श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!
श्रीकृष्ण नीति १०
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा
श्रीकृष्णाच सर्वात मुख्य हत्यार वा शस्त्र होत ते म्हणजे अत्युच्च कोटिच बुद्धिचातुर्य . कदाचित चाणक्य नीति चे धडे वा तत्व यांचा उगम कृष्णनीतित असावा. उदाहरणार्थ
- शत्रुला गाफिल ठेवण आणि आपल्या ताकदिचा अंदाज येऊ न देण . अश्या गाफिल शत्रुला हरवण हे त्याला जेंव्हा कळेल तोपर्यंत चदफड़ण हेच फक्त त्याच्या हातात राहत.
- रणनीति आखताना शत्रुच्या ताकदिचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे आपली चाल ठरवणं .
- जर काळ योग्य नसेल किंवा शत्रु प्रबळ असेल वा युद्ध करण ज्याक्षणी क्रमप्राप्त नसेल वा अन्य संयुक्तिक कारण असेल तर प्रसंगी माघार घेण हे जरी युद्धनीतित त्या काळात गैर समजल जात असल तरी सुद्धा त्याही नीतीचा कुशलतेने वापर करून , प्रसंगी रणछोड़दास ही उपाधि प्राप्त करून शत्रुला तात्पुरता आनंद देऊन नन्तर त्याचा संपूर्ण नायनाट करण्याचा नवा प्रघात वा रणनीति श्रीकृष्णाने जगाला दाखवून दिली. म्हणजेच एक प्रकारे माघार हाही कुशल डावपेचाचाच एक भाग असू शकतो हेही यानिमित्ताने जगाला दाखवून दिल.
- युद्ध हे प्रत्यक्ष युद्धभूमितच लढल आणि जिंकल जातं हा समज सुद्धा मागे टाकत युद्ध हे आधीच्या चर्चा आणि रणांगणाबाहेर योजल जात. शत्रुला चर्चेत गाफिल ठेवून युद्धाची आखणी केली जाते. या योजनेचा वा चर्चेचा परिणाम जर झाला नाही तरच आणि गरज असेल त्यावेळी युद्ध करण हे नव तंत्र जगाला दाखवून दिल.
- युद्धात मुख्य उद्देश्य शत्रुचा नाश हेच असाव. मग त्यासाठी कोणत्याही नीतीचा वापर करावा लागला तरी अंतिम उद्देश शत्रुचा विनाश हा साध्य होण महत्वाच. यांच सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे कालयवनाचा मृत्यु. प्रथम त्याला आव्हान केल द्वंद्वाच. नन्तर युद्ध करता करता आपण पसार झाले त्यामागे कालयवन त्वेषाने मागे गेला. श्रीकृष्ण तदनन्तर एका गुहेत लपले तेथेच निद्रावस्थेत असलेल्या ऋषिना कालयवनाने लाथ मारून जागे करताच आणि त्यानी डोळे उघडताच कालयवन भस्मसात होतो. यात श्रीकृष्णाना कालयवन याला मारण शक्य होत. तरीही या ऋषिना मिळालेल्या वरदानाचा अचूक वापर करून परस्पर शत्रुचा काटा काढला. महाबलाढ्य कालयवन कोणत्याही महत्प्रयासाशिवाय नष्ट झाला.
यात अजुन एक गोष्ट दिसते ती म्हणजे अश्या सर्व बाबी एका युद्धकर्त्याला माहित असण किती गरजेच आहे हेही जगाला दाखवून दिल.
- युद्धकौशल्यातील अजुन एक महत्वाचा भाग (जो तोपर्यंत प्रचलित प्रथेविरुद्ध होत ते म्हणजे शत्रुला त्याच्याच भाषेत सुयोग्य उत्तर देण. तिथे नीतिनियमाना योग्य पद्धतीने काळानुसार आणि गरजेनुसार वापरण. कंस हा सख्खा मामा असून एका क्षणाचाहि विचार न करता मारण, हे आज सहज वाटत असल तरी त्याआधी अस उदाहरण आढळत नाही.
युद्धनीतिमधले अजुन बरेच बारकावे आहेत जे पुढल्या टप्प्यात आणि यातील काही अजुन विस्ताराने पुन्हा पाहुया उदया.
आजच्या पुरत इथेच थांबूया .
श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!
सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!
© प्रसन्न आठवले
२२/०९/२०१७
भाग दशम समाप्त
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री
Comments
Post a Comment