Skip to main content

श्रीकृष्ण नीति १०

श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!

श्रीकृष्ण नीति १०

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा

श्रीकृष्णाच सर्वात मुख्य हत्यार वा शस्त्र होत ते म्हणजे अत्युच्च कोटिच बुद्धिचातुर्य . कदाचित चाणक्य नीति चे धडे वा तत्व यांचा उगम कृष्णनीतित असावा. उदाहरणार्थ

- शत्रुला गाफिल ठेवण आणि आपल्या ताकदिचा अंदाज येऊ न देण . अश्या गाफिल शत्रुला हरवण हे त्याला जेंव्हा कळेल तोपर्यंत चदफड़ण हेच फक्त त्याच्या हातात राहत.

- रणनीति आखताना शत्रुच्या ताकदिचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे आपली चाल ठरवणं .

- जर काळ योग्य नसेल किंवा शत्रु प्रबळ असेल वा युद्ध करण ज्याक्षणी क्रमप्राप्त नसेल वा अन्य संयुक्तिक कारण असेल तर प्रसंगी माघार घेण हे जरी युद्धनीतित त्या काळात गैर समजल जात असल तरी सुद्धा त्याही नीतीचा कुशलतेने वापर करून , प्रसंगी रणछोड़दास ही उपाधि प्राप्त करून शत्रुला तात्पुरता आनंद देऊन नन्तर त्याचा संपूर्ण नायनाट करण्याचा नवा प्रघात वा रणनीति श्रीकृष्णाने जगाला दाखवून दिली. म्हणजेच एक प्रकारे माघार हाही कुशल डावपेचाचाच एक भाग असू शकतो हेही यानिमित्ताने जगाला दाखवून दिल.

- युद्ध हे प्रत्यक्ष युद्धभूमितच लढल आणि जिंकल जातं हा समज सुद्धा मागे टाकत युद्ध हे आधीच्या चर्चा आणि रणांगणाबाहेर योजल जात. शत्रुला चर्चेत गाफिल ठेवून युद्धाची आखणी केली जाते. या योजनेचा वा चर्चेचा परिणाम जर झाला नाही तरच आणि गरज असेल त्यावेळी युद्ध करण हे नव तंत्र जगाला दाखवून दिल.

- युद्धात मुख्य उद्देश्य शत्रुचा नाश हेच असाव. मग त्यासाठी कोणत्याही नीतीचा वापर करावा लागला तरी अंतिम उद्देश शत्रुचा विनाश हा साध्य होण महत्वाच. यांच सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे कालयवनाचा मृत्यु. प्रथम त्याला आव्हान केल द्वंद्वाच. नन्तर युद्ध करता करता आपण पसार झाले त्यामागे कालयवन त्वेषाने मागे गेला. श्रीकृष्ण तदनन्तर एका गुहेत लपले तेथेच निद्रावस्थेत असलेल्या ऋषिना कालयवनाने लाथ मारून जागे करताच आणि त्यानी डोळे उघडताच कालयवन भस्मसात होतो. यात श्रीकृष्णाना कालयवन याला मारण शक्य होत. तरीही या ऋषिना मिळालेल्या वरदानाचा अचूक वापर करून परस्पर शत्रुचा काटा काढला. महाबलाढ्य कालयवन कोणत्याही महत्प्रयासाशिवाय नष्ट झाला.
यात अजुन एक गोष्ट दिसते ती म्हणजे अश्या सर्व बाबी एका युद्धकर्त्याला माहित असण किती गरजेच आहे हेही जगाला दाखवून दिल.

- युद्धकौशल्यातील अजुन एक महत्वाचा भाग (जो तोपर्यंत प्रचलित प्रथेविरुद्ध होत ते म्हणजे शत्रुला त्याच्याच भाषेत सुयोग्य उत्तर देण. तिथे नीतिनियमाना योग्य पद्धतीने काळानुसार आणि गरजेनुसार वापरण. कंस हा सख्खा मामा असून एका क्षणाचाहि विचार न करता मारण, हे आज सहज वाटत असल तरी त्याआधी अस उदाहरण आढळत नाही.

युद्धनीतिमधले अजुन बरेच बारकावे आहेत जे पुढल्या टप्प्यात आणि यातील काही अजुन विस्ताराने पुन्हा पाहुया उदया.

आजच्या पुरत इथेच थांबूया .

श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!

सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!

© प्रसन्न आठवले

२२/०९/२०१७

भाग दशम समाप्त

ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...