Skip to main content

श्रीराम जानकी प्रथम भेटीवर गीत मालिका ३

जानकी श्रीराम प्रथम भेटीवर आधारित गीत मालिकेत भाग ३ गीत ३ :

आता अशी चेष्टा मस्करी त्याही काळात सखींमधे होत असणार. पण हे छेडाछेड़ी चालू असताना जानकी स्वतः लटक्या रागाने सखींकड़े बघत असते. आता त्यांच्यां बोलण्यावर मैथिली काय बोलते ते बघू जरा.

वदे मैथिली सखींस आपल्या  थट्टा आता पूरे
उगीच कथिले मनी आपुल्या भासले मी कौतुके
मला आपुले दिसले तिकडे क्षात्र तेज कुमाराते
वाटे बंधू असे थोरला दोन्ही जरी राजसे

इतुके मनी बस आले बाकीं मनात काही नसे
तुम्ही समजता तसले काही विचारिही नसे
उगा चिडवूनी मला छेडणे थांबावे सत्वरे
लगे जाऊनी पिताश्रीस या तक्रारी  सांगते

म्हणे उर्मिला उगाच त्रागा नको करू जानकी
तुझ्या नाटका जाणुनि आहे मीही तुझी भगिनी
तुझ्या मना जे दृढ़ वाटते तेची तू वदसि जनी
जनात नाही वदसि तू जे नसते तुझिया मनी

पुन्हा पुन्हा त्या विषयी छेडूनी जाणे मी उद्देश्या
मनीची इच्छा तुमच्या सखिनो माझी हे सांगता
तरीही तुमचे भाव जाणुनि आहे मी प्रत्येका
नच चाले आता काहीही जाणे तुमच्या क्लूपत्या

असेल जरिहि मनी तुझ्या सांगावे तू वैदेही
इच्छा कोणा युवका वरती मन जडले मैथिली
उगा बोलुनी त्रास देउनी मज तू का छेडीसी
चला चला मग आता जाऊ पार पिताश्रीप्रति

इतुके काही नको कराया मनी असें वेगळे
भाव मनीचे जाणुनी आहो साधे जरी हे डोळे
तूच छेडीसी विषया आपण आता लटके भोळे
मन तुझे ना कधी घसरले किती होते कोवळे

अशी ही छेडाछेड़ी या बाजूला चालू असताना आपण अजुन दुसऱ्या बाजूला डोकावून बघितलच नाहीये. तिथे श्रीराम आणि लक्ष्मण या दोघांमधला संवाद आपण एकला नाहीये. चला तर आता पुढच्या भागात तिकडे डोकावून बघुया.

कवन : प्रसन्न आठवले
०३/०८/२०१७
२३:४५

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...