Skip to main content

सुभद्राहरण २३

सुभद्राहरण २३

ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll

आता सर्व मनासारखे योजले गेले. मात्र त्याची अंमल बजावणी करणे बाकी राहिले. जे जसे करावयाचे ठरले होते, त्याप्रमाणे त्या दिवशी सुभद्रा शृंगार करून सुलोचन सुर्यबिंबा लाही अपमानित करत महाशक्तीपूजेस्तव मंदिराकडे निघाली. रत्नजडित अलंकार, सुशोभित हिरेजडित मुद्रिका , उंची वस्त्रभार यांसह विजेचे तेज ल्यायलेली सुभद्रा पूजेची सर्व सामग्री घेऊन रथारुढ झाली. 

अर्जुन अर्थात कृष्णाच्या रथात आरूढ होऊन सज्ज होता. दारूक अर्थात कृष्णाच्या रथाचा सारथी, याला कृष्णाने सांगितले होते की,हे महंत सांगतील त्यानुसार तू हा रथ हाक आणि तेच तुझे स्वामी आहेत असे समज.त्यामुळे दारूक आपल्या रथाचे शैब्य सुग्रीवादी दिव्य अश्व जोडून तयार होता. सुभद्रा ठरल्यानुसार मंदिरात गेली. तिने यथाविधी पूजा अर्चना पूर्ण केली. मंदिराचे पुजारी यांना दक्षिणा व याचकांना सढळ हस्ते दान देऊन पायऱ्या उतरून रथारूढ झाली. 

सारथी आज्ञा मिळताच रथ सुरू करतो आणि अर्जुन देखील दारुकाला रथ त्या रथाच्या दिशेने नेण्यास सांगतो, अर्थात थोडे अंतर ठेवून आणि आज्ञा करताच अतिनिकट जाता येईल अश्या रीतीने रथ नेण्यास सांगतो. सुभद्रेच्या रथामागे अर्थात यादवांचा दळभार सुभद्रेच्या सुरक्षेसाठी असतो. योग्य स्थान ,अर्थात जिथे दोन मार्गिका होत्या आणि जसे कृष्णा बरोबर ठरले होते ते स्थान येताच, सुरक्षित अंतरावर एका वृक्षाखाली दिसणार नाही अश्या बेताने उभा असलेला कृष्ण अर्जुनाला भुवईने संकेत देतो. 

अर्जुन दारुकाला त्वरित रथ सुभद्रेच्या रथासमीप नेण्याची आज्ञा करतो. क्षणाचाही विलंब न करता, दारूक आपला रथ सुभद्रेच्या रथाच्या अत्यंत निकट नेतो. अतिचपल अर्जुन विद्युत गतीने सुभद्रेला एखाद्या फुलासम उचलून आपल्या रथात घेतो. या क्षणात घडलेल्या घटनेने बावरलेली सुभद्रा प्रतिकार करण्यासाठी हात उचलतात, अर्जुन आपलं स्वरूप तिला दाखवून चकित करून सोडतो. अर्थात हे घडत असताना दारुकाचा रथ वायूवेगे अर्जुनाने सांगितलेल्या दिशेने नेतो.

सोबतचा दळभार या अनपेक्षित घटनेने अचंबित होतो. तो सावरेपर्यंत अर्जुनाचा रथ वायुगतीने उत्तर दिशेकडे निघतो. यादववीर त्वरेने रथाच्या मागे अश्व व रथ घेऊन दौडत निघतात.  मागून तिरांचा मारा सुरू होतो.  अर्थातच तिकडून तीर सुरू झाल्याबरोबर कसलेला योद्धा अर्जुन आपल्या धनुष्यातून बाणांचा वर्षाव करतो, जणू की मेघांनी जलवर्षा सुरू केली आहे, अश्या रीतीने येणारे बाण पाहून समस्त यादव दळभार  स्तंभित होऊन जागच्या जागी स्तब्ध होतो.

एकाही सैनिकाला पुढे जाता येत नाही व त्या बाणांच्या वर्षावावर प्रत्युत्तर देता येत नाही. सर्वजण आश्चर्यचकित होऊन,  प्रत्युत्तर न देता तिथेच स्थिरावतात आणि काही त्वरेने बलरामदादा जिथे होते तिथे गेले. इकडे शरसंधान सुरूच आहे, ज्याने अवनीपासून आकाश व्यापले होते., 

क्रमशः

भाग २३ समाप्त

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll शुभम भवतू ll
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...