Skip to main content

श्रीकृष्ण नीति ९

श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!

श्रीकृष्ण नीति ९

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा

श्रीकृष्ण नीति च्या मुख्य भागाकडे आता आपण येउया.

कृष्णाच्या बुद्धिमत्तेची झलक त्यानी लहानपणी तीन मुख्य राक्षसाना मारून दाखवून दिली. एक गोष्ट तिथे सिद्ध झाली की हे बालक काही वेगळी शक्ति घेऊन आलय . मधल्या काळात त्यानी कालिया मर्दन (विस्ताराने उद्या विचार करू) आणि गोवर्धन पर्वताची पूजा करण्याचा नवीन प्रघात सूरु करवून घेतला आणि याचीच बातमी कंसाकडे गेली त्याने यानाच बोलावून मारण्या ठरवल . कारण कंसाने ओळखल की हेच ते दिव्य बालक आहे. आणि गोकुळात जाऊन आपण याला मारू शकत नाही. अर्थात हा डाव कंसावर उलटून त्यात त्याचाच अंत झाला. हा कथाभाग सर्वश्रुत आहे. मुख्य लक्षात घेण्याची बाब या सर्वात कृष्ण रणनीति. ती अशी की कंसाच आमंत्रण स्विकारून कंसाला गाफिल ठेवल, नन्तर आपल्या बलाचा वापर करून आधी त्याच्या मल्लाना नन्तर प्रत्यक्ष कंसाला संपवल. ही वर वर पाहताना एक साधी बाब वाटत असली तरी त्रैलोकयाचा स्वामी असलेल्या प्रभुना हे जाणवून द्यायच होत की आता कोणीतरी बलशाली आणि बुद्धिशाली मानव अथवा मानवी रूपातील दैवी शक्ति अवतरित झाली आहे.

हे यासाठी महत्वाच होत की कंस हा कोणी साधा सुधा आसामी नव्हता. त्याच स्वतःच वेगळ स्थान आणि भय सर्वत्र होतच. म्हणून कंसाच्या वधाची बातमी पसरल्याबरोबर बरेच राजे महाराजे  सावध  झाले.  यात सर्वात अग्रणी होता जरासंध . हा सर्व दुष्ट व दानवी शक्तिंचा नेता होता आणि कंसाचा श्वसुर होता.

त्या कड़े बघण्या आधी , गोवर्धन पर्वत उचलण्याच भगवांताच साहस यावर बोलू. राजा इंद्राला घाबरून अनेक वर्ष नंद राजा इंद्राची पूजा श्रावणात करत असे. पण एक वर्ष  कृष्णाने याचा विरोध केला.  ग्रामस्थाना पर्यावरणाचा व पर्यायाने आपला खरा मित्र कोण आहे आणि त्याचीच आपण पूजा का केली पाहिजे हे समजावून सांगितल. माझ्या दृष्टीने यात खुप मोठा धड़ा घालुन दिला. तो म्हणजे जे समोर दिसतय त्यालाच माना. आणि त्यांचेच पूजन करा. जो आपल्याला दिसत नाहीये त्याला घाबरायच काहीही कारण नाही, मग तो प्रत्यक्ष देवेंद्र जरी असला तरी चालेल.
माझ्या मते हे आताच्या काळाशी पूर्ण सुसंगत आहे. जे समोर आहे ज्याचं अस्तित्व आपण बघू शकतो आणि जो प्रत्यक्ष्य आपल्या उपयोगी आहे त्यालाच पूजा.
हे माझ्या मते व्यापक अर्थाने नाते संबधा बाबत पण लागू होत .म्हणजेच सोय जाणेल तो सोयरा आणि त्यालाच आपला म्हणा. मला वाटत याचा व्यापक अर्थाने विचार व्हावा जे भगवंताना अभिप्रेत आहे.
.
आजच्या पुरत  इथेच थांबूया . पुढे जाऊया उद्याच्या भागात.

श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!

सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!

© प्रसन्न आठवले

२१/०९/२०१७

भाग नवम समाप्त

ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...