भोग आणि ईश्वर १८२ दोन्ही प्रकारची माणसं, अर्थात नकारात्मक व सकारात्मक, आपण मागच्या दोन लेखात पाहिली. त्यामुळे हा विषय संपला असं होणार नाही. कारण या दोन्ही प्रकाराच्या मध्ये काहीजण आहेत व असतात. ती म्हणजे नेहमी द्विधा मनःस्थितील व्यक्ती. म्हणजे जे नेहमी गोंधळलेले असतात. ज्यांना सर्वच बाजू योग्य वाटतात. त्यामुळे हे योग्य की ते यावर नेहमी त्यांच्या मनात खल अर्थात वाद चालू असतो. या प्रकारातील लोकांना कोणतीही गोष्ट, कोणीही सांगितली की पटते. म्हणजे यांचं स्वतःचं मत काय आहे हे, यांना स्वतःला ठाम माहीत नसतं किंवा यांची ठाम भूमिका कधीच ठरलेली नसते. आपल्या विषया संदर्भात बोलायचं झाल्यास, नाम साधना, पूजाअर्चा इत्यादी विषयी आपण त्यांना जे सांगू ते यांना पटतं. त्यावर विचार करून, हे कार्य सुरू करतात. सर्व सुरळीत आहे वा चालेल, या विचारात ते स्वतः असताना, एखादा दुखावलेला वा प्रसंगोपात अविश्वास निर्माण झालेला एखादा स्नेही यांना भेटतो. यांना आपण करत असलेली साधना वा नामस्मरण याबद्दल, खुंटा हलवून बळकट करायची इच्छा असते किंवा इच्छा निर्माण होते. कारण यांचं स्वतःचं मत ठाम नसतं आणि कायम दुसऱ...