क्षण एक तुझा हे जाण
उगाच नाही ज्ञानोबा माऊली म्हणाल्या, तू हे जाण
देवचिये द्वारी उभा क्षणभरी, मुक्त करील तो क्षण
तेही जाणत होते अस्तित्वाच्या क्षणा क्षणाचं मोल
कारण हा क्षण हाती धर, पुढचा तुझा असेल नसेल
तो एक क्षण हाती आला तर बदलेल सर्व लक्षण
जीवनात क्षणाचंही मोल आहे अनमोल, हे जाण
ज्या क्षणी तुला कळलं की, गेला क्षण माझा नव्हता
तो क्षण धरून हातात तू चाल, तुझ्या जीवनाचा रस्ता
कारण ही जाण महत्वाची की, येणं जाणं नाही हाती
ज्या क्षणी उमजेल हे, त्या क्षणाची काठी धर हाती
त्या एका क्षणी जाणीव होणं, हेच महत्वाचं जीवनात
त्या क्षणी, पूर्ण आयुष्य तू जगलास, त्याच जाणिवेत
क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव होई अमृताचा, हे जाण
तो प्रत्येक क्षण जागून जगणे, हे जीवन जगणे जाण
©® कवी : प्रसन्न आठवले
२६/०४/२०२०
०८:३८
Comments
Post a Comment