Skip to main content

भोग आणि ईश्वर ५५१

भोग आणि ईश्वर  ५५१ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

आपण अनेकदा योगायोग या संज्ञेखाली अनेक गोष्टी ऐकल्या असतील किंवा वाचल्या असतील. कदाचित आपल्या स्वतःच्या आयुष्यात त्या अनुभवल्या सुद्धा असतील. ज्यामुळे आपलं एखादं न होणारं काम होतं. किंवा ध्यानीमनी नसताना  एखाद्या व्यक्तीची अचानक भेट होऊन, अडलेलं वा अडकलेलं एखादं जुनं काम, चुटकीसरशी होऊन, आपण स्वतः आश्चर्यचकित होतो. कारण ते होईल असं कधी वाटलेलं नसतं. 

त्यामुळे, ते झाल्यावर, सर्वात प्रथम हा विचार मनात येतो की, जर हे इतकं सहज आणि सोप्पं होतं तर, मग इतके दिवस का अडलं आणि इतके दिवस असलेलं होतं तर इतक्या सहज.झालं कसं. याच्या उत्तराचे दोन भाग होतील. एक म्हणजे प्रत्येक गोष्ट ही तिच्या निहित अर्थात योजलेल्या वेळीच होते. दुसरं, ही निहित वेळ आपली पूर्वकर्म आणि ईश्वरी वा सद्गुरू कृपा यांच्या सहाय्याने शक्य झालं. 

मग योग म्हणजे ते कर्म घडण्याची वेळ जर असेल तर, अशी कृपा होऊन, योग्य व्यक्ती भेटून, तिच्या माध्यमातून आपला कार्य यशस्वी होणं. यात एका गोष्टीची सहाय्यता आपल्याला प्रत्येक कर्मात गरजेची असते. ती म्हणजे पूर्वकर्मातील एखादी चांगली गोष्ट वा चांगलं कर्म अश्या योग्यवेळी फलद्रूप होणं, हा ईश्वरी कृपेचा भाग आहे. कारण अनेक कर्माच्या गुंत्यातून, योग्य कर्म निवडून, तेच अश्या बिकट प्रसंगात, कामी आणणं, हे एखाद्या तज्ञ वा जाणकार शक्तीचं कार्य आहे. 

अशी तज्ञ जाणकार शक्ती एकमात्र या जगतात, आरंभ ते आता इथपर्यंत आहे आणि कल्पांता पर्यंतअसेल. पण हा ताळमेळ कसा लागत असेल,हे देखील जाणणं आवश्यक आहे. सिस्टिम म्हणाल तर महद आश्चर्य वाटेल की, कोणतीही लिखापढी अस्तित्वात नाही. पण आत्म्याच्या प्रथम जन्मापासून ते अगदी आताच्या क्षणापर्यंतचा हिशोब कोण ठेवणं. योग्यवेळी योग्य कर्माचं बीज फलरूप होऊन, ते समोर येणं. 

यातही महत्वाची गोष्ट ही की, यामधे कोणताही भेदभाव होत नाही. कोणाला कमी वा कोणाला जास्तं, असं होत नाही. कोणाचा हिशोब चुकला किंवा एखाद्या कर्माचं फल हे क्ष व्यक्ती ऐवजी ह या व्यक्तीला मिळालं, असं कधीच होत नाही. मग अश्या स्थितीत आपल्याच योग्य कर्माचा मोबदला, अचूक वेळी, विशेषतः, ज्यावेळी आपण अडचणीत असतो, त्यावेळीच ते समोर येणं, हा योगायोग असू शकत नाही. 

ही सांगड घालणं, हे या अजब शक्तीच कार्य आहे. म्हणजेच जी व्यक्ती एखाद्या चांगल्या कर्माची धनी असेल, परिस्थितीने गांजलेली असेल, पण त्या क्षणी ती एखाद्या कृपेची आवश्यकता असेल आणि त्या व्यक्तीच्या पुण्यप्रभावात तश्या कृपेची सोय, त्या व्यक्तीच्या साधनेने, भक्तीने त्या व्यक्तीने, आपल्या पूर्व कर्माने लिहून ठेवली असेल, तर त्या शक्तीला, त्या व्यक्तीला, त्या योगाप्रत न्यावच लागतं. किंवा ती शक्ती ते कार्य घडवून आणते. 

यावर अजूनही विवेचन उद्याच्या भागात करूया. तोपर्यंत नामाने स्वहित साधण्याचा प्रयत्न करूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०४/०६/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...