Skip to main content

माळ सातवी २०१७


अश्वीन शुद्ध सप्तमी
नवरात्री सातवा दिवस
माळ सातवी अर्पण

आई आदिशक्ति जगन्माता म्हणजे साक्षात परम आत्मा. आणि आपण भक्त म्हणजे आत्मा, ईश्वरी शक्तिचा अंशात्मक भाग.  ख़र तर त्याच शक्तिपासून अलग झालेला आणि मूळस्वरूपाचा विसर पडल्यामुळे भावसागरात, संसारात अडकलेला. प्रत्येक जीव, हा  नवविधा भक्तीच्या मार्गाने परम शक्तीच्या समीप जाऊन मोक्ष मार्गाची वाट धरतो आणि या वाटचालित परम् शक्ति आणि शरीराअंतर्गत स्थित आत्मा  यांचा माऊली आणि लेक या स्वरुपात समाधि अवस्थेत  नवरात्रीनिमित्त होणारा संवाद जात्यावरिल ओवी स्वरुपात  लिहिण्याचा  प्रयत्न केलाय . गोड़ मानून घ्यावा.

आई तुला लेकराची
काळजी आहे साची
म्हणून या आत्म्याची
हाक तुज ऐकू यावी

तूच माझी मायबाप
तूच माझे खरे रूप
तूच माझी जाण हाक
ओळखून माझे दुःख

माझ लेकरु ग तूच
दिले भौतिक स्वरूप
विसरली ओळखिस
घेता जन्म या धरेस

तुज दिले अणुरूपी
ब्रम्हमय आत्मायनी
होण्या परिपूर्ण ज्ञानी
योग याग या मार्गानी

आई तूच मोहमाया
रचियली वाटे माझ्या
कसे येणे वाटे तुझ्या
दाव  मोक्ष मिळण्या

तुज भावसागरात
धाडियले घे ध्यानात
मूळ भेट स्वरुपात
प्राप्त हो तू मोक्षास

आई हाच तिढा आहे
परिसावे कैसे व्हावे
वाटे माया तोड़ू पाहे
तुजप्रत येणे नोहे

परिसावे एक वाट
कलियुगी आहे नीट
नाम गोडी ती अवीट
स्मरे नित्य जोड़ी वीट

नाम हाच मार्ग साचा
दावी मार्ग परमेशाचा
वैखरि ही होय वाचा
मोक्ष मार्ग धरायचा

हीच शिदोरी घेऊन
जन्म जन्म हा जोडून
लक्ष साध हे साधन
येसी मोक्षी परतून

आई मार्ग दावीयेला
मुक्त आत्मा करण्याला
जाणले या गुहिताला
नमू तुझ्या चरणाला

कवन : प्रसन्न आठवले
२७/०९/२०१७

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...