Skip to main content

Posts

Showing posts from February, 2023

अध्यात्म विराम १२०

अध्यात्म विराम १२० आपण अनेकदा बोलताना म्हणतो की, एखादा माणूस सेन्सलेस आहे किंवा एखादा व्यक्ती खूप सेंसिबल आहे. हा सेन्स म्हणजे जाणीव. याचा एक अर्थ हा नक्की की, ज्याच्या जाणीवा प्रगल्भ आहेत आणि मनाने निर्णय घेताना, जाणीवपूर्वक विचार करून निर्णय घेण्याची क्षमता आहे, त्यांना आपल्या निर्णयाबद्दल पश्चात्ताप करावा लागत नाही. आता याचा अर्थ असा होतो की, त्यांना, त्यांनी घेतलेल्या निर्णयाची योग्यता माहीत असते आणि परिणाम काहीही आला तरी, आपण प्रगल्भतेने निर्णय घेतला आहे, याचं समाधान त्यांना असतं, निर्णय चूक अशी किंवा बरोबर. पण हे समाधानच खूप महत्वाचं आहे. याच जाणिवांच्या प्रगल्भतेबद्दल आज चिंतन करूया. प्रगल्भता म्हणजे ज्याला इंग्रजीत maturity म्हणतात, ते नक्की काय आणि त्यांचा जाणिवांशी काय संबंध याबद्दल बोलू. जाणीवा तुम्हाला प्राप्त परिस्थिती, त्याची विपरितता किंवा अनुकूलता, भूतकाळ, वर्तमान, पुढे येणारी वा येऊ शकणारी परिस्थिती, योग्य अयोग्यता, निर्णयाची परिणती वा परिणाम,या सर्वांचा साकल्याने, सर्व बाजूंनी विचार करण्याची क्षमता किंवा अक्षमता देतात. खूप वेळा आपण एखाद्या व्यक्तीला बोलताना ऐकलं असेल ...

श्रीकृष्णनीती भाग २९

श्रीकृष्णनीती भाग २९ (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! कालचाच विषय पुढे नेताना निष्ठा आणि निष्ठेबाबत अजून काही उदाहरणं घेऊन पुढे जाऊ. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी श्रीकृष्ण चरित्रावरून घेतलेला बोध, आत्मसात केला आणि माणसांना धर्माच्या, स्वराज्याच्या पायाशी निष्ठा आणि प्राण कसे वाहायचे, याचा सत्शील मार्ग दाखवला. नव्हे महाराजांनी, या माणसांच्या रुपात निष्ठेच्या नवनवीन व्याख्या त्यांच्याच कर्तृत्वाने लिहून घेतल्या. मला वाटतं श्रीकृष्णाला इतकं परिपूर्ण कोणीही आत्मसात केलं नाही.  चुकीच्या पायावर निष्ठा वाहिलेल्या कित्येक माणसांना स्वराज्याचा मंत्र देऊन धर्माच्या रक्षणार्थ प्रवृत्त केलं. प्रसंगी यातील अनेकांनी लढता लढता, जीवाची बाजी लावून धर्माच्या स्थापनेसाठी, देहाचं मोल मोजलं. हीच निष्ठेची अपेक्षा वा संकल्पना श्रीकृष्णांनी गीतेतून आणि महाभारतातील स्वचारित्रातून जनसामान्यांना शिकवण स्वरूपात दिली की, निष्ठा ही धर्माप्रति असावी. तीच खरी धर्मनिष्ठा.  श्रीकृष्णाच्या माध्यमातून अजून एक गोष्ट जी प्रखरपणे जाणवते ती म्हणजे दांभिक अहिंसा व सत्य यांचा कोणी...

अध्यात्म विराम १२०

अध्यात्म विराम १२० आपण अनेकदा बोलताना म्हणतो की, एखादा माणूस सेन्सलेस आहे किंवा एखादा व्यक्ती खूप सेंसिबल आहे. हा सेन्स म्हणजे जाणीव. याचा एक अर्थ हा नक्की की, ज्याच्या जाणीवा प्रगल्भ आहेत आणि मनाने निर्णय घेताना, जाणीवपूर्वक विचार करून निर्णय घेण्याची क्षमता आहे, त्यांना आपल्या निर्णयाबद्दल पश्चात्ताप करावा लागत नाही. आता याचा अर्थ असा होतो की, त्यांना, त्यांनी घेतलेल्या निर्णयाची योग्यता माहीत असते आणि परिणाम काहीही आला तरी, आपण प्रगल्भतेने निर्णय घेतला आहे, याचं समाधान त्यांना असतं, निर्णय चूक अशी किंवा बरोबर. पण हे समाधानच खूप महत्वाचं आहे. याच जाणिवांच्या प्रगल्भतेबद्दल आज चिंतन करूया. प्रगल्भता म्हणजे ज्याला इंग्रजीत maturity म्हणतात, ते नक्की काय आणि त्यांचा जाणिवांशी काय संबंध याबद्दल बोलू. जाणीवा तुम्हाला प्राप्त परिस्थिती, त्याची विपरितता किंवा अनुकूलता, भूतकाळ, वर्तमान, पुढे येणारी वा येऊ शकणारी परिस्थिती, योग्य अयोग्यता, निर्णयाची परिणती वा परिणाम,या सर्वांचा साकल्याने, सर्व बाजूंनी विचार करण्याची क्षमता किंवा अक्षमता देतात. खूप वेळा आपण एखाद्या व्यक्तीला बोलताना ऐकलं असेल ...

श्रीकृष्णनीती भाग २८

श्रीकृष्णनीती भाग २८ (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! आज श्रीकृष्णाच्या चरित्राचा विशेषत्वाने महाभारत युद्धा संदर्भात अभ्यास करताना एक गोष्ट जाणवते. जी अत्यंत चुकीच्या समजुतीत कायम वापरली गेली ती म्हणजे निष्ठा. अश्या भ्रामक कल्पनेत, आपल्याच धर्माची आपल्याच बांधवांनी किती हानी केली आहे, याची शेकड्यानी उदाहरणं इतिहासात सापडतील, महाभारता आधीसुद्धा आणि नन्तरदेखील. निष्ठेची चुकीची व्याख्या आणि त्याला धर्माचं अधिष्ठान असल्याच्या चुकीच्या कल्पना, यांना खरतर छेद देणारं तत्वज्ञान गीतेत मांडून आणि कर्माने ते घडवून वा दाखवून देखील, आम्ही हिंदू धर्मीय त्याबाबत कधीही जागरूकतेने विचार केलाच नाही वा ते तितकं गांभीर्याने घ्यावं,असं फार कोणाला वाटलं नाही.  कारण निष्ठेच्या संदर्भात वा ती योग्य जागी असण्यासंदर्भात फार भ्रामक कल्पनेत आपण वावरलो वा वावरत आहोत. हे खेदाने म्हणावं लागतं. जरी श्रीकृष्णांनी पाच हजार वर्षांपूर्वी यावर योग्य तो प्रकाश टाकून, ते उदाहरणाने दाखवून दिलं असलं तरीहि, आपण काहीही बोध घेतला नाही. याचं कारण आपण कृष्ण राम यांचा फक्त अध्यात्मिक दृष्टीन...

श्रीकृष्णनीती भाग २७

श्रीकृष्णनीती भाग २७ (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! महाभारताचा पूर्ण सारीपाट पहिला तर त्यात सुरवाती पासून कुरु वंशीयांची मुख्य कथा सापडते. यात मुख्यत्वे श्रीकृष्णाचा वावर इतर व्यक्तित्वाच्या तुलनेत संपूर्ण महाभारत भारून टाकतो. श्रीकृष्णाव्यतिरिक्त भीष्म हे एकच महायोद्धे आहेत जे दीर्घ काळ परिघावर वावरत आपली छाप पडतात. मुळात हि फक्त कथा नसून, एका घडलेल्या महानाटयाचं वास्तविक साद्यन्त वार्तांकन जे महर्षी व्यासांनी इथम्बुत लिहून घेतलं आणि आज मागील पाच हजार वर्ष आणि पुढेही कित्येक युगं हे मानवी मनाला आकर्षित करेल.  मुळात यातील अगणित पात्रं, प्रत्येकाचं स्वतःचा परीघ आणि त्यायोगे कथानकातील त्याचं योगदान, या सर्वांचा एकत्रित विचार करणं हे एक मोठं आव्हान आहे. इतकं दीर्घ कथानक, इतक्या दीर्घ पद्धतीने मांडणं, हेच मुळात दैवी आहे. या कथानकाच्या आधारावर कित्येक उप कथानकं वा लेख इत्यादी आतापर्यंत लिहिले गेले असतील. "व्यासोच्छिष्ट जगत सर्वं" या उक्तीप्रमाणे, जे महाभारतात नाही ते जगात अस्तित्वात असू शकत नाही. याचा प्रत्यय अनेक वेळा आणि अनेक प्रकारे येतो....

श्रीकृष्णनीती भाग २६

श्रीकृष्णनीती भाग २६ (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! पांडवांवर झालेल्या अन्यायाने संतप्त झालेले आणि त्यांच्याविषयी सहानुभूती असलेले,त्याचप्रमाणे श्रीकृष्णाचं महत्व व स्थान जाणणारे सर्व पांडवांच्या बाजूने होते आणि ज्यावेळी युद्धस्थितीपर्यंत गोष्टी गेली, त्यावेळी प्रत्येक राजाने याचा निर्णय सहज केला. कारण तोपर्यंत हि ध्रुवीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली होती. यात दोनच घटना घडल्या. एक म्हणजे मद्रनरेश शल्य जे नात्याने माद्रीचे बंधू अर्थात नकुल आणि सहदेव यांचे सख्खे मामा,यांना कपटाने आपल्याकडे वळवून वास्तविक नियम भंगाची खरी सुरवात, कौरवांनी तिथेच केली आणि धृतराष्ट्राचा दासीपुत्र युयुत्सु जो युद्धापूर्वी पांडवांच्या बाजूने आला.  त्याहीआधी द्वारकेला जाऊन कृष्णाची मदत मागण्यास गेलेल्या दुर्योधन आणि अर्जुन यांच्यात पहिला अधिकार कृष्णाने अर्जुनाला दिला. अर्थातच अर्जुनाने श्रीकृष्णाला मागून, सैन्य मागण्यासाठी आलेल्या दुर्योधनाला सैन्य देऊन, श्रीकृष्णाचं महत्व विषद केलं. परंतु बाह्य गुण धर्माला आणि सैन्य संख्या यांना महत्व देणाऱ्या दुर्योधनाला, श्रीकृष्णाचं म...

अध्यात्म विराम ११७

अध्यात्म विराम ११७ उच्च कोटींचे साधक जाणीवेच्या जगतात अत्यंत प्रगत असतात. त्यामुळे त्यांना मोजक्याच प्रतिक्रिया देण्याची सवय असते. कारण त्यांना जाणीवेच्या जगतात अत्यंत नाजूक भाव सुद्धा जाणवतात, स्पर्शतात, त्यांच्या मनात सूक्ष्मातील सूक्ष्म स्पंदनं पोचून, त्यांचं आकलन त्यांना होतं. ज्याद्वारे त्यांना अनेकांच्या मनातील भाव कळतात. ही प्रक्रिया शास्त्रीय प्रक्रिया आहे आणि यात कोणताही चमत्कार असा असतं नाही.मनातील जाणिवांची केंद्रे अभ्यासाने तीक्ष्ण किंवा अतिसंवेदनशील करता किंवा घडवता येतात . ज्याद्वारे अती सूक्ष्म संदेश लहरी प्राप्त होतात आणि त्या संदेशांचं पृथक्करण करता येतं.  ज्यामुळे या भूतलावर किंवा अंतराळात कुठेही निर्माण झालेल्या लहरींची स्पंदनं त्यांच्या जाणिवांच्या अती संवेदनशील केंद्रांना स्पर्श करून, त्यांना ते संदेशरुपात प्राप्त होतं. त्यानंतर, त्यातील कोणत्या लहरींना प्रतिसाद द्यायचा आणि कोणत्या लहरींना प्रतिसाद द्यायचा नाही, हे त्यांना ठरवता येतं. त्यानुसार ते क्रिया अथवा प्रतिक्रिया देतात किंवा शांत राहून पुढील क्रियेचा अंदाज घेतात. त्यांना प्राप्त सिद्धिमुळे, त्यांना जाणव...

अध्यात्म विराम ११६

अध्यात्म विराम ११६ जाणिवांच्या जगतात, अर्थातच आपल्या मनात किती गोष्टी एकाच वेळी, एकाच मुद्द्याबद्दल घडतं असतील आणि त्या सर्वांचा परिणाम म्हणून आपली मानसिक स्थिती तयार होते, घडते, बिघडते, पुन्हा सावरते. या सर्व घडामोडीत आपलं आयुष्य अर्थातच क्रिया आणि प्रति क्रिया यांचा खेळ असतो किंवा बनतो. अर्थात पुन्हा ते सर्व कर्माशी निगडित आहे, हे गृहितक ध्यानात ठेवूनच आपण जाणिवांचा विचार करूया. आपल्या मनात येणारे वेगवेगळे विचार,अनेक मार्गांनी,प्रसंगांनी, कारणांनी कधी विनाकारण आपण आपली मनोभूमिका तयार करतो. त्यानुसार स्वभाव तयार होतो  त्यामागे अनेक गोष्टी असतात. पण त्या सर्वांच्या मुळाशी आपल्या जाणिवांची जागृती व विकास हे नक्कीच अवलंबून असतात. म्हणजे अर्धजागृत किंवा सुप्त जाणीवा या जागृत होण्याची प्रक्रिया घडून येणं, हे देखील प्रारब्ध, संचित आणि सद्यकर्म यांच्या संयोगाने घडून येतं. ते घडण्यासाठी कर्मांची तशी जमापुंजी असणं आवश्यक आहे. कारण आता भोगावे लागणारे किंवा आपण भोगत असलेले भोग किंवा उपभोग हे मागील कर्मांचा परिणाम आहे किंवा असतो, हे नक्की. म्हणजे जाणिवांच्या सुप्त ते जागृत, या परिवर्तनासाठी आ...

अध्यात्म विराम ११५

अध्यात्म विराम ११५   जाणिवांचा विषय खूप गहन आणि क्लिष्ट आहे, हे मागे मी म्हटलं आहेच. म्हणूनच शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक जाणिवांचा गुंता तपासणं हे खूप जिकिरीचं काम आहे. यासाठीचे तज्ञ याची तपासणी करू शकतात आणि तुमची स्थिती जाणून घेऊ शकतात व त्यानुसार मार्गदर्शन करू शकतात. पण हे तज्ञ म्हणजे देहात किंवा देहातीत असलेले, चैतन्य शक्ती जागृत असलेले आणि ईश्वराची असीम कृपा प्राप्त झालेले साधू, सद्गुरू, संत महंत होत. आपण अजून पर्यंत तीनच जाणिवांची जुजबी माहिती घेतली. त्याच्या कार्याबद्दल आपण विस्ताराने नंतर पाहू.  आता भौतिक, सामाजिक या जाणिवांचा विचार करूया. भौतिक आणि सामाजिक असे दोन वेगळे मांडण्याचं कारणच तसं आहे. भौतिक म्हणजे साधारण आपल्या बाजूची भौगोलिक,परिस्थिती. ज्यामधे खगोलीय, राजकीय, इत्यादी अनेक प्रकारच्या परिस्थितीच्या जाणीवा समाविष्ट होतात. आपण आजूबाजूच्या अनेक प्रकारच्या बदलांना सामोरे जातो. त्याबाबत आपल्या क्रिया व प्रतिक्रिया या प्रकारात येतात. मुळात यातील बऱ्याच गोष्टींवर आपला प्रभाव नसतो आणि त्यातील बहुतांशी आपण प्राप्त परिस्थिती म्हणून स्वीकारून पुढे जायचं असतं. म्हणूनच...

श्रीकृष्णनीती भाग २५

श्रीकृष्णनीती भाग २५ (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! आतापर्यंत आपण महाभारतातील अनेक व्यक्तिरेखा, विशेषतः नकारात्मक, विस्ताराने पाहिल्या. त्या व्यक्तींचा आलेख , मानसिकता, काहींची अपरिहार्यता, काहींची दंभ, द्वेष याने भरलेली मानसिकता, काहींची उद्दाम वृत्ती आणि सत्तालोलुपता, महत्त्वाकांक्षा या सर्वांचा आपण अभ्यास केला.  आता हे चित्र सार्वत्रिक स्तरावर कसं होतं आणि या सर्वाचा एकत्रित परिणाम काय आणि कसा कसा होत गेला, त्याप्रमाणे हे युद्ध व्हायला कोणाची मानसिकता विशेषत्वाने कारणीभूत झाली याचा विचार करू. मुळात त्यावेळची राजकीय पार्श्वभूमी दोन स्तरात विभागता येईल. एक म्हणजे धृतराष्ट्राच्या आधीचा काळ आणि धृतराष्ट्राचा काळ.  धृतराष्ट्राच्या आधीचा काळ मुख्यता जरासंध , कंस, नरकासुर या असुर शक्तींनी व्यापलेला काळ होता. त्यातील बऱ्याचश्या शक्ती श्रीकृष्णाने नष्ट केल्या वा करवून घेतल्या. त्याच काळातील भीष्मांच्या सारख्या महारथींनी सर्वसामान्य जनतेवर अन्याय व अत्याचार कधी केला नाही. त्यामुळे त्यांच्याकडे एका वेगळ्या आदराने पाहिलं जातं होतं. त्यातही कुरु वंश...

श्रीकृष्णनीती भाग २५

श्रीकृष्णनीती भाग २५ (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! आतापर्यंत आपण महाभारतातील अनेक व्यक्तिरेखा, विशेषतः नकारात्मक, विस्ताराने पाहिल्या. त्या व्यक्तींचा आलेख , मानसिकता, काहींची अपरिहार्यता, काहींची दंभ, द्वेष याने भरलेली मानसिकता, काहींची उद्दाम वृत्ती आणि सत्तालोलुपता, महत्त्वाकांक्षा या सर्वांचा आपण अभ्यास केला.  आता हे चित्र सार्वत्रिक स्तरावर कसं होतं आणि या सर्वाचा एकत्रित परिणाम काय आणि कसा कसा होत गेला, त्याप्रमाणे हे युद्ध व्हायला कोणाची मानसिकता विशेषत्वाने कारणीभूत झाली याचा विचार करू. मुळात त्यावेळची राजकीय पार्श्वभूमी दोन स्तरात विभागता येईल. एक म्हणजे धृतराष्ट्राच्या आधीचा काळ आणि धृतराष्ट्राचा काळ.  धृतराष्ट्राच्या आधीचा काळ मुख्यता जरासंध , कंस, नरकासुर या असुर शक्तींनी व्यापलेला काळ होता. त्यातील बऱ्याचश्या शक्ती श्रीकृष्णाने नष्ट केल्या वा करवून घेतल्या. त्याच काळातील भीष्मांच्या सारख्या महारथींनी सर्वसामान्य जनतेवर अन्याय व अत्याचार कधी केला नाही. त्यामुळे त्यांच्याकडे एका वेगळ्या आदराने पाहिलं जातं होतं. त्यातही कुरु वंश...

अध्यात्म विराम ११४

अध्यात्म विराम ११४ खरतर जाणीवा हा विषय एखाद्या प्रबंधाचा विषय आहे. पण महाराज कृपेने आपण तो थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण या जाणिवांच्या किचकट आणि अत्यंत क्लिष्ट विषयावर आपल्याकडे कोणतेही, आधारभूत साहित्य फारसे उपलब्ध नाही. पण येणाऱ्या काळासाठी,याचा खूप उपयोग होईल,हे जाणून महाराजांनी हा विषय मांडायचं योजलं असावं. कारण जश्या आपल्या देहात मज्जासंस्थेचं जाळ आहे, तसच किंवा त्याहूनही गुंतागंतीचं गुह्य या जाणिवांच्या जगताचं आहे. पण ते जाणल्याशिवाय आपण अध्यात्मिक मार्गात पुढे जाऊ शकणार नाही, असा महाराजांचा होरा असावा. असो विषय पुढे नेऊया.  शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक जाणीवा गर्भात ते साधारणपणे बाराव्या वर्षापर्यंत विकसित होत असाव्यात आणि तिथून पुढे त्या प्रगत होत असाव्यात.याचं महत्वाचं कारण आपल्या धर्मशास्त्रानुसार वयाच्या बाराव्या वर्षा पर्यंत घडलेल्या अनुचित कर्माचं फल किंवा पाप गणलं जात नाही.आपलं धर्म शास्त्र पूर्ण वैज्ञानिक दृष्टीने संशोधित केलेले आणि लिहिलेले आहे. याचा एक अर्थ असाही होऊ शकतो की, वयाच्या बाराव्या वर्षा पर्यंत जाणिवांची जागृती पूर्ण होत असावी. याचाच दुस...

श्रीकृष्णनीती भाग २२

श्रीकृष्णनीती भाग २२ (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! धृतराष्ट्राकडे वळण्याआधी थोडी पार्श्वभूमी बघू. कृष्णाने कंस, नरकासुर यांसह जरासंध (भीमामार्फत) , कालयवन या व अश्या मायावी शत्रूंचा निःपात करून असुरी,मायावी शक्ती संपवल्या. खरतर असुरी शक्तींचा विनाश झाला की, सर्व स्थिर स्थावर होणं क्रमप्राप्त होतं. परंतु असं झालं नाही. याचं महत्वाचं कारण म्हणजे हा द्वापार युगाचा अंत:काळ होता. कारण कृष्णा वतार द्वापार युगाच्या अंताला झाला आहे.  यातून कलियुगाचा संदेश, जो श्रीकृष्णांनी महर्षी व्यास यांच्यामार्फत जगाला कलियुगाच्या अंतापर्यंतच्या काळा साठी दिला आहे, तो म्हणजे इथून पुढे असुरांचं अस्तित्व हे प्रत्यक्षात नसेल, आता त्यांना वा उरलेल्या असुरांना मी नष्ट केलंय . परंतु आता ते अस्तित्व रूप बदलून अहंकार, गर्व, क्रोध, दंभ, द्वेष, मत्सर, काम, मोह, लोभ, अनीती, कुसंस्कार अश्या रिपूंच्या माध्यमातून मनात घर करून असतील.  म्हणूनच त्यांचा सामना करणं हे रोजचं, नव्हे क्षणाक्षणांचं महाभारत असेल.जे प्रत्येक व्यक्तीला सामान्य, असामान्य अश्या सर्वांनाच लढावं लागेल. य...

श्रीकृष्णनीती भाग २१

श्रीकृष्णनीती भाग २१ (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! महाभारत , जे मुख्यत्वे असत्य, दंभ, दुराचार, अन्याय, लोभ,अनीती,अत्याचार,टोकाचा अभिमान, अमर्याद गर्व, यांविरुद्धची सभ्यता,सुसंस्कृतपणा,निकोप व्यवहार, नीतीमूल्य, निगर्वीपणा,न्याय याच्याशी असलेली लढाई वा युद्ध यांची महागाथा आहे.मुळात यातील काही संघर्घ, जो स्वतः श्रीकृष्ण यांचा. त्यांनी अनेक असुर शक्तींशी संघर्ष केला. ज्यात स्वतः कंस,चाणूर,नरकासुर, शिशुपाल इत्यादी ज्या सर्वांना त्याने मारलं. काही शक्ती ज्यांचा ते वध करू शकत नव्हते, त्यांना त्यानी परस्पर वा दुसर्यां करवी वध करवून संपवलं.  उदाहरणार्थ यवनासूर,जरासंध इत्यादी.श्रीकृष्णाने आपलं दैवत्व अनेक प्रसंगात सिद्ध केलं आहे. जे जन्मतः कंसाच्या कारागृहातून गोकुळला वसुदेवाच्या माध्यमातून झालेला प्रवास येथेच सिद्ध होतं.तरीही वयाच्या काही महिन्यात पुतना,तृणासुर ,वृषभासुर व बकासुर,आठव्या वर्षी कंस आणि चाणूर यांचा वध इत्यादी घटनांमधून ते दाखवून  दिलं.   श्रीकृष्णाचं अस्तित्व वा नियंत्रण देखील अनेक प्रसंगात दिसून येतं . त्यावेळच्या काही मोजक्या ...

श्रीकृष्णनीती भाग २०

श्रीकृष्णनीती भाग २० (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! (आजचा भाग हा विशेष संशोधनात्मक आहे, थोडा दीर्घ आहे. विशेष टिप्पणी अपेक्षित आहे) दुर्योधनाचं खरं भांडण वा वादाचं कारण हे पांडवांचा राज्या वरचा हक्क हा होता. मुळात त्याचं म्हणणं कि, त्याचे पिताश्री, धृतराष्ट्र हे अंध असल्याकारणाने राज्यावर बसू शकले नाहीत. याकारणे ते राज्य अनुज पांडू यांना मिळालं अन्यथा त्यांचा व पर्यायाने पांडवांचा काहीही हक्क राज्यावर नव्हता आणि नाही. याशिवाय धृतराष्ट्र हे अंध म्हणून अपात्र ठरत असले तरी त्यांचा वारस म्हणून मी पात्र आणि लायक आहे. याकारणे देखील हे राज्य कौरवांच्या हक्कात येतं. या दोन्ही कारणाने पांडव अपात्र ठरतात.  यात एक राजकीय नीतिमत्ता वा नियम जो त्याकाळी प्रचलित होता , त्या नियमानुसार एकदा एखादा राजा अपात्र ठरला आणि त्याचा हक्क दुसऱ्याला दिला कि त्या अपात्र राजाचा वंशज आपोआप बाद झाला, हे ओघानेच येत असं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे पेशवाई. पहिले बाजीराव पेशवे यांच्या निधनानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र नानासाहेब यांना हि गादी वारसा हक्काने मिळाली. त्यांच्या निधना...

श्रीकृष्णनीती भाग १९

श्रीकृष्णनीती भाग १९ (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! महाभारताचं पूर्ण युद्ध ज्या व्यक्तित्वामुळे घडलं. इतके रथी, महारथी, अतिरथी, दोन्हीकडचं मिळून अठरा अक्षौहिणी सैन्य ज्याच्यामुळे लढलं, ज्याच्यासाठी द्वारकेचा राणा, स्वयं नारायण रणांगणात सारथी झाला, ते व्यक्तित्व नक्कीच विलक्षण , तितकंच ताकदीचं, तितकंच कठोर आणि जबरदस्त असलंच पाहिजे. अन्यथा इतकं सर्व महाभारत घडलंच नसतं. अर्थातच त्या व्यक्तिविशेषांचं नाव , जे आपण सर्वांनी जाणलं ते  म्हणजे, दुर्योधन.  महाभारत युद्धाचा कर्ता करविता. मुळात याचा जन्मच एका विचित्र परिस्थितीत झाला. गांधारीला दिवस जाऊन नैसर्गिक कालावधीपेक्षा जास्त काळ गेला. त्यातच तिला भविष्यवाणी समजली होती की,तिच्या पोटी कुल विनाशक संतती जन्माला येणार आहे. या सर्वाने वैतागून तिने आपला गर्भ काढून जमिनीवर पाडला आणि उद्वेगाने व्यास महर्षींचं स्मरण केलं. साक्षात महर्षी समोर उपस्थित झाले. गांधारीने त्यांना नमस्कार करून विचारलं की, आपण तर मला शतपुत्रांचा आशीर्वाद दिला होता. व्यासऋषी म्हणाले अर्थातच.  त्यांनी तो जमिनीवरील गर्भाचा अंश ...

अध्यात्म विराम १०८

अध्यात्म विराम १०८ मुळातच माया ही स्वतः काहीच करत नाही. पण ती बुद्धीचे, मनाचे आणि परिस्थितीचे भ्रम, विभ्रम निर्माण करते आणि जीवाकडूनच सर्व कार्य घडवून घेता. त्यामुळे कर्म करणाऱ्या देहाला त्या यातना व कर्म फलं भोगावी लागतात.हा भ्रम इतका विचित्र असतो की,अनेक प्रकारचं ज्ञान उपलब्ध असूनसुद्धा, जीव या भ्रमात राहतो की, उपभोग व सुख हे मला माझ्या कर्माने प्राप्त होतं, पण जेंव्हा भोग येतात, दुःख येतं त्यावेळी हाच जीव आपली आणि आपल्या देह,मन व बुद्धी यांची जबाबदारी टाळून,ते सर्व,दैव वा नशीब या सोप्प्या विकल्पावर टाकून आपल्याला त्यातून, मुक्त करतो.  हाच मायेचा खेळ आहे. अर्धा भाग माया भ्रमात ठेवते की तूच कर्ता आहेस या सुखाचा आणि अर्ध्या भागात माया, भ्रमात ठेवते की, हे दैवाचं दान आहे. स्वीकारा वा अव्हेरा, पण असतो, आपल्याच कर्मफलाचा भाग व हिस्सा. माया दुःखही देत नाही किंवा सुखही देत नाही. माया फक्त जाणिवांची केंद्रे भ्रमित किंवा मोहित करते. त्यानुसार त्या त्या परिस्थितीत मायाग्रस्त मन, तसतसा विचार करतं आणि त्याप्रमाणे निष्कर्ष काढून, मन व बुद्धी देहाला, वाचेला कार्याला लावते. हाच खेळ अनंतापासून अ...

श्रीकृष्णनीती भाग १८

श्रीकृष्णनीती भाग १८  (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! अश्वत्थामाच्या स्वभावातील पाशवीपणा, जो त्याने रण भूमीवर काही प्रमाणात दाखवला अवेळी नारायणास्त्र वापरून, तो बहुदा त्याच्या लहानपणच्या गरिबी आणि अपमानकारक वागणुकीमध्ये असावा. कारण लहानपणी इतर मुलं दूध पिऊन यायची, त्यावेळी माता कृपी, त्याला पाण्यात पीठ कालवून हेच दूध आहे म्हणून द्यायची. परंतु खरी परिस्थिती समजल्यावर त्याला आपल्या आईची अगतिकता आणि वडिलांचा नाईलाज समजला. त्याच्या वर त्या परिस्थितीत, एकूणच नियतीचा , परिस्थितीचा आणि द्रुपद दरबारात द्रोणांच्या झालेल्या अपमानाचा खोलवर परिणाम झाला असावा. त्याकारणाने त्याचा स्वभाव टोकाचा झाला असेल. हिटलर सारख्या अनेक हुकूमशहांच्या वागण्यात आलेली क्रूरता,त्यांच्या बाल पणीच्या काळात पहाव्या आणि सोसाव्या लागलेल्या हाल अपेष्टा किंवा मिळालेल्या विचित्र वागणूक यांमध्ये असतं. अर्थात त्याने यांच्या वागणुकीचं समर्थन होऊ शकत नाही, पण विश्लेषण जरूर करता येईल.असो.  याविरुद्ध स्थिती हस्तिनापूरला आल्यावर झाली. तिथे वास्तविक भीष्मांच्या कृपेने,पण सकृतदर्शनी धृतर...

श्रीकृष्णनीती भाग:१७

श्रीकृष्णनीती भाग:१७ (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! पितामह भीष्म , गुरु द्रोण आणि महारथी कर्ण यांच्या नंतर कौरव सैन्यातील महारथी होता दुर्योधन. परंतु त्याच्याकडे वळण्याआधी आपण अजून एका महारथीचा विचार करू. अश्वत्थामा. गुरू द्रोण आणि माता कृपी यांचा पुत्र आणि महर्षी भारद्वाज यांचा पौत्र. महाभारता तील अत्यंत निर्दयी आणि निंदनीय व्यक्तित्व.  द्रोणाचार्यांनी पराक्रमी आणि शिवअंशाच्या पुत्रप्राप्ती साठी भगवान शिवाची अत्यंत उग्र तपस्या केली. त्या तपस्येने प्रसन्न होऊन द्रोण आणि कृपी यांना तेजस्वी पुत्र, जो शिवाचा अंश अर्थात ११ रुद्रांपैकी एक असेल, असा आशीर्वाद भगवान शिवांनी दिला. या वरप्राप्तीनंतर अश्वत्थामा याचा जन्म झाला. महारुद्राचा अंश म्हणून, त्याच्या कपाळावर एक दिव्य मणी जन्मतः विराजित होता. हा मणी त्याला मानवेतर सर्व जीव जसे देव, दानव, असुर, यक्ष किन्नर, इंद्र, वरुण यांपासून आणि कोणत्याही अस्त्र शस्त्र यांपासून अभयदान देत असे. म्हणजेच यांपैकी कोणीही अश्वत्थामाला मारू शकत नव्हते. अश्वत्थामाच्या जन्मानंतर द्रोणांची परिस्थिती अजूनच खालावली. इतकी ...

श्रीकृष्णनीती भाग १६

श्रीकृष्णनीती भाग१६ (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! असंगाशी संग म्हणजे प्राणाशी गाठ ही म्हण आपण ऐकली आहे आणि वाचली आहेच. मुळात प्रणाशी गाठ म्हणजे जे असंगाच्या संगतीत नाहीत ते अमर आणि असंगाशी संग करणारे मरणार इतका सोप्पा अर्थ अभिप्रेत नाही , हे नक्की. याचा जो अधोरेखित आणि गूढार्थ असा आहे तो हा की, असंगाच्या संगतीत राहिलात तर जो शेवट त्या असंगाला त्याच्या कर्माने येणार आहे वा येणे प्राप्त आहे, तोच वा तसाच शेवट हा त्याच्या संगतीने तुम्हाला प्राप्त होतो.  फक्त संगतीचा परिणाम इतका भयानक आहे, तर मग त्याच्या कृत्यातील तुमचा सहभाग किती भयानक आणि निष्ठुर मृत्यू पदरात देईल, याचा विचार केलेला बरा. नियती जेंव्हा फिरते तेंव्हा देव व दैव यातील काहीही कामाला येत नाही. तर आपल्या विहित कर्मानेच ते ठरतं. पण त्याआधी तीच नियती सावरण्याची संधी देतेच देते. जशी तिने कर्णालासुद्धा दिली होती. दहा दिवस युद्ध असून नुसतं बसवून ठेवून आणि आदल्या रात्री कुंती रूपात नियती समोर येऊन उभी राहिली.  पण माणसाची मानसिक स्थिती ढासळली की त्याची विचार करण्याची शक्ती क्षीण होते आणि...

अध्यात्म विराम १०७

अध्यात्म विराम १०७  मायेबद्दल आपण काल थोडं चिंतन केलं, ते आज पुढे सुरू ठेवूया. माया ही सृष्टीच्या आरंभी विधात्याने निर्माण केली आणि ती ब्रम्हांडाच्या अंतापर्यंत असणार आहे. पण तिचा आपल्या जीवनातील सहभाग, कार्यभाग आणि कर्मभाग किती आहे, याचा विचार करूया. कदाचित त्यात बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील.ज्याअर्थी माया ब्रम्हांड रचण्याच्या आधी होती. म्हणजेच तिचा सृष्टीच्या खेळात सहभाग आहे आणि तो राहील, ही विधात्याची योजना आहे, हे नक्कीच समजावे. म्हणजेच आपली इच्छा असो की नसो, माया पदोपदी आपलं अस्तित्व दाखवणार आणि ते अपरिहार्य आहे. मायेच्या या नित्य निरंतर सहभागाचं तार्किक आपण आधी जाणून घेऊ. माया ही, जीव देहात आहे, तोवर आपलं कार्य करत राहते. किंबहुना माया ही, ईश्वराने, जीव, देह, मन, बुद्धी, वाचा या सर्वांवर वर्चस्व गाजवून, जीवाला देहात असेपर्यंत ईश्वर. सेवेचा विचार करण्याची किंवा ईश्वराच्या आराधनेची चिंता किंवा चिंतन करू न देण्याची तिला दिलेली, ईश्वर प्रेरित आज्ञा पालन करत राहेत. ईश्वर प्रेरित या शब्दात सर्व काही स्पष्ट होतं. तरीही हा शब्द आणि त्याचा गर्भितार्थ नीट समजून घेऊया. ईश्वराची खरी इ...

श्रीकृष्ण नीति १४

श्रीकृष्ण नीति १४ (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला) श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! दुर्योधनाबरोबर असलेलं व त्याचप्रमाणे त्याच्याबरोबरच संपलेलं अजून एक महान व्यक्तित्व. ज्याच्या दुर्दैवाचा फेरा जन्माने सुरू होतो.एक शूरवीर उपेक्षित राहिलेला, क्षत्रिय असुनही सुतपुत्र म्हणून हिणवला गेलेला, अजेय योद्धा असूनही अपात्र ठरलेला,अस्त्र शस्त्र, दिव्यास्त्र असूनही त्याचा वापर न योग्य समयी करता आलेला, जन्माचं रहस्य माहीत नसल्यामुळे भगवान परशुराम यांच्याकडून शिक्षण घेऊनही मिळालेल्या शापामुळे, त्या अस्त्रांचा उपयोग न करू शकलेला असा अलौकिक वीर, पण प्रारब्धाच्या विचित्र चक्रात अडकलेला महावीर, दान वीर कर्ण. जिथे क्षत्रियत्व सांगावं लागलं आणि तिथे ते मान्य झालं नाही, परंतु श्रीपरशुराम यांच्याकडे,क्षत्रिय नाही या समजुतीने, ग्रहण केलेलं अस्त्र शस्त्र ज्ञान, त्यांनी निव्वळ एका प्रसंगवरून क्षत्रियत्व ओळखूलं, म्हणून शाप दिलेला.  जन्मतः शरीरावर कवच आणि कानात अजेंयत्वाची कुंडलं मिळालेला, परंतु योग्य वेळीच ही कवचकुंडलं काढून घेण्यात आलेला. सुर्यपूत्र आणि ज्येष्ठ कौंतेय असूनही रिक्त हस्त असलेला, जीवन...