श्रीराम जानकी स्मरण
जानकीच्या कथनावर आणि मनःस्थिति वर तिच्या सखया तिची छेड छाड सुरु करतात . आणि उर्मिलेसह भगिनी त्यात त्यानाच साथ देतात. काळ कितीही जूना असला आणि युग सत्ययुग असल तरीही सखींचा स्वभाव आणि तरुणपणाचा आनंद तोच असतो किंवा असावा. तर मग बघुया काय चालू आहे राज उद्यानात .
जानकी मनी तुझ्याच प्रतिमा युवकाची दिसते
तुझेच मन तू दिधले त्याना आम्हा असे भासते
असेल मनीषा तुझी जानकी पिताश्रीस सांगते
तुझेच असती बोल बरे हे ध्यानी तव राहुदे
म्हणे उर्मिला वदलीस सत्या सखये हे सार्थ
यांच् मिशाने पाहिलेस तू कुमारा तदर्थ
तुझेच श्रम हे आम्ही न जाऊ देऊ ग व्यर्थ
तुझ्या इप्सिता फलास नेउनी देऊया अर्थ
आहा कसे हे बोल मैथिली जाऊ न दे फोल
तव शब्दाचे राज्यहि सारे जाणतसे मोल
आता भिणे ना बहाणेही ना व्यर्थ न हे बोल
आता फिरसी जर का शब्दा तू हरवीसी हे मोल
मनात असता जनात वदणे जमणे तुज नाही
तुझ्या मनातच असुदे हाची हरकत ही नाही
क्षत्रिया त्या अर्पुनि मन हे इच्छा नच काही
देणे त्याना निरोप इतुका अवघड हे नाही
अर्थात अश्या खट्याळ चेष्टेला जानकीच काय उत्तर आहे आणि तिचा लटका राग आणि रुसवा अर्थात पुढील भागात बघूया
कवी :प्रसन्नआठवले
०३/०९/२०१७
००:१०
Comments
Post a Comment