जानकी श्रीराम प्रथम भेटीवर आधारित गीत मालिकेत भाग ८ गीत ८ व अंतिम
ज्या क्षणाची ब्रम्हादिक देव, देवेंद्र, नारद , यक्ष , किन्नर, गन्धर्व , समस्त सृष्टि, स्वयम काळ अत्यंत उत्कटतेने प्रतीक्षा करत होते, तो क्षण म्हणजे रामरूप प्रत्यक्ष श्रीमहाविष्णु आणि जानकीरूप स्वयम श्रीमहालक्ष्मी देवी यांच मानवी देहात आल्यानंतर प्रत्यक्ष सामोर येण. सर्व ग्रह जणु शुभ योगात संचार करत होते. नभी असलेली ही स्थिति आणि अवनिरूप माता वसुंधरा हे सर्वजण, ऐश्या पावन, मंगल, शुभ घडीला पवित्र होऊन , कृतकृत्य नजरेने हा सोहळा लोचनात साठवण्यास आतुर झाले होते. आणि ज्या सोहळयाची सर्व प्रतीक्षा करत होते तो क्षण आला. आता पर्यन्त सखी, भगिनी यांच्यात मग्न असलेली जानकी आणि बन्धु लक्ष्मण यांच्याशी संवाद साधत असलेले श्रीराम यांची नजरानजर झाली आणि जणु सनई चौघडा वाजावा तसा निनाद झाला. जणूकी शुभशकून जहाला. मानवी रुपात असलेल्या दोन महापवित्र परमात्म स्वरूप ज्योतिनि एकमेकांना ओळखल आणि चराच रातुन जणु गुंजारव सुरु झाला :
देखुनी श्रीहरी लक्ष्मी रूप ते
काळ ही क्षणिक थांबे सत्वर
भुवर तेजोमय अवतरले
देव लोक जमले जणु स्थावर
काळ ही क्षणिक थांबे सत्वर
भुवर तेजोमय अवतरले
देव लोक जमले जणु स्थावर
शक्ति रूप आभा देवीची
व्याघ्र स्वयम वाहन आले
गरुड वाहन श्रीहरिंचे
आकाशातून बघण्या आले
व्याघ्र स्वयम वाहन आले
गरुड वाहन श्रीहरिंचे
आकाशातून बघण्या आले
नारद किन्नर स्वर्ग सोडुनि
विदेह नगरी नभोमंडली
सत्ययुगाच्या परिसीमेवर
तेजरूपे दो भुवर जमली
विदेह नगरी नभोमंडली
सत्ययुगाच्या परिसीमेवर
तेजरूपे दो भुवर जमली
क्षण क्षण जाई जसा जसा
काळ स्तब्ध हो तसा तसा
सारे विश्व जाहले उत्सुक
हरी लक्ष्मी मिलनी दर्शक
काळ स्तब्ध हो तसा तसा
सारे विश्व जाहले उत्सुक
हरी लक्ष्मी मिलनी दर्शक
गुपीत दडले गुहि काळाच्या
यातून काळालाही सूटणे
ग्रहण सोडवावे म्हणुनी तर
सारे ग्रह आकाशी जमणे
यातून काळालाही सूटणे
ग्रहण सोडवावे म्हणुनी तर
सारे ग्रह आकाशी जमणे
या क्षणिक वाटणाऱ्या नेत्रदीपक सोहळयाचे सर्व साक्षीदार पावन झाले आणि स्वयंवराची सिद्धता जनक राजांच्या राजगृहात, राजमन्दिरात आणि राजसभेत सुरु झाली.
कवन कर्त्याच मनोगत :
सहज आलेला एक विषय प्रभु आणि जानकी यांची प्रथम भेट काव्यमय स्वरुपात मांडावी, एका गीतमालेद्वारे. हे स्वप्न सत्यात उतरल आठ गीतांच्या माण्डणीतुन. यात माझा लिहिता सहभाग असला तरी प्रेरणास्त्रोत स्वयम माझे गुरु श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज आहेत .
त्यांच्याच प्रेरणेने पुढील गद्य स्वरूपातील लेखमाला
श्रीकृष्ण रुक्मिणी स्वयंवर नवरात्रातील नऊ पुष्पे आणि विजयादशमिला समारोप. श्रीराम जानकी यांच्या कथेत काव्य जाणवल आणि म्हणून गीतमाला लिहिली. पण श्रीकृष्ण रुक्मिणी कथेत नाट्य आहे म्हणून गद्य लिहिन . तरी सुद्धा मधे मधे गीत असेल पण गद्य मुख्यतः .
श्रीकृष्ण रुक्मिणी स्वयंवर नवरात्रातील नऊ पुष्पे आणि विजयादशमिला समारोप. श्रीराम जानकी यांच्या कथेत काव्य जाणवल आणि म्हणून गीतमाला लिहिली. पण श्रीकृष्ण रुक्मिणी कथेत नाट्य आहे म्हणून गद्य लिहिन . तरी सुद्धा मधे मधे गीत असेल पण गद्य मुख्यतः .
तस्मात सदिच्छा असुद्याव्या पाठीशी आणि मस्तकी आशिर्वाद.
शुभम भवतु
जय श्रीराम
कवन : प्रसन्न आठवले
०९/०९/२०१७
०९/०९/२०१७
Comments
Post a Comment