भोग आणि ईश्वर ३२ भोग आहेत हे कळलं, त्याचं कारण सुद्धा जाणलं की आपलंच कर्म आणि त्याचं परिमार्जन भोग भोगणे, सद्गुरू सान्निध्यात नामस्मरण करणे. पण कळतं तरी वळत नाही. मुळात नाम म्हणजे काय. आपल्या सद्गुरूंनी सांगितलेलं, त्यांच्या नित्य साधनेतील किंवा जर आपण गुरू केले नसतील तर दत्तगुरूंना शरण जाऊन त्यांच्या नामाने जप सुरू करावा, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याचं कारण असं की, गुरूपद हेच मुळात श्रीदत्तगुरुमाऊली यांच्या पासून सुरू झालं. त्यामुळे योग्य वेळ आली की तेच तुम्हाला तुमच्या भाग्ययोगातील सद्गुरूंची भेट घडवतील आणि तो भाग्ययोग प्रारब्धानुसार, कर्मबंधनानुसार आणि आपल्या साधनेनुसार ठरेल. ते जेंव्हा ठरवायचं असेल तेंव्हा ठरवेल प्रारब्ध, पण आपण जप आताच सुरू करायला हरकत नाही. आपल्या उद्धाराच्या मार्गावर आपण लवकरात लवकर वाटचाल सुरू करणं हे गरजेचं आहे. त्याशिवाय कर्मबंधनं सुटण्याची वेळ दूर जात राहील. म्हणजेच जर ते काम पुढील जन्मी होणार असेल तर ते अजून पुढे जाईल, कारण आपण सुरवातच मुळात उशिरा करतो आहोत. त्यामुळे निःसंकोचपणे सुरवात करून त्याचा नित्य जमेल तितक...