Skip to main content

माळ दहावी २०१७

अश्वीन शुद्ध दशमी
नवरात्री दहावा दिवस
माळ दहावी व अंतिम अर्पण

सिंहरूढ़ काली मातेने रौद्र रूप धारण करून अष्ट भुजांमधे शस्त्र घेऊन विराट अवतार धारण करून मातलेल्या आणि माजलेल्या महिषासुराला प्रत्यक्ष युद्धाच आव्हान दिल. दोन्ही सैन्य एकमेकांसमोर ठाकली. मातेच अक्राळ विक्राळ रूप पाहून देवसैन्याला प्रचंड स्फुरण आल. एक एक राक्षस रणात
धराशाही होत होता. आणि तस तस राक्षस सैन्य खचत जात होत. हे पाहून महिषासुराने प्रत्यक्ष कालीमातेला द्वंद्वाच आव्हान केल आणि तुम्बळ युद्ध झाल . जे 9 दिवस 9 रात्री चालल. सरते शेवटी आईने पूर्ण शक्तिचा वापर करून अस्त्रयुक्त त्रिशूल मारले.  इतकावेळ दबा घरून बसलेला काल , यमराज स्वतः पुढे आला आणि महिषासुर गतप्राण होऊन धरेला प्राप्त झाला. त्याच वर्णन करणार कवन. हे ३ वेगळ्या व्रुत्तात आहे , त्यामुळे ते त्याप्रमाणे वाचावे ही नम्र विनंती.

सिहस्वार होऊनी शस्त्र अस्त्र घेऊनी
भूधरा थरारली, काळा भीति जाहली
रौद्र रूप रौद्रीणी, नेत्री आग ज्वालही
भौम्या होइ धाकही विराट रूप पाहूनी

आज वज्र इंद्र  तेज पाहूनी कापला
भयास भये ग्रासले, काल प्रहरी थांबला
सूत्र हाती घेई देवी, रौद्र नाद जाहला
खड्ग चाप परशु हाती भालाही फेकला

विश्व होय अंकिणी निनाद गूंज कणकणी
सिंह गर्जना करुनी असुर मर्दना रणी
शस्त्र घेऊनी  करी अस्त्र परजूनी रणी
काली भयकम्पता स्वयेती कालरूपिणी

असुर थरथरे भीऊनि पातले यमदुता पाहूनी
आई भवानी स्वये सिद्ध हो गळीत गात्रे नी धमनी
भिऊ लागले पळू लागले राक्षस अष्ट दिशानी
शीर धरुनिया एक एक चामुंडा ये धाऊनी

महिषी माजला धरा भाजला आला तो धावून
रक्तरंगी जणु नेत्र आईचे वदनि तेज बहु अग्न
स्वये रुद्रहि क्षणिक थांबला जागे समाधितून
काल स्वयेही सिद्ध जाहला ग्रासाया महिषानन

शस्राचा तो नाद ऐकुनी सप्तलोक थरथरले
सुरासुर ते जमले सत्वर द्वंद्व पाहण्या पातले
उचलुनी भाला फेक मारला तेज तये फाकले
महिषासुर शीर करुनी याचना धरतीला पातले
महाकालिने असुर मारला जयगान रणी जाहले

शांत हो शांत आई  कृपा करी कालिकाई
सुरही जमले असुर पळाले जाग जाग तू आई
कुणा न शमले असे अलौकिक तेज आज तू आई
रुद्र धावला धरणी पातला क्षणे थांबली आई
आई शांत हो आई भक्तवत्सले  तू आई
महिमा अगाध तुझा आई महिमा अगाध आई

कवी : प्रसन्न आठवले
दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा

शुभ दसरा

आता ईश्वरिच्छेने पुन्हा भेट नवीन नात्यरूपान्तरित कथाभाग संदर्भ रामायण उत्तरपर्व.

शुभंभवतु

ll जय श्रीराम ll जय श्रीकृष्ण ll
३०/०९/२०१७

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...