Skip to main content

श्रीराम जानकी प्रथम भेटीवर गीत मालिका २

श्रीराम जानकी स्मरण

जानकीच्या कथनावर  आणि मनःस्थिति वर तिच्या सखया तिची छेड छाड सुरु करतात . आणि उर्मिलेसह भगिनी त्यात त्यानाच साथ देतात. काळ कितीही जूना असला आणि युग सत्ययुग असल तरीही सखींचा स्वभाव आणि तरुणपणाचा आनंद तोच असतो किंवा असावा. तर मग बघुया काय चालू आहे राज उद्यानात .

जानकी मनी तुझ्याच प्रतिमा युवकाची दिसते
तुझेच मन तू  दिधले त्याना आम्हा असे भासते 
असेल मनीषा तुझी जानकी पिताश्रीस सांगते
तुझेच असती बोल बरे हे ध्यानी तव राहुदे 

म्हणे उर्मिला वदलीस सत्या सखये हे सार्थ
यांच् मिशाने पाहिलेस तू कुमारा तदर्थ
तुझेच श्रम हे आम्ही न जाऊ देऊ ग व्यर्थ
तुझ्या इप्सिता फलास नेउनी देऊया अर्थ

आहा कसे हे बोल मैथिली जाऊ न दे फोल
तव शब्दाचे राज्यहि सारे जाणतसे मोल
आता भिणे ना  बहाणेही ना व्यर्थ न हे बोल
आता फिरसी जर का शब्दा तू हरवीसी हे मोल

मनात असता जनात वदणे जमणे तुज नाही
तुझ्या मनातच असुदे हाची हरकत ही नाही
क्षत्रिया त्या अर्पुनि मन हे इच्छा नच काही
देणे त्याना निरोप इतुका अवघड हे नाही 

अर्थात अश्या खट्याळ चेष्टेला जानकीच काय उत्तर आहे आणि तिचा लटका राग आणि रुसवा अर्थात पुढील भागात बघूया

कवी :प्रसन्नआठवले 
०३/०९/२०१७
००:१०

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...