Skip to main content

Posts

Showing posts from 2020

भोग आणि ईश्वर ३२

भोग आणि ईश्वर  ३२     भोग आहेत हे कळलं, त्याचं कारण सुद्धा जाणलं की आपलंच कर्म आणि त्याचं परिमार्जन भोग भोगणे, सद्गुरू सान्निध्यात नामस्मरण करणे. पण कळतं तरी वळत नाही.  मुळात नाम म्हणजे काय. आपल्या सद्गुरूंनी सांगितलेलं, त्यांच्या नित्य साधनेतील किंवा जर आपण गुरू केले नसतील तर दत्तगुरूंना शरण जाऊन त्यांच्या नामाने जप सुरू करावा,  असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याचं कारण असं की,  गुरूपद हेच मुळात श्रीदत्तगुरुमाऊली यांच्या पासून सुरू झालं. त्यामुळे योग्य वेळ आली की तेच तुम्हाला तुमच्या भाग्ययोगातील सद्गुरूंची भेट घडवतील आणि तो भाग्ययोग प्रारब्धानुसार, कर्मबंधनानुसार आणि आपल्या साधनेनुसार ठरेल. ते जेंव्हा ठरवायचं असेल तेंव्हा ठरवेल प्रारब्ध, पण आपण जप आताच सुरू करायला हरकत नाही.  आपल्या उद्धाराच्या मार्गावर आपण लवकरात लवकर वाटचाल सुरू करणं हे गरजेचं आहे. त्याशिवाय कर्मबंधनं सुटण्याची वेळ दूर जात राहील. म्हणजेच जर ते काम पुढील जन्मी होणार असेल तर ते अजून पुढे जाईल, कारण आपण सुरवातच मुळात उशिरा करतो आहोत. त्यामुळे निःसंकोचपणे सुरवात करून त्याचा नित्य जमेल तितक...

भोग आणि ईश्वर ३१

भोग आणि ईश्वर  ३१     पूर्ण शरणागती ही मन आत्मा आणि शरीर या तिन्हीद्वारे पत्करून अनन्य भावे गुरूंना शरण जाऊन फक्त लीनपणे नमन करून आपली व्यथा, चिंता, काळजी त्यांना सांगायची, जर काही चूक घडली असेल तर त्याबद्दल क्षमा मागायची. आपली  नित्य साधना मात्र अखंडपणे सुरू असावी, त्यात खंड नको आणि सुटकेसाठी मनोभावे प्रार्थना करावी. सद्गुरू हे योग्य असेल तेच करतील.  आपली प्रार्थना, आपली इच्छा आणि आपल्या मनाची शक्ती श्रद्धेद्वारें आपल्या सद्गुरूंपर्यंत पोहोचते. श्रद्धेची ताकद ही देहाहून अधिक असते. त्यामध्ये दृढता आणि संकल्प असेल तर भगवंतालादेखील बोलावण्याची शक्ती व क्षमता ही श्रद्धेत असते. आपल्या श्रद्धेच्या तरंगलहरी गुरूंच्या हृदयापर्यंत पोहोचतात. त्यांना त्या स्पंदनातून आपल्या मनातील व्यथांची जाणीव होते. तसं त्यांचं आपल्याकडे लक्ष असतंच. त्यामुळे त्यांना सर्व ज्ञात असतं. परंतु आपल्याकडून वदवून घेण्यामागे पूर्ण शरण जाण्याचा भाव मनात आला पाहिजे, इतकाच हेतू त्यामागे असू शकेल. यात आपले भाव शुद्ध होऊन भक्तीमध्ये अनन्यता येते. ज्ञान माणसाला अधिक अधिक वर नेतं. परंतु त्याचबरोबर अहं व...

भोग आणि ईश्वर ३०

भोग आणि ईश्वर  ३०     गुरुकृपेचा महिमा अपरंपार आहे आणि गुरूंची महती अनंत आहे. प्रारब्धाच्या भोगातून ईश्वरसुद्धा वाचवू शकत नाही. परंतु त्या भोगातून सुटका करण्याची अथवा त्या भोगाचा ओघ कमी करण्याची अपार शक्ती सद्गुरूंकडे आहे. कारण गुरू हा करुणेचा सागर आणि कृपेचा सिंधू आहे. सद्गुरूंकडे फक्त क्षमा, सुख, समाधान, शांती आहे आणि याचीच साधकाला जरुरी असते. आपण भोगाच्या वाटेवर असताना भोग भोगण्याचा एक विकल्प मनुष्याकडे असतो. पण मनुष्य योनी सोडून बाकी सर्व योनींमध्ये फक्त भोग हा एकच विकल्प आहे. मानवाला अफाट बुद्धी, मनाची अनंत शक्ती आणि कोहम ते सोहम पर्यंत जाण्याची क्षमता आहे.  मुळात मी त्रस्त का आहे हे जाणण्याची जिज्ञासा माणसाला सुटकेच्या जवळ पोहोचवते, मात्र इच्छा उत्पन्न व्हायला हवी.  परंतु या नंतरची वाटचाल ही भोगमुक्तीकडे व्हायची असेल तर सर्वात सुलभ मार्ग म्हणजे सद्गुरू कृपा आणि पूर्ण शरणागती. सद्गुरू यासाठी की आपल्याला काहीच माहित नसलेल्या वाटेवर मार्गक्रमण करणार आहोत आणि सद्गुरू हे त्या वाटेवर जाऊन त्याचा अनुभव घेऊन स्वतःला त्यातून सोडवून आणलेले असतात. त्यामुळे त्याच्या ख...

भोग आणि ईश्वर २९

भोग आणि ईश्वर  २९     आतापर्यंत आपण जे वाचलं त्याचा भावार्थ, आपल्या भोगाचे भागीदार फक्त आपण आहोत. त्याचं फलित कधी, कुठे आणि कोणत्या रुपात व कोणत्या जन्मात समोर येईल हे ईश्वरसुद्धा सांगू शकणार नाही. अनेक जन्मातील हे भोग असतात ते व्यक्ती, प्रसंग, संकटं अश्या कोणत्याही रुपात समोर येऊन आपला धर्म बजावून जातात. कित्येकवेळा आपण बेसावध असताना हल्ला केल्यासारखं हे फलित समोर येतं.  आपणच त्याचे कर्ता धर्ता असल्यामुळे या सर्वांचा हर्ता जो ईश्वर आहे, त्याच्या चरणांशी जाऊन, त्याच्याकडे घडलेल्या प्रमादांची क्षमायाचना करून, कृपेची कामना करणं हा एक उपाय आहे. अन्यथा भोग असल्यामुळे ते भोगूनच संपवणं हा निरुपाय आहेच आपल्यासमोर. परंतु ज्यावेळी एखादा विकल्प उपलब्ध असेल, त्यावेळी त्या विकल्पाचा विचार उपचार म्हणून वा रोगमुक्त होण्याचा पर्याय म्हणून करायला हरकत नाही. पण प्रत्यक्ष परमेश्वराला साद घालून, त्याच्याकडे आपली हाक जायला, आपल्या पदरी तेवढं पुण्य असायला हवं. तसं पुण्य जोडण्याचा कलियुगात सोप्पा उपाय म्हणजे नामस्मरण. असं नाम चिरंतन, नित्य घेत मार्गक्रमण करताना अनेक युगांच्या पापांच्या रा...

भोग आणि ईश्वर २८

भोग आणि ईश्वर  २८     गुरुपदी जो आसनस्थ झाला तयांसी विशेषाधिकार मिळाला आत्म्यासी करुनी उन्नत जगती सद्गुरूने त्याचा कार्यभार वाहिला जगताच्या उद्धारात आणि आत्म्याच्या प्रवासात जन्ममृत्युचं स्थानक येतं जातं. आत्मा नित्य एका देहातून दुसऱ्या देहात मृत्यूच्या माध्यमातून अनंतकाळपर्यंत फिरत राहतो. कर्माच्या राशी नित्य ओतून, त्यांचे मोल मोजून, अवनती करत राहून, कधी मागे तर कधी पुढे असा उलटसुलट प्रवास करून आपण कुठे आहोत आणि कुठे जायला हवं हे कळत नसल्यामुळे पथभ्रष्ट, मतीभ्रष्ट अवस्थेत फक्त भोग भोगत आणि कर्माचा पसारा मांडत जीव हरवून जातो.  आपण भोगतोय ते का आणि माझी काही चूक नसताना मी का या चक्रातून आणि चरकातून फिरतोय हे उमगत नाही आणि उमगलं तरी मार्ग सुचत नाही. अश्याच अभागी आणि दुर्दैवी जीवांच्या उद्धारासाठी परम ईश्वर परम आत्म्याने एक व्यवस्था निर्माण केली, ती म्हणजे सद्गुरू. व्यवस्थापनाच्या परिभाषेत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मधला दुवा असलेल्या व्यवस्थापकांसम मध्यस्थ म्हणजे सद्गुरू. यांचा अधिकार हा प्रसंगी विधात्यासमान असतो. म्हणूनच तश्याच अधिकाराची व्यक्ती त्या...

भोग आणि ईश्वर २७

भोग आणि ईश्वर  २७      या चार पायऱ्या सतत करत राहिल्याने लगेचच मन आपल्या ताब्यात येऊन आपसूक सरळपणे वागायला लागेल असा काही भाग नाही. कारण तसं जर इतकं सहज असतं, तर समर्थांना मनाचे श्लोक लिहिण्याचे कष्ट घ्यावे लागले नसते. पण या ४  गोष्टींचा प्रयास सतत केला तर नक्कीच  आत्मविश्वास नक्की येईल. त्याच आत्मविश्वासाने इच्छाशक्तीचा जोर वाढेल.  या सर्वांमागचा उद्देश ज्यावेळी भोग भोगत असतो किंवा दुष्टचक्रातून किंवा  नकारात्मक काळातून जात असतो, त्यावेळी मनाची स्थिरता टिकवण्यासाठी, या पूर्वतायरीचा उपयोग होऊन, मनःस्वास्थ्य टिकवून, आपण त्या नकारात्मकतेच्या फेऱ्यातून, विचाराने वाहावत जाणार नाही, त्याचप्रमाणे यावर आपण जो उपाय करू त्यावेळी ते करत असताना मन आपल्याला मागे खेचणार नाही. मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये मनःस्वास्थ्य टिकवणं गरजेचं आहेच, विशेषतः आपल्याला ज्यावेळी नकारात्मक अनुभव यायला सुरवात होते, त्यावेळी आपण सर्वात प्रथम देवाला,नन्तर दैवाला आणि प्रारब्धाला नाव ठेवायला सुरवात करतो. त्यावेळी हे विसरून जातो की हे आपल्या दृष्टीने चुकीच्या वेळी आलेले, पण काळाच्...

चंद्र नभीचा अन धरेचा

चंद्र लपला झाडाआड  खेळ प्रीतीचा चालला माझ्या सखीला पाहण्या मुक्त उधळीत चांदण्याला किती दूर तरीही धग त्याच्या असूयेची जाणवे माझ्या सखीकडे पाहून न रोखू शके मत्सराला अन्यथा इतुके बरसून  चांदणे चंदनी व्हायचे परी पाहून मम सखी उष्मा त्या चांदण्याला मी न रोखू शके त्याला पाहण्या मम सखेला  परी तिचा चेहरा झाकून सुख मिळे त्यास पहायला ©® कवी: प्रसन्न आठवले २६/१२/२०२० २२:५४

नाममय जगणे व्हावे

नाममय जगणे व्हावे मनातल्या भिंती अनेक तुटून पडती नामाने  मग उरे शेवटी एक कप्पा सारी जळमटे जाती नामाने मनातले कडू गोड आठव मनास हर्ष दुःखच देती  जयास जाळून उरे शेवटी नाम अमृतघन बरसती अद्भुत करणी नामाची विचार त्यामागे जाता हाती उरतो प्रारब्धभोग नाम करी सुघट तया गोडी लावून घ्या नामाची विचार सारे सरळ होती नामाच्या धारेने शीतल उन्हे नकाराची विरती अलौकिक महती नामाची श्रीमहाराज स्वये सांगती हात धरुनी महाराज स्वतः भक्तांना कडेवर फिरवती ©® कवी : प्रसन्न आठवले २७/१२/२०२० ०७:५०

आयुष्य आहे फुलवावयाचे

आयुष्य आहे फुलवावयाचे तळ्यातल्या  कमळाप्रमाणे आयुष्य आहे फुलवावयाचे जगणे हवे पाकळ्यांप्रमाणे  क्षण भ्रमराचे अडकवायचे उल्हासित क्षण माना आपुले  त्यांच्यासवे जग जगावायचे जखमा घाव सोडून द्यावे दुःखाचे क्षण सोडवायचे  आयुष्य आहे फुलवावयाचे भिंतीवरीच्या दिनदर्शिकेसम गेले दिन ना आठवावायचे येणारे दिन येतील येतील आताचे क्षण जगावयाचे आयुष्य आहे फुलवावयाचे मिळतील जितुके क्षण क्षण आयुष्य जगणे त्या क्षणांचे फुलतील पाकळ्या मनाच्या त्यांनाही फुकुनी द्यावयाचे  आयुष्य आहे फुलवावयाचे उपकार नाही उपचार नाही दिले आयुष्य साधावयाचे जोडून मन नित्य निरंतर मनास कोमेजून न द्यायचे आयुष्य आहे फुलवावयाचे उरतील शेवटच्या क्षणाला आठव सुख समाधानाचे इतुके जमले तरीही आपण बांधले  सुत हे जगावयाचे  आयुष्य आहे फुलवावयाचे ©® कवी : प्रसन्न आठवले २७/१२/२०२० ०८:४१

भोग आणि ईश्वर २६

भोग आणि ईश्वर  २६     मनाच्या नकाराविरुद्ध वागून बघण्याच्या प्रयोगातील दुसरी पायरी पाहिली ती म्हणजे जे आवडत नाही ते करून बघणं. त्याआधी शांत बसून मनाचा खेळ पाहिला. आता पुढे आपण एक नवीन प्रयोग करूया. पण त्याआधी हे सर्व का करायचं व  भोग आणि ईश्वर या शिर्षकाखालील मालिकेशी याचा संबंध काय याचा जरा विचार करूया. कारण काही जणांनी शंका काढली, व्यक्तिगत माझ्याशी बोलताना की, विषयांतर तर होत नाही ना, म्हणून जरा खुलासा. मुळात आपण आपल्या भोगांबद्दल बोललो त्यावेळी हा विचार केला की, जे येईल ते स्वीकारून पुढे जायचं आणि तद्नंतर यावर उपाय काय हे बघायचं. पण मुळात या खेळात मन हेच एक महत्वाचं माध्यम आहे, जे आपल्याला जीवनात सर्व बाबतीत मदत करतं किंवा खोडा घालतं. उत्साह, आळस, मोह, मद, मत्सर, निराशा, आशा, घाई, शांतपणा, राग, क्रोध, वासना यासह विविध भावाअवस्था असलेल्या मनाला क्षणात वेगळ्या वाटेवर नेणं किंवा पटलं तरी कार्य करण्यास कचरणाऱ्या वा कृतीस साथ न देणाऱ्या मनाला, प्रवृत्त करण्यासाठी, त्याला नियंत्रणात आणणं गरजेचं आहे. तरच जे पटतंय त्यावर मार्गक्रमणा करण्यास ते साथ देईल. कारण इच्छा आणि कृ...

भोग आणि ईश्वर २५

भोग आणि ईश्वर  २५     मनाला स्थिरता येण्याची पहिली पायरी त्याला मनसोक्त बागडू देणं. कदाचित हा थोडा वेगळा प्रयोग वाटेल.  पण यातून एक गोष्ट कळते ती म्हणजे असं बागड म्हटलं तरी मन तसं करेल असं नाही. कारण मन हे बंडखोर आणि व्रात्य मुलासारखं असतं. ज्यावेळी आपण त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा जास्त उसळी मारतं. पण ज्यावेळी त्याला जाणीवपूर्वक निरंकुश करू त्यावेळी ते फार बंडखोरी करत नाही, असा माझा अनुभव आहे. तरीही प्रत्येकाच्या मूळ वृत्ती व स्वभावानुसार या अनुभवात फरक पडू शकतो. पण मूळ तत्व तेच आहे की, जेंव्हा आपण काही न करता बसण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी ते जास्त त्रास देतं, नको ते विचार, नको त्या गोष्टी विचारात येऊन, जाणवून देतात की, आम्ही स्वस्थ बसणार नाही.  आपण हाच धागा पकडण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून त्याचं  काही दिवस निरीक्षण करा., ज्यामुळे विचारांची दिशा, मनाचा स्वैर ओढा कुठे आहे याचा स्वतःला अंदाज येईल. कारण ज्यावेळी आपण शांत असतो, अर्थात बाह्यांतरी जेंव्हा आपण शांत असतो, त्यावेळी आत त्या मनाला खदखद होत असते. पण एक लक्षात घ्या, हा प्रयोग सतत काही दिव...

ll सद्गुरू बोध ll

ll सद्गुरू बोध जाणा ll सद्गुरुचरण वंदन हाची धर्म एक जाणा  बाकी खेळ मनाचे अधिक उणे न माना चरण नमन सद्गुरूंचे  साधते हित जन्मांचे अहित न करणे  बोध गुरुवचन जाणा सद्गुरुचरण वंदन हाची धर्म एक जाणा  मन क्षणक्षण चंचल त्यासवे न व्हावे चल त्याला नित्य नामात बांधणे  वर्म हे जाणा सद्गुरुचरण वंदन हाची धर्म एक जाणा  करणे न काही कर्मधर्म  पालन गुरूआज्ञा हे मर्म साशंक न राहणे गुरू करतील हे जाणा सद्गुरुचरण वंदन हाची धर्म एक जाणा  प्रारब्धाने काही होवो कर्मबंधाचे फल ते येवो श्रेष्ठ नामभक्ती तुज तारेल इतुके समजाना सद्गुरुचरण वंदन हाची धर्म एक जाणा  ©® कवी : प्रसन्न आठवले २४/१२/२०२० ०७:२९

भोग आणि ईश्वर २४

भोग आणि ईश्वर  २४      मनाला मना सांगता का न येते स्थिरचित्त क्षणमात्रही ते न होते विधिलिखित होणे प्राप्त असुनी मला या मनाचे काही न उमगते मुळात जी गोष्ट आजपर्यंत कधीही एका ठिकाणी स्थिर करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला नाही अथवा केला असेल तर सोडून दिला असेल, ती अचानक करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण त्याला धरून बसवणं अशक्य वाटत आहे. बऱ्याच गोष्टींची सुरवात ही खूप लहान असताना करावी. कारण त्या वयात मनसुद्धा कोवळं असतं, कुंभाराच्या मातीसारखं. त्याला जशी सवय लावू तशी ती लागू शकते, त्या वयात. अजूनही आठवून बघा, त्या वयात शिकलेली स्तोत्र, मंत्र, सुभाषितं, कविता, काही आवडत्या लेखकांची पुस्तकं इत्यादी सर्व आजसुद्धा बऱ्यापैकी पाठ असेल आणि थोड्याश्या प्रयत्नाने पुन्हा त्याच पद्धतीने परत सुरू करू शकतो आपण. कारण मनाला जे शिकवू, त्या वयात, ते आयुष्यभर शिदोरीसारखं पुरतं. खूपवेळा अगदी एकेकदा ऐकलेलं सुद्धा लक्षात राहतं. कारण त्या वयात व्यावधानं, व्याप, व्यवहार, व्यस्तता कमी असते. मेंदूच्या पेशीत अजून काही ज्ञान माहिती साठलेली नसते. त्यामुळे जे जाईल ते साठत जातं. कायमस्वरूपी कोरलं जातं...

भोग आणि ईश्वर २३

भोग आणि ईश्वर  २३     आपल्याला बऱ्याचश्या गोष्टी कळतात, काय करावं हे देखील कळतं. पण मन हे असं रसायन आहे की ते काही केल्या बऱ्याचश्या गोष्टी करू देत नाही. मुळात मन शांत रहात नाही. हीच मोठी समस्या आहे. मनाला अनेक जणांनी अनेक तऱ्हेने समजावून, कश्या प्रकारे त्याला शांत करून, नियंत्रित करण्याचा प्रयत्न करावा, याबद्दल मार्गदर्शन केलं आहे. यात सर्वात मोठं योगदान आहे ते समर्थ रामदासस्वामी यांचं.  त्यांच्या मनाच्या श्लोकांचा नीट अभ्यास केला तर लक्षात येईल की किती तऱ्हेने त्यांनी मनाचा अभ्यास करून, मनाच्या सर्व भावावस्था जाणून, मनाची चलबिचल, तगमग, ओळखून त्याला आपल्या वचनांनी समजावून, चुचकारून, अंजारून गोंजारून पदोपदी त्याला मित्रासम वागवून प्रसंगी त्याला दटावून , धाक भीती दाखवून आपल्या इप्सितासाठी अर्थात आपल्या सद्इच्छेप्रमाणे त्याला कार्यास लावून सन्मार्ग, सुसंगती या माध्यमातून अंतिम उद्देशाप्रत नेऊन एक आदर्श व्यक्तित्व म्हणून कसे घडावे याचं उत्तम विवेचन व विश्लेषण करून मार्ग देखील सांगितले आहेत. खरतर त्यातील उपदेश अंमलात आणला तर माणसाचं आयुष्य सकारात्मक होऊन, स्वऊर्जेचा योग्...

भोग आणि ईश्वर २२

भोग आणि ईश्वर  २२    कोणती वैचारिक बैठक ते पाहू. मुळात एक गोष्ट सर्वात प्रथम स्वीकारणं जरुरी आहे की, काल आज आणि उद्या मला जे भोगावं लागलं, लागतंय, लागेल ते सर्व माझ्याच पूर्वकर्माचं फलस्वरूप आहे. हे एकदा तत्वतः मनाला पटलं की मग, मन याची इतर कारणं शोधून दुसऱ्यावर दोषारोप करण्याच्या फंदात पडणार नाही. आपल्या संबंधाने वा आपल्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट ही आपण पेरलेल्या बीजाचं उगवून मोठं झालेलं झाड आहे हे मनाशी पक्के केलं की बरेच प्रश्न मनातून सुटतात व मन त्या नकारात्मक प्रश्नांचा मग सोडून देईल.  याबाबतीत मनात संदिग्धता असता कामा नये. किंबहुना कोणत्याही कार्यात मन साशंक वा संदिग्ध असेल तर त्याचा परिणाम मनातील सकारात्मक ऊर्जेवर होऊन मनाच्या अर्थात मनातील इच्छेच्या शक्तींवर नक्कीच होतो. म्हणून साशंक मनाने कोणतही कार्य करू नये, अगदी विचार सुद्धा करू नये, निष्कर्ष चुकीचे निघतात आणि निर्णयसुद्धा. म्हणून शंका न काढता मनाला पटलं असेल तर पुढे जाणं इष्ट आहे. एकदा मनाने पक्के ठरवलं की जे घडतंय वा घडणार ते माझ्यामुळे की मग त्यावर उपायसुद्धा मीच करू शकतो. म्हणजेच मला  स्वतःला या...

भोग आणि ईश्वर २१

भोग आणि ईश्वर  २१    प्रत्येक कुढीत असलेलं तेच चैतन्य कुढी अर्थात देहाच्या गुणधर्मानुसार आपल्या शक्तीचा प्रभाव दाखवतं. म्हणून ते जेंव्हा छत्रपतींच्या देहात प्रवेश करतं त्यावेळी एका ऐतिहासिक कामगिरीचा प्रत्यय संपूर्ण आयुष्यभर दाखवतं आणि तेच औरंजेबाच्या देहात मूर्तिमंत क्रौर्याचं प्रात्यक्षिक दाखवतं. अश्या या दोन टोकाच्या देहात असणारं एकच चैतन्यतत्व फक्त देह, देहातील वृत्ती, माया इत्यादी भिन्न असल्याकारणाने इतकं विरुद्ध रूप दर्शवतं, म्हणजे नक्की कोण श्रेष्ठ आत्मा की देह हा प्रश्न पडतो. यासाठी पुन्हा आपण दिव्याच्या उदाहरणाकडे जाऊ. वीज आहे म्हणून दिवा लागतो किंवा गिझर चालतो की हे दोन्ही आहेत म्हणून वीज कार्य करते. प्रश्न क्लिष्ट वाटेल पण उत्तर तितकं कठीण नाही. यातून हेच सिद्ध होतं की, दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत.  म्हणजेच चैतन्यविरहीत देह हा शून्य आहे त्याचप्रमाणे देहाशिवाय चैतन्यशक्ती अकार्यक्षम आहे. अन्यथा आत्मा एका देहातून दुसऱ्या देहात गेलाच नसता. त्याला प्रत्येक वेळी कर्मफलाचा हिशोब चुकता करण्यासाठी देह हा लागतोच अन्यथा तो योग्य संधीसाठी अर्थात जन्मासाठी फिरत रा...

भोग आणि ईश्वर २०

भोग आणि ईश्वर  २०    आतापर्यंतच्या सर्व भागात अजूनही मी कोण याचा पुरेसा उलगडा झाला नसेल, अस मानून, पुन्हा एकदा थोडा वेगळा विचार वा वेगळं चिंतन करूया. अनेक स्तोत्रात, मंत्रात देवाविषयी लिहिताना जे लिहिलं जातं, त्यातील अथर्वशीर्षातील प्रातिनिधिक समजून विचार करूया. त्वमेव केवलं कर्तासी, धर्तासी, हर्तासी,त्व साक्षादात्माऽसि नित्यम्, त्वं प्रत्यक्षं ब्रम्हासी, त्वं मूलाधारस्थितोसी नित्यम, सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति,सर्वं जगदिदं त्वयिलयमेष्यति,सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. याचा अर्थ  विस्तारपूर्वक लिहिता येईल, पण आता याचा संक्षिप्त अर्थ पाहूया. तूच कर्ता, धर्ता, हर्ता म्हणजे करणारा, धरणारा आणि हरणारा. म्हणजे तूच कार्य करता व करविता आहेस, तूच जगाला धारण करणारा आहेस आणि तूच संकट हरण करणारा आहेस. तूच स्वतः प्रत्यक्ष ब्रम्ह आहेस, अर्थात ब्रम्ह म्हणजे सर्व ब्रह्मांड तूच आहेस. सर्व जगात तुझंच अस्तित्व आहे, सर्व जग तुझ्या ठायी आहे, सर्व जग तुझंच प्रतिरूप आहे, सर्व जगात तुझाच प्रत्यय येतो आहे. या सर्वातून लक्षात येणारा अर्थ म्हणजे तूच तू सर्वत्र आहेस,...

भोग आणि ईश्वर १९

भोग आणि ईश्वर  १९    मुळात हे ब्रह्मांड का आहे, आपण का आहोत चराचर का आहे हे जाणलं की यात मी कोण आणि माझं अस्तित्व काय व का हे आपोआप लक्षात येईल.  असं समजून घ्या की परमेश्वर एक खूप मोठा आचारी आहे आणि उत्तम पदार्थ बनवण्याची इच्छा त्याला जागृत झाली. त्यासाठी स्वप्रेरणेने व स्वसंकल्पाने ब्रह्मांडरूप पदार्थ जमा केले त्यात जगतरुपी कढईत स्थिर व चल जीवसृष्टीचा उत्तम स्वयंपाक तयार करण्याची योजना आखली आणि कार्यान्वित केली.  उत्तमोत्तम जीव जन्माला आले,जग फुलू लागलं. पण कितीही नाही म्हटलं तरी प्रत्येक पदार्थाचा स्वतःचा गुणधर्म असतो आणि असे असंख्य पदार्थ एकत्र आल्यानंतर त्या एकत्रित पदार्थात, जो घटक जास्त तो वास, ती चव त्या पदार्थाला येणार. जगाचंही तसंच झालं.  त्यात भरीसभर म्हणून मायारुप मसाला या पदार्थात मिसळून त्याला जरा चवदार करू अश्या विचाराने माया मिसळली, ज्या जीवांना त्या मसाल्याचं आकर्षण वाटलं ते त्या मायेच्या मसाल्यात लुप्त होऊन आपलं अस्तित्व हरवून बसले. ज्यांना त्या मायेच्या मोहाची गोडी लागली नाही, ते आपलं स्वत्व टिकवून वेगळे उरले. त्या मायेत गुरफटून अस्तित्वही...

जीझस ख्राईस्टच्या मिथकाची सत्यकथा

जीझस ख्राईस्टच्या मिथकाची सत्यकथा          Date: 17-Dec-2020 जीझस ख्राईस्टच्या मिथकाची सत्यकथा   प्रत्येकाची धार्मिक निष्ठा आणि श्रद्धा हा नेहमीच आदराचा विषय असतो आणि असावा. मात्र जेव्हा आपल्या धार्मिक श्रद्धांना धक्का लागावा आणि धर्माधिष्ठित समाजरचना कोलमडून पडावी यासाठी करोडो रुपये ओतून मुद्दाम प्रयत्न केले जातात तेव्हा ते एकप्रकारे वैचारिक आणि धार्मिक युद्धच असते. आणि अशी युद्धे लढताना अशा धार्मिक भावना किंवा श्रद्धांचा विचार करता येत नाही! तर... थोडं भूतकाळात.. इसवी सन १९४७-४८ आजच्या इस्त्राएलमधला, मृत समुद्राजवळचा कुमरान नावाचा भाग होता. तिथल्या डोंगराळ भागात काही मेंढपाळ आपल्या मेंढ्या चरवायला घेऊन गेले होते. मेंढ्यांना चरायला सोडून तिथल्याच जवळच्या गुहांमधून भटकत असताना त्याना एका गुहेत काही जुनी मडकी आणि त्या मडक्यांमध्ये काही भेंडोळी सापडली. काहीतरी जुनी आणि फारच प्राचीन वस्तू दिसते असा अंदाज आल्यामुळे त्यांनी ती मडकी बेथलेम(जेरुसलेम) मधील एक फ्रेंच कॅथेलिक चर्चच्या स्वाधीन केली. नंतर तेथील आजूबाजूच्या एकूण अकरा गुहांमध्...

पराधीन आहे जगती या चालीवर

गीतरामायणातील "पराधीन आहे जगती" या गीताच्या चालीवर मी लिहिलेलं गीत आपल्यासाठी. ज्याला शक्य आहे त्याने हे गीत गाऊन बघावे  कर्मगती बांधे मनुजा कर्मबंधनात कर्म हेच आहे पुण्य कर्म हेच पाप कर्म करुनी सुटला इथून  नाही कोणी ऐसा भोगणेच हे  निर्वाण एक मार्ग ऐसा कर्म एकही ना करणे हाही कर्मभाग कर्म हेच आहे पुण्य कर्म हेच पाप अकर्मी न राहू जाणे येथ कोणी जीव कर्मत्याग करणे जगणे कर्म भोग भाव पूर्वकर्म केले जे जे भोगणे हे प्राप्त कर्म हेच आहे पुण्य कर्म हेच पाप जन्म मृत्यू फेरा इथला कर्मगती जोडून विधाता रचतो खेळ जीव अडकवून तुझे कर्मभोग जाण प्राक्तनी तुझ्याच कर्म हेच आहे पुण्य कर्म हेच पाप फेर असा कर्माचा हा नशिबात येई एक एक जीव त्यात गुंतुनिया जाई लक्ष लक्ष जन्माचा रे खेळ चाललेला कर्म हेच आहे पुण्य कर्म हेच पाप यात मार्ग सुटकेचा रे भक्ती, नाम हाच जोड जोड नामा आणिक प्राप्त मोक्ष भाग कर्मबंधनातून सुटण्या नाम हाच मार्ग  नाममार्ग जाणी मनुजा युगे युगे सार्थ कर्म हेच आहे पुण्य कर्म हेच पाप नामाच्या महतीत आयुष्य घालवलं श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर  महाराजांनी. त्यांच्या स्मरणार्थ आताच ...

जय जय श्रीदत्तगुरुमाऊली

जय जय श्रीदत्तगुरुमाऊली जय जय श्रीदत्तगुरुमाऊली दीनाना कृपेची सावली अद्भुत सुंदर येई परिमळ दिव्य तेज तव भासे नयनी प्रकाशित भू तव कृपेने मायापती तूच जगतसावली  जय जय श्रीदत्तगुरुमाऊली उभे ठाकले मूर्त त्रिदेव चर्येवरती भाव अलौकिक  नेत्र समावती सारे चराचर चरणरज देई श्रीपती जय जय श्रीदत्तगुरुमाऊली माऊली मजला घे संभाळून पापभार घे उदरी तोलून पूर्ण कृपेची आशा मनी या बोध वेद मन ना जाणत  माझी तूच गुरूमाऊली  जय जय श्रीदत्तगुरुमाऊली चार वेद तव चरणी लीन सुरवर मुनिजन सारे सेवक पापक्षालन ब्रीद तव पद कळते तरी ना वळते साधक राहो मनी या सेवावृत्ती जय जय श्रीदत्तगुरुमाऊली तूच माऊली अवघ्या जगती धाडीलेस एकाकी जगती किती चुकलो जन्मोजन्मी व्हावी कृपा होवो उन्नती जन्ममरण चुको जगतपती जय जय श्रीदत्तगुरुमाऊली ©® कवी : प्रसन्न आठवले १८/१२/२०२० ०७:५९

भोग आणि ईश्वर १८

भोग आणि ईश्वर  १८   मी खुप वेळा मनात चिंतन करत असताना काही गोष्टी ठळकपणे दिसतात. त्यातून एक संकल्पना मला जाणवते. त्यातून जे चित्र बुद्धीला व मनाला दिसतं ते खाली मांडण्याचा प्रयत्न करतो. या आधी कोणी हे मांडलंय की नाही ते माहीत नाही पण मला ते जसं दिसतंय तसं सांगण्याचा हा प्रयत्न. मानवी शरीर हे मुळात एक यंत्र आहे, अगदी रोबोप्रमाणे.  त्यात मेंदू हे आज्ञा देणं आणि स्वीकारणं यासाठी बसवलेला एक संगणक आहे.  त्याला आज्ञाप्रणाली अर्थात प्रोग्रॅम देण्याचं कार्य मन करतं. आत्मा या यंत्रमानवाचा ऊर्जा स्रोत अर्थात पॉवर स्टेशन आहे, जे अखंड या यंत्राला ऊर्जा पुरवत राहतं.  हे यंत्र स्वयंचलित , स्वनिर्धारीत असून त्यातील अनेक प्रकारची  इंद्रिय, अवयव यांचा उत्तम मेळ जमवून या यंत्राला पृथ्वीसारख्या एका ग्रहावर पाठवून विधात्याने (अर्थात या यंत्राच्या निर्मात्याने) अनेक गोष्टी त्याद्वारे करवून घेण्यासाठी एक प्रयोगशाळा उघडली असावी. एखाद्या तारविरहित भ्रमणध्वनीप्रमाणे  बाहेरून येणाऱ्या व आतून येणाऱ्या सर्व सांकेतिक आज्ञा ग्रहण पृथक्करण करून त्याला प्रत्युत्तर देण्यासाठीची सर्व व...

भोग आणि ईश्वर ११

भोग आणि ईश्वर  ११ मनाचा विचार खरतर तर अनेक जणांनी करून खूप काही लिहिलय. त्यामुळे अजून त्यावर लिहिण्यापेक्षा आपण विषय पुढे नेऊया. मुळात मन हे तरंग लहरींसारखं आहे. त्याला आकार उकार काही नाही. ते मस्तिष्क हृदय पूर्ण शरीर ते आत्मा या शरीरांतर्गत आणि त्याबाहेर कुठेही कधीही आणि कोणत्याही वेगाने फिरू, विचार करू आणि बागडू शकतं. एखाद्या मस्तवाल वळूप्रमाणे असलेलं मन हे एखाद्या गरीब गाईसमानसुद्धा असू शकतं किंवा होऊ शकतं. अफाट शक्ती आणि ऊर्जा असलेलं हे एक इंद्रिय खरतर देवाची मानवजातीला अलौकिक देणगी आहे. वक्र आणि क्रोधीत झालं तर क्षणात एखाद्याचा खून आणि शांत संयमी झालं तर, प्रत्यक्ष परमेश्वराला वश करून घेऊ शकतं. शून्यातून ब्रह्मांडाकडे जाण्याची शक्ती असलेलं अणुस्फोटाहून श्रेष्ठ इंद्रिय आहे आणि म्हणून श्रीमदभगवद्गीतेत भगवंतानी पण सांगितलंय की इंद्रियांमध्ये मी मन आहे.  आता इथे पुन्हा एक प्रश्न उभा राहतो की जर स्वतः भगवंत मन आहेत तर मग तेच मन चांगला वाईट हीन घृणास्पद असा विचार करूच कसं शकतं. खूपवेळा आपण एखाद्याबद्दल सांगताना म्हणतो अगदी मुर्दाड मनाचा माणूस आहे किंवा त्याचं मनच मेलय. म्हणजे म...

भोग आणि ईश्वर १७

भोग आणि ईश्वर  १७   मनाचा व्यापार, वावर आणि आवाका खूप मोठा असल्या कारणाने त्याचे ताळतंत्र सांभाळणं अवघड कार्य आहे. किंबहुना जाणीवपूर्वक प्रयत्न करून, मनाला आवर घालायचा प्रयत्न केला नाही, तर मन कधी तुमच्या ताब्यातून निसटून तुमच्यावर स्वार होऊन अनिश्चल, चल व अनिर्बंध मन हाच तुमचा स्वभाव होईल हे कळणार सुद्धा नाही.  त्यानंतर तो स्वभाव हीच तुमची ओळख होऊन बसते. क्षणात निर्णय बदलणं, सतत नसत्या गोष्टींचा  विचार करत राहणं, वागण्या बोलण्यात सतत अस्थिरता असणं, एकसंगतीने विचार न करू शकणं आक्रस्ताळेपणा करणं, विचलित असणं या पैकी अनेक गोष्टींचा प्रत्यय अश्या व्यक्तीच्या वागण्यातून येतो. अगदी टोकाचं वागणं हा मनाच्या अनिर्बंधतेचा प्रत्यय आहे. अश्या या मनाला या स्थितीप्रत जाऊ न देणं किंवा गेलेल्या मनाला प्रयत्नपूर्वक माघारी आणून योग्य मार्गवर लावून, मग आपल्याबरोबर घडणाऱ्या गोष्टींचं अनुमान काढणं, हे जिकिरीचं आहे वा असतं. आपल्याच मनाशी आपला संवाद असावा. मुळात आपलं ध्येय हे आपल्याला आलेल्या अनुभवावरून ताडून मग ठरवावं. भाग्य उत्तम असेल तरीही आणि भाग्य गर्तेत असेल तरीही डोक्यात हवा जाऊ नय...

पंचमहाभूत मंदिर (कॉपी पोस्ट)

* पंच महाभूतांच्या मंदिरांचे रहस्य... अश्या अनेक गोष्टी आहेत, ज्या कळल्या तर आपण अक्षरशः थक्क होतो. थिजून जातो. आज ज्या गोष्टी आपल्याला अशक्य वाटतात, त्या अडीच/तीन हजार वर्षांपूर्वी आपल्या भारतीयांना कश्या काय निर्माण करता आल्या असतील हे प्रश्नचिन्ह मोठं होत जातं... हिंदू तत्वज्ञानामधे पंच महाभूतांचे विशेष महत्त्व आहे. पाश्चात्य जगताने देखील ह्या संकल्पना मान्य केल्या आहेत. डेन_ब्राऊन सारखा लोकप्रिय लेखक सुध्दा या संकल्पनेचा उल्लेख करतो, त्यावर कादंबरी लिहितो. ही पंच महाभूतं म्हणजे जल, वायू, आकाश, पृथ्वी आणि अग्नी. आपलं सारं जीवनचक्र या पंच महाभूतांच्या आधाराने गुंफलेलं असतं अशी मान्यता आहे. आपल्या देशामध्ये या पंच महाभूतांची भव्य आणि वैशिष्ठ्यपूर्ण मंदिर आहेत हे आपल्यापैकी किती जणांना माहीत असेल ? फार थोड्या लोकांना.त्यातून ते जर शंकराचे उपासक असतील तर हे माहीत असण्याची थोडी तरी शक्यता आहे. कारण ह्या पंच महाभूतांची मंदिरं म्हणजे शिव मंदिर,भगवान शंकराची मंदिर आहेत. पण यात काही मोठं वैशिष्ट्य किंवा रहस्य नाही. * मग वैशिष्ट्य कशांत आहे...? पंच महाभूतांच्या ह्या पाच मंदिरांचं वैशिष्ट्य कि...

भोग आणि ईश्वर १६

भोग आणि ईश्वर  १६ मुळात इच्छा या शक्ती घेऊनच येतात आणि आपल्या शक्तीनुसार कार्य करतात. त्या फक्त मन, देह यानाच नाही तर संपूर्ण ब्रह्मांडाला कार्यरत करण्याची शक्ती व क्षमता बाळगतात. परंतु यात महत्वाची गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की, सर्व इच्छा या प्रकाराने कार्यरत करतात असं नाही. मुळात इच्छांना तशी शक्ती प्रदान करण्याचं कार्य मनच करतं.  ज्या इच्छा मनात तीव्रतेने प्रकट होऊन मनाच्या अंतराचा ठाव घेतात, मनाला पछाडून टाकतात, त्याचा माणूस ध्यास धरतो, ज्या दृढ असतात वा मानवी मन त्यांच्यामागे प्राण ओतून लागतं, ज्या इच्छा मनाबरोबर देहालासुद्धा तितक्याच इर्षेने कार्यरत करतात, त्याच्यामागे माणूस एकाग्र होऊन प्रवृत्त होतो अश्याच इच्छा या प्रकारात येतात. ज्याला आपण ध्येयाने पछाडलं जाणं म्हणतो त्या प्रकारातील इच्छा प्रचंड शक्तीरुप असतात.  अश्या दृढ इच्छा ब्रह्मांडातील सदर शक्तींना कार्यरत करू शकतात. हे भारतीय शास्त्र, वेद, पुराण यातून अनेक उदाहरणांनी दाखवून दिलं आहे. यावर आधारित एक संवाद ओम शांती ओम या चित्रपटात नायकाच्या तोंडी आहे. किसींभी चीजको अगर शिद्दतसे चाहो तो पुरी कायनक उसे तुम्...

भोग आणि ईश्वर १५

भोग आणि ईश्वर  १५ लहरींबद्दल एक माहिती वाचली आहे, अर्थात शास्त्रीय आधारावर, की, त्या नष्ट होत नाहीत. पण विरळ होत जातात आणि अंतराळात म्हणजेच ब्रह्मांडात फिरत राहतात. अर्थात मला फारशी शास्त्रीय माहिती नाही, पण विचार आणि कर्म यांच्या लहरी या ब्रह्मांडात फिरत राहतात आणि योग्य वेळी आपलं कार्य करण्यासाठी योग्य काळी व स्थितीला प्रकट होऊन, आपला कार्यभाग साधल्यानंतर तृप्त होतात. तोपर्यंत त्या अतृप्त स्थितीत फिरत राहतात, अर्थात योग्यवेळी प्रकट होण्यासाठी.  आपल्याच विचारांच्या, इच्छांच्या लहरी कार्य कसं करतात ते बघूया. प्रत्येक इच्छेमागे एक शक्ती कार्य करते. क्षीण अथवा क्षणभंगुर विचार वा इच्छांमागे क्षीण शक्ती असते. अर्थात तिची ताकद जितकी तितकंच कार्य ती करणार. परंतु वासना या मुळातच शक्ती वा अग्निरुप असतात. त्यामुळे त्या इच्छांच्या मागे असणारी शक्ती, कमी काळात व क्षीण वाटली तरी खूप मोठा परिणाम मनावर करते आणि अश्या इच्छांच्या लहरी लवकर प्रभाव दाखवतात. एक उदाहरण बघूया. साध्या एक कप दुधामध्ये त्या दुधाला गोड करण्यासाठी चमचाभर तरी साखर घालावी लागते. त्यानंतर ते नीट ढवळावं लागतं. मग ती साखर द...

भोग आणि ईश्वर १४

भोग आणि ईश्वर  १४  देह आणि आत्मा यांच्यामध्ये संधीसाठी देवाने अजून एक इंद्रिय निर्माण केलं, मन. पण ते इतर इंद्रियांसारखं दिसत नाही, समजून येत नाही, कळत नाही पण कार्य करतं हे नक्की. विचार जे इच्छांना गती देऊन कार्यरत करतं. कर्म करण्यास प्रवृत्त करतं. इच्छा ज्यांचं अस्तित्व हे मनामुळे  कळतं. वासना ज्या इच्छांना प्रवृत्त करतात व इच्छांच्या माध्यमातून देहाला प्रवृत्त करतात, पण ज्यांचा जन्म मनात होतो. कर्मरहीत स्थिती अस्तित्वात नाही ती मनामुळे कारण काया वाचा आणि मन तिन्ही मार्गाने केलेलं कर्म फल देणास बद्ध करतं. म्हणजेच फक्त विचार वा विचारातून केलेलं चांगलं वा वाईट चिंतनसुद्धा माणसाला फल प्राप्ती करून देते. याचाच अर्थ आपण प्रत्येक विचार, विचारपूर्वक करायला हवा. इथे द्विरुक्ती नाही केली. तर विचार करताना एक नियम वा शिस्त असावी. कारण केलेला प्रत्येक विचार हा चिरस्थायी नोंदवला जातो आणि त्याप्रमाणे त्याचे  तरंग व त्या तरंगांच्या लहरी आपलं कार्य साध्य करतात.  आता प्रत्येक विचार हा अश्या प्रकारे कार्य करतो असं आहे का, बघूया. सर्वसाधारणपणे येणारे सर्व विचार हे नोंदवले जातातच...

भोग आणि ईश्वर १३

भोग आणि ईश्वर  १३ आपल्याला झालेली जाणीव ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जाण येणं म्हणजे समजणं लक्षात येणं. जाणण्याप्रत एखादी गोष्ट कळणं म्हणजे जाणीव होणं. मला प्रेमाची जाणीव झाली, मला भक्तीची जाणीव झाली. म्हणजे जाणिवेत त्या गोष्टीबद्दल  जाग येणं, ती गोष्ट उमगणं आणि त्याचा पूर्ण उलगडा होणं हे अपेक्षित असतं. जर त्या अर्थाने आतापर्यंतचे भाग चिंतन केले असतील तर जे मला म्हणायचं आहे त्याची जाणीव तुम्हाला झाली, म्हणजेच जाण आली, तुम्ही जाणलं. तुम्हाला जाणीव झाली.  म्हणजे आज भोगतोय ते कालचं कधीचंतरी कर्मफल, आज करतोय ते उद्या कधीतरी समोर येईल. पण हे अशाश्वत आहे की ते उद्याच येईल किंवा भविष्यात कधीतरी येईल. कधी कधी आजचं फल आजच लगेच मिळतं, असंही होऊ शकतं. हे संचित किती आणि कर्म काय यावर पण अवलंबून आहे. किंवा एखादा भोग हा वर्षानुवर्षे असू शकतो.  पण म्हणजेच त्याला कारणीभूत एखादं अघटित तितकंच दुर्दैवी कर्म घडलं असेल हे मनात लक्षात ठेवा.  मी  नाव न घेता एक प्रातिनिधिक उदाहरण देतो. एक नर्स साधारण १९७२ मध्ये एका अत्याचारात कोमात गेली. के इ एम मध्ये १९७२ ते २०१५ (बहुतेक) पर्यंत नु...

भोग आणि ईश्वर १२

भोग आणि ईश्वर  १२  कालच्या उदाहरणात नळ कमी जास्त करून पाण्याची धार आपण नियंत्रित करत होतो आणि प्रयोग केला. आपल्याला शांत एकाधारेतील पाणी आणि वेगात येणारं पाणी यातील फरक फायदा तोटा समजला. आता मनाशी याचा संबंध जोडताना नळाला असतो तसा नियंत्रक कुठे आहे.  खरी समस्या इथेच सुरू होते. कारण मन हे स्वयंचलित आणि स्वनियंत्रीत असल्यामुळे, त्याची स्वतःची मर्जी हा एक खूप मोठा घटक आहे, नियंत्रण न मिळण्यामागे. मनाचा वेग व आवेग हा कोणालाच आलेखित व आरेखीत करता आलेला नाही. म्हणजे त्याचा diagram आणि drawing  दोन्ही काढता येणं अशक्य आहे. मुळात ते अदृश्य राहून शरीर नियंत्रित करतं आणि स्वतःला पाहिजे ती कामं करवून घेतं.  इथे त्याच्या जोडीला मसाला व फोडणी म्हणून काम क्रोधादी विकार आहेतच, जे आधीच चंचल असलेल्या मनाला अनियंत्रित करतातच परंतु वासनेचा जोर, क्रोधाचा ज्वर आणि अभिमान व अहंकाराला फोफावत ठेवतात. म्हणजेच आधीच अनियंत्रित गाडीचे रोधक (ब्रेक) निकामी आणि चालक नशेत अशी परिस्थिती होते. म्हणूनच मनाला वारू सुद्धा म्हटलं आहे.  असं अजब आणि अफाट लौकिक असलेलं मन याला चंचलतेकडून नियंत्रित ...