Skip to main content

माळ नववी २०१७

आठ दिवस वेगवेगळ्या गीताचे प्रकार पाहिले. आज  आईच्या भक्तीचा एक प्रकार गोंधळ लिहिण्याचा प्रयत्न केलाय. गोड़ मानून घ्यावा.

उद्या महिषासुर संग्राम आणि निःपात याच आख्यान आणि दहावी व अंतिम माळ

अश्वीन शुद्ध नवमी
नवरात्री नववा दिवस
माळ नववी अर्पण

असुर मर्दिनी आई  भवानी गोंधळ मांडला
तुझ्या कृपेची आस धरुनी गोंधळ मांडला

कोल्हापुरी  महालक्ष्मी तू , कोल्हासूर मातला
कृपा  कराया भक्तालागी, कोल्हासूर मारला
भक्तांना आनंद जाहला गोंधळ मांडला
संसाराचा ताप हरु दे  गोंधळ मांडला
गोंधळालां यावे आई गोंधळ मांडला

पार्वती रुपी जगत जननीं तू शक्तीचा अवतार
महिमा तुझा जिव्हे नाही जगताच्या तू पार
तुझ्या भक्तीची कास धरण्या गोंधळ मांडतो.
आई पार्वती तुझ्या कृपेस्तव गोंधळ मांडतो
गोंधळाला यावे शिवमयी गोंधळ मांडतो

उमा करिते वास भूवरी भवानी तुळजापूर
रणांगणाची प्रेरणाच तू कृपाळू माय उदार
दिगंत कीर्ती तुझी सांगण्या गोंधळ मांडला
वरदहस्त हा तुझा राहू दे गोंधळ मांडला
गोंधळाला यावे भवानी गोंधळ मांडला

एक्कावनी  पीठे तुझी आई भारतभूवर  
अर्धांगि तू शंकाराची हे मस्तक चरणांवर
कलियुगी दानव मनी माजला गोंधळ मांडला
पाप हरावे दुःख सरावे गोंधळ मांडला
गोंधळाला यावे शिवाई गोंधळ मांडला

कवी: प्रसन्न आठवले
२९/०९/२०१७

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...