श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!
श्रीकृष्ण नीति ८
.
कालपर्यंत आपण श्रीकृष्ण व श्रीराम याना भिन्न रुपात पाहात होतो. त्यांचं भिन्नत्व मुख्य देह भिन्नते मुळे भूमिका वेग वेगळ्या होत्या. काळाच्या दोन वेग वेगळ्या बिंदुंवर भगवांतानी घेतलेली दोन रूपे . एकच आत्मा दोन भिन्न प्रकृति स्वरुपात प्रकट होऊन काळाला सुसंगत अश्या भूमिकेतुन आपल्या उद्देश्याप्रत गेले वा पोहोचते झाले. असो तात्पुरत इतकंच समजूया की सध्या आपण काळाच्या त्या भागात आहोत जिथे मुल्यांची पुनर्माण्डनी सुरु झाली. म्हणून या काळाचा मागोवा घेणाऱ्या काही घटनांचा तपशील आज मांडतो इथे काही अचंबित करणाऱ्या गोष्टी आहेत त्या येणेप्रमाणे
- सत्यवतीच्याच लग्नाआधीच्या पुत्रापासून म्हणजेच व्यासऋषिपासुन पुढे वंशावळ चालू होते जेंव्हा सत्यवतीची दोन्ही मूल चित्रांगद आणि विचित्रवीर्य हे असफल असतात पुढे वंश चालवायला. त्यातील चित्रांगद हा अहंकारी असल्यामुळे त्याच नावाच्या गन्धर्वा हातून मारला जातो, आणि विचित्रवीर्य हा संततिसाठी असमर्थ होता. आणि मग वेदव्यास याना (सत्यवतीच्या प्रथम विवाहापासुन असलेल्या पुत्राला) पाचारण करून २ राजकन्यापासून (ज्या भीष्मानी जिंकून आणलेल्या असतात ) दोन पुत्र होतात आणि तीसरा दासीपुत्र विदुर . वास्तविक अर्थाने या संततीचा कुरु वंशाशी काहीच संबंध नाही. कारणव्यास हे पराशर ऋषिआणि सत्यवती यांचे पुत्र आहेत.
आणि पराशर ऋषि हे वसिष्ठ ऋषींचे नातू. पण यात अजुन एक गोष्ट सिद्ध होते की स्त्रीला त्याकाळी इतका अधिकार होता कि तिची आधीच्या लग्नाची संतति सुद्धा अधिकारप्राप्ति करू शकत होती तिच्या नन्तरच्या विवाहात. विषय थोड़ा खोलात जाऊन बघावा लागेल. (नन्तर एक लेखप्रपंच करीन यावर महाभारतकालीन स्त्रियां व अधिकार).
- कुंतीला सर्व पुत्र हे तिच्या पतिपासून न होता , तिला मिळालेल्या वरदानातून जन्माला आले. इतकं स्वातंत्र्य स्त्रियांना होत आणि त्यालाही राजमान्यता होती. यात एक बाब जाणवते ती म्हणजे कोणतीही नवीन , वेगळी , अश्या सर्व गोष्टी राजमान्य झाल्या की समाजमान्य होत असाव्यात आपसुक. हा परिपाठ रामायाणाच्या पूर्ण विसंगत आहे. तिथे एक धोबी ठरवतो राजाने केलेल योग्य की अयोग्य ( हा पुन्हा एक वेगळा विषय आहे विवादास्पद मुद्दा नन्तर जमल्यास यावर प्रयत्न करीन लिहिण्याचा ).
- स्त्रियांना पति निवडायच स्वातंत्र्य म्हणजेच स्वयंवराचा अधिकार होता..
हे सर्व आज इथे विस्ताराने लिहिण्याचे कारण की महाभारतातील काळ, जो श्रीकृष्णाचा समकाल आहे , तो किती चित्र विचित्र समाज, लोक , रीतिरिवाज यानी भरलेले व भारलेला होता. तो रामायणाहून सर्वार्थाने किती वेगळा होता आणि अश्या वातावरणात असताना त्यावर मात करून, शत्रुला नमोहरम करण्यासाठी तितकीच हुशारी, राजकारणी व्रुत्ति आणि शक्त्या व युक्तयांचा वापर हे सर्व नवीन पद्धतीने जन्माला घालून आजपर्यंत न वापरल्या गेलेल्या क्लूपत्या वापरण हे खुप मोठ कार्य भगवांतानी केलय. एका अर्थी राजकारणातले बरेचसे डावपेच श्रीकृष्णानी जन्माला घातले.
वरील सर्व गोष्टिंचा जरूर विचार करा. आजच्या पुरत इथेच थांबूया . पुढे जाऊया उद्याच्या भागात.
श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!
सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!
© प्रसन्न आठवले
२०/०९/२०१७
भाग अष्टम समाप्त
ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री
Comments
Post a Comment