण्यासाठी काही विशिष्ट काळ, विशिष्ट परिश्रम घेऊन, नित्य त्यासाठीचं कर्म करत असेल तर अशा सातत्य पूर्ण मेहनतीला साधना म्हणता येईल. साधना शब्द खरतर संधी आहे त्याचा विग्रह असा करता येईल सातत्य धरून नाम घेणे म्हणजे सा ध ना इतका पूर्ण विग्रह करून त्या शब्दांचं आणि त्या क्रियेचं महत्व लक्षात आलं असेल. 

बर हे का करायचं तर नामाच्या सतत एका विशिष्ट लयीत केलेल्या उच्चारणाने निर्माण होणाऱ्या कंपन लहरींचा नाद त्या वास्तूत सतत घुमत राहून, कालांतराने त्या वास्तुसह सर्व परिसराला भारून टाकतो. आपण कोणत्याही मंदिर अथवा तीर्थक्षेत्री गेल्यावर आपल्याला एक विशिष्ट प्रकारचा आनंद शांतता आणि समाधान मिळतं. या मागचं कारण आज वर्षानुवर्षे, त्या वास्तूत येणाऱ्या हजारो लोकांच्या नामाचा जय घोषाच्या लहरींचा कंपनांचा वावर आणि वलय त्या वास्तूत व वास्तुभोवती असतं. 

तेच वलय वा त्याचा अंशमात्र आपण सोबत घेऊन जातो. एक प्रकारे पुन्हा चार्ज होतो आणि आपल्या नित्य संसारात रममाण होतो. पण जर तेच नामस्मरण सतत आपण आपल्या वास्तूत आणि एका विशिष्ट वेळी नियमितपणे केलं, तर त्या भारलेल्या वातावरणाचा सकारात्मक परिणाम आपल्या चिंतनावर होऊन, आपले विचार देखील सकारात्मक होतात. 

म्हणजे नामाचा मूळ उद्देश  ईश्वरस्मरण, हा काही काळ बाजूला ठेवून, शास्त्रीय दृष्टीने विचार केल्यास हे जाणवेल की, अश्या सकारात्मक लहरी किंवा positive vibrations जर आपल्या अवतीभवती सतत असतील तर त्या आपल्या शरीरांतर्गत व बाहेर नित्य फिरणाऱ्या नकारात्मक लहरींना जवळ येऊ देत नाहीत आणि त्यांचा कुठलाही परिणाम आपल्या बुद्धीवर, विचारांवर पर्यायाने मनावर आणि धारणेवर होत नाही. 

धारणा म्हणजे एखादी विशिष्ट विचारपद्धती आणि त्या विचारपद्धतीतून तयार झालेली मानसिक भूमिका आणि मतं. म्हणजेच दुसऱ्या व्यक्तीच्या मनातील अशुद्ध व नकारात्मक लहरी आपल्या भोवती असलेल्या वलयांना पार करून आत प्रवेश करू शकत नाही. असं संरक्षक कवच आपल्या नित्य साधनेच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होतं. सातत्याने केलेल्या कोणत्याही कर्मातून व विचारातून नक्कीच ऊर्जा निर्मिती होते आणि विचार व कर्म सकारात्मक असेल तर सतत सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक असेल तर नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. 

म्हणून नित्य साधनेत राहून नित्य सकारात्मक ऊर्जा निर्मिती आणि प्राप्ती करूया, नित्य नाम घेऊया.  

उद्या पुढे चिंतन नेऊया. नाम घेत रहा सकारात्मक रहा. सध्याच्या नकारात्मक वातावरणात सकारात्मकता टिकवायला नाम हे उत्तम औषध व टॉनिक आहे. कसं ते उद्या पाहू. 

 बघूया  उद्या यावरच पुढील चिंतन. 

अजूनही ज्यांना पुस्तक हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प
क्रमांकावर संपर्क करावा. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०१/०५/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...