Skip to main content

श्रीराम जानकी प्रथम भेटीवर गीत मालिका ७


जानकी श्रीराम प्रथम भेटीवर आधारित गीत मालिकेत भाग ७ गीत ७
राम लक्ष्मण यांच हे सभाषण चालू असताना तिकडे जानकी सह सखयांची थट्टा चालू असतेच . आणि आता दोन्ही भावाच सुद्धा त्यांच्यावर ध्यान गेलेलच असत. आणि आता दोन्ही बाजू एकमेकांकडेच बघत असतात. कदाचित यांचक्षणाची वाट काळ पण बघत असावा. युगानुयुगात एकदाच येणारी संधी , वेळ, सर्व शुभ ग्रह एकत्र घेऊन आली  होती . प्रत्यक्ष भगवान महाविष्णु आणि साक्षात देवी महालक्ष्मी यांची सत्य युगातील  पहिलीच भेट आणि त्याचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी जणु :
जमले होते देव सर्व सप्तस्वर्ग सोडुनि भुवरी
सप्तनद्यांचे पाट वळवले काळानेही जनकपुरी
युगा युगातून एकवार ये वेळ अशी या धरतीवरी
भव भावाची भेट होउंदे रघुवीर अन जनकदुलारी
उन्मादाचे हर्षाचे उल्हासाचे परिवर्तन पर्वाचे
क्षण क्षण थाबुनि काळही पाहि कौतुक हरिचे
ज्या योगे हे जन्मा आले महत्व उभया भेटीचे
जन्म भुवरी असे घेतला विष्णु लक्ष्मीच्या भेटीचे
असे प्रयोजन हरिने कारण यावे भुवर अवताराचे
ब्रम्हा आणि साम्ब सदाशिव संगे नरेंद्र आणि नारद
यक्ष किन्नरे गन्धर्वहि ते ऋषिमुनींही करती कौतुक
सृष्टि सजली अवघे मंडळ जमले सारे करण्या स्वागत
जनकदूलारी हरी मनोहर रूपाचे करू कीती कौतुक
महत्व जाणुनि क्षणा क्षणाचे नेत्रे सारी दो जीवांवर
अद्भुत बेला नव पंचम ग्रह तारा मंडल सजले सुरवर
अलौकिक घड़ी अवर्णनीया सत्ययुगाची असेल घरघर
उपस्थित सुर या महतीला जाणून होते साक्षी सत्वर
असा हा अमूल्य ,अलौकिक आणि अजरामर सोहळा प्रत्यक्ष्य पाहण्यासाठी सर्व भूमण्डल , ब्रम्हांड आणि सर्व देवलोक जमलेले.
आता या चराचराची अवस्था सुद्धा कीती विलक्षण असेल. काळ स्वयम जाणत होता कि त्यांच्याच उदरात नक्की काय लिहून ठेवलय . आता पुढच्या शेवटच्या भागात या अद्वितीय पर्वाची म्हणजेच देवी जानकी आणि प्रभु श्रीराम यांच्या प्रथम भेटीची आणि त्यांच्यां पहिल्या भेटीची सांगता .
कवन : प्रसन्न आठवले
ll जय श्रीराम ll
०८/०९/२०१७

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...