Skip to main content

श्रीराम जानकी प्रथम भेटीवर गीत मालिका ६

जानकी श्रीराम प्रथम भेटीवर आधारित गीत मालिकेत भाग ६ गीत ६

ज्येष्ठ भ्राता श्रीराम सुद्धा मिथिला स्तुति करत आहेत बघून लक्ष्मण सुद्धा भारावून जातो. आणि त्याच आनंदात लक्ष्मणाच लक्ष समोरच काही अंतरावर उभ्या असलेल्या आणि हास्य संवादात दंग असलेल्या काही युवतींकड़े जातं. तत्क्षणी त्याच्या लक्षात येत की त्यांचं आपल्या दोघांकडे बघुनच हसण आणि थट्टा  चालू आहे. शीघ्रकोपि लक्ष्मण आधी पटकन रागावतो आणि त्याच आवेशात तो प्रभुना म्हणतो 

जाणवे मनास जणु त्या युवती करती हास्य
पाहुनिया आपणासी चहाटळे करी भाष्य
क्रोधाने मन बहुवेगे उसळे जैसा प्रदीप्त
असा शीघ्र जाऊन वाटे पृच्छावे प्रमाद

मज माझे ना वाटे काही आपुला अपमान
कारण मज बहु वेगे येई राग रुधिर चेत
जाऊनिया वेगे मी आज्ञा व्हावी क्रमास
दूर करुनी येतो त्वरे मी त्यांच्यां भ्रमास 

प्रभु बोलती शांत वदने डोळ्यातून आत्मभावे
काधि न क्रोधा करिसी वेगे सदा मनास जपावे
उत्तम पुरुषा क्रोधे सत्वर आवरता तो यावा
सदा मनाचा दुसऱ्यांच्या आधी विचार करावा

ठाऊक नाही कारण जेंव्हा कधीही न करी त्रागा
विवेक गमवे क्रोधे वागे तयास जगी न जागा
अतिउत्साही अतिशीघ्र करी निर्णय नेई घाता
शांत मनाने विचार करणे विवेक ठेवून जागा 

श्रीरामाच्या या बोलने क्रोध आवरून पाही
ज्येष्ठ भ्राता स्वयमप्रकाशी आत्मरूपा वाही
शांत होऊनी बंधु लक्ष्मण बोले वरमुन भावे
आपण बोलावे ते ते व्हावे तव मार्गे मी चालावे

आपण खुप लवकर उगाच आणि कारण जाणल्या शिवाय बोललो, यांच् खरच वाइट वाटून कनिष्ठ भ्राता लक्ष्मण खजील होऊन म्हणतो आपण जस सांगाल तसच होईल .पण तरीही एक शंका निरसन व्हाव यांच शुद्ध हेतुने मी बोलणार होतो, पण किंचित क्रोधित झालो इतकंच.
 अश्या प्रकारे राम लक्ष्मण संवाद चालू असताना. तिकडे जानकी सह सखींच काय चालू आहे तिकडे डोकावून  बघुया पुढील भागात .

ll जय श्रीराम ll
०७/०९/२०१७

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...