Skip to main content

सुभद्राहरण ३६

सुभद्राहरण ३६ सुभद्रा अर्जुन विवाह सोहळा 

ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll

माता पिता दोघेही कन्यादानासाठी येऊन उभे राहिले. सर्व पुण्यांमध्ये अलौकिक असं समजलं जाणारं आणि पित्याला मोक्षप्रत नेणारं असं महत्तम दान म्हणजे कन्यादान. पित्याला मोक्ष यासाठी की, स्त्री,  गर्भ नऊ मास उदरात धारण करून आधीच मोक्षाच्या मार्गावर अग्रेशीत झालेली असते. म्हणून पुरुषाला कोणतंही पुण्यकर्म पदरी नसेल तरी मोक्षाच्या प्राप्तीचा हा मार्ग आहे.

तो मार्ग म्हणजे केवळ एक कार्य, कन्येच्या विवाहानिमित्त, विधिवत तीच कन्यादान करणं. इथे लोकापवाद दान या शब्दावरून होऊ शकतो. परंतु कन्येच्या बाबत ते दान हे वस्तू म्हणून नव्हे, तर प्रचलित रितीनुसार, तिच्या पुढील आयुष्याची पूर्ण चिंता वाहू शकणाऱ्या सक्षम हातात तिला सुपूर्द करणं, जेणेकरून ती त्यात पूर्ण रममाण होऊन मनापासून वा आत्म्यापासून आपला संसार करेल व माता पित्यांना मनापासून त्याचे श्रेय देत राहील आणि त्यायोगे मातेची पुत्रीबद्दलची चिंता दूर होईल, या अर्थाने तिचा हात  सुयोग्य हातात देणं इति कन्यादान. कन्यादानम महापुण्यम.

सुभद्रेला इतक्या सक्षम, सार्थ, महावीर, धनुर्धर, कुलसंपन्न हातात सुपूर्द करताना वसुदेव आणि देवकी नक्कीच धन्य मानत असतील. आयुष्यातील कन्येचा अश्या वराशी विवाह करून देण्यातील कृतार्थता ही वासुदेवासारख्या पुण्यवंतांनाच प्राप्त होते.  विधीवत आणि साश्रु नयनांनी सुभद्रेचं कन्यादान करताना एका नेत्रात वियोगाच्या दुःखाचे तर दुसऱ्या नेत्रात अर्जुनासोबत तिचा विवाह लावून कृतकृत्य झाल्याच्या आनंदाचे अश्रू माता पित्यांच्या नेत्रातून वाहत होते. 

विवाह सोहळा संपन्न झाला. विवाहानिमित्त आयोजित भोजनाचा आस्वाद घेण्याची विनंती दादा आणि कृष्ण दोघांनी मिळून सर्वांना केली. सर्व उपस्थितांना मानसन्मान देऊन भोजनस्थळी दोघे नेत होते. इतर यादववीरदेखील यात सहभागी होतेच. पंगती सुरू झाल्या. द्वारकेतील भोजनाचा थाट काय वर्णावा. समस्त उपस्थितांना चांदीच्या ताट वाटीत भोजन देण्याचे दिवस होते ते. 

लाडू, कुंडलिका (हा आजच्या जिलबी नामक पदार्थाशी मिळता जुळता त्यावेळचा पदार्थ)  , पाकपुऱ्या, पुरणपोळ्या अश्या शेकडो गोड पदार्थांची रेलचेल त्या पंक्तीत होती. प्रत्येक मिष्ठांनाची ताटच्या ताटं रिक्त होऊन पुन्हा भरण्या साठी मुदपाकाखान्यात जाऊन पुन्हा भरून येत होती. येथेच्छ खाण्यापिण्याचे ते दिवस होते. माणसं शेराने जेवत होती. परंतु पोटं काही भरण्याचं नाव घेत नव्हती.  

दोन्ही बंधू खासे खासे बघून कुंडलिका वा तत्सम पदार्थ नगाने नव्हे तर अर्ध वा पूर्ण ताट भरून वाढत होते. वर खाणाऱ्याला आपण अजून काहीच घेतलं नाहीत असं सांगत होती. पण त्यात विनोद वा चेष्टा नव्हती, तर त्या काळातील माणसांची खाण्याची व खाऊन पचवण्याची पद्धती काही वेगळीच होती. कारण यावर खाणारादेखील आपण अजून नीट वाढलं नाहीत, वाढते रहा आम्ही खाते राहू, अस उत्तर देत होती. यावर दोघे बंधू अजून आग्रह करून वाढत होती. 

कित्येक प्रहर हा भोजनाचा सोहळा सुरूच होता.खाणारे हात आणि रिचवणारी पोटं थकत नव्हती व वाढणारी आणि करणारे आचारी देखील थकत नव्हते. करणाऱ्याला अजून अजून करण्यात अलौकिक आनंद होता. कारण तो कृष्ण बलराम यांच्या बहिणीच्या कार्यात राबत होता. त्यातील धन्यता अवर्णनीय होती. तो आनंद  प्रत्यक्ष घेणारे अनेक जन्माचं पुण्य पदरी घेऊन आले होते.

क्रमशः

भाग ३६ समाप्त

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll शुभम भवतू ll
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...