श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!
श्रीकृष्ण नीति १२ व अंतिम
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा
आता पर्यन्त आपण श्रीकृष्णाच योगदान अनेक क्षेत्रात कश्या प्रकारे अधोरेखित केलेल आहे ते पाहिल . आज यांच् सर्वाचा आढावा घेऊन ही लेखमाला आवरती घेण्याचा विचार आहे.
श्रीकृष्ण हे एक अलौकिक महामानवी व्यक्तिमत्व होत. त्यांच चरित्र विविध घटना , चमत्कार स्वरूप कार्य यानी भरलेल आणि भारलेल आहे. अस म्हटल जात की जे महाभारतात व्यासानी लिहिलय तेच आहे अथवा अशी गोष्ट अस्तित्वात नसेल वा येणार नाही जी त्यानी महाभारतात मांडली नाही. त्याच अर्थाने अस म्हणता येईल की अशी कोणतीच गोष्ट, क्षेत्र, कार्य, जगात नाही आणि नसेल ज्या श्रीकृष्णानी आपल्या आयुष्यात केल्या वा स्पर्शील्या नाहीत.
त्यांचं योगदान
राजकारण , समाजकारण (१६१०० समाज नाकारु शकेल अश्या स्त्रियांच् पुनर्वसन) , मित्रता (सुदामा) , दृढ़ मैत्री (राधा) , राज्यकारभार , पतिकर्तव्यता , संयम (महाभारत युद्धात शस्त्र न उचलण्याचा संकल्प ) , शहाला प्रति शह, शत्रुला परास्त करण्यासाठी केलेले डावपेच , अधर्मी , अनीतिने वागलेल्या शत्रुला नामोहरम करण्यासाठी योजलेल्या नीति, त्याच्याच तार्किक संगति वर त्याच्याच गळ्यात घालण (कर्णाचा वध) . असुर शक्तिचा विनाश करण्यासाठी सर्व युक्त्या वापरण ( पूतना, शकटासुर , तृणासुर आदि राक्षसांचा वध) व शक्य असेल ते सर्व उपाय करण.
प्रसंगी कूटनीतिचा वापर (जयद्रथाचा वध) , प्रसंगी रणनीतिचा वापर ( पितामह भीष्म व गुरु द्रोणाचार्य यांचा मृत्यु) , कोणत्याही शस्त्राचा वापर न करताच शत्रुचा विनाश (कालयवनाचा वध), गरज पडल्यास उपलब्ध बलाचा वापर (नरकासुराचा वध , चाणूर व कंस यांचा वध) , युद्ध सद्यस्थितीत योग्य नसेल तर वेळ पडल्यास माघार घेऊन रणछोड़दास नामाभिदान स्विकृत करण पण योग्य काळ येईपर्यन्त वाट बघण ( जे त्यावेळच्या काळापर्यन्त युद्ध नीति विरुद्ध समजल जायच )
आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडवून घेण्यासाठी कौटुंबिक बाबीत गरज पडल्यास राजनीतिचा वापर (अर्जुन सुभद्रा विवाह , परिजातक व्रुक्ष लावून रुक्मिणी व सत्यभामा दोघीना एकाच वेळी खुश करण) , गरज पडल्यास कितीही जवळचा नातेवाईक असुदे अधम असेल तर त्यालाही क्षणाचा विलंब न करता यमसदनास पाठवावे ( कंस , शिशुपाल , याचा वध व पांडवांकड़ून कौरवांचा वध )
अश्याच अनेक गोष्टिं आहेत श्रीकृष्णा बद्दल लिहिण्या सारख्या. आणि वर उल्लेख केलेल्या प्रत्येक उदाहरणावर एक एक वेगळा लेख वा लेखमाला होऊ शकेल. पण प्रत्येक गोष्ट ही त्या त्या वेळेत संपली की त्याचा आनंद द्विगुणित होतो.
आता निरोपाआधी सर्व वाचकांचे आभार ज्यानी प्रत्यक्ष मतप्रदर्शन वा आभिप्राय दिले त्यांचे विशेष आभार. यांच प्रोत्साहनामुळे ही व पुढची लेखमाला संपन्न होऊ शकते.
पुढील लेखमाला लवकरच. विषय अनेक आहेत , अर्थात रामायण वा महाभारत या वर आधारित असेल हे नक्की.
सध्यापुरत इथेच थांबूया .
ll जय श्रीराम ll जय श्रीकृष्ण ll
श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!
सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!
© प्रसन्न आठवले
२४/०९/२०१७
भाग द्वादश आणि लेखमाला समाप्त
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री
ॐ शांतिः शांतिः शांति:
शुभम भवतु
Comments
Post a Comment