Skip to main content

सुभद्राहरण १०

सुभद्राहरण १०

ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll

चित्रांगदेच्या गालावर ओघळलेले अश्रू पुसत अर्जुन पुढे बोलणार इतक्यात, स्फुंदत, आपले शिश अर्जुनाच्या स्कंधावर ठेवत  आणि अतिव्याकुळ स्वरात चित्रांगदा म्हणाली. 

" मला आपण दूर जाणार याचं दुःख तेंव्हा झालं नसतं जर तुम्ही एखाद्या युद्धासाठी जाणार असतात.  कारण मी एक क्षत्रिय पुत्री आहे आणि त्याकारणे मी हे नक्कीच जाणते की एक क्षत्रिय युद्ध करण्यासाठी जात असेल तर नक्कीच त्याला साश्रु नयनांनी निरोप देऊ नये.

परंतु आपण मला विरहाच्या अग्निमध्ये लोटून जात आहात आणि तरीही माझं सांत्वन करत आहात की, मी अश्रू ढाळू नये. आपण माझ्या वेदना जाणत आहात तरी हे म्हणत आहात की न जाणत असल्यामुळे हे म्हणत आहात." 

चित्रांगदेच्या लोचनातून वाहणाऱ्या अश्रूंना पुसत अर्जुन तिच्याकडे पाहात म्हणाला

" हे कल्याणी, मी तुझं दुःख खचितच समजू शकतो कारण,  मी स्वतः माझ्या प्रियजनांपासून दूर आलो आहे. परंतु जीवनात काही गोष्टी भविष्यातील सुखाचा विचार करून स्वीकाराव्या लागतात. आपल्या पुढील भेटीला फार काळ जाईल असं मला स्वतःला वाटत नाही. त्यामुळे तू विरह करण्या ऐवजी पुढील भेटीची स्वप्न रंगवत पुढील काळ काढ. काळ हि अशी गोष्ट आहे कि ती सर्व गोष्टींवर उचित औषधी आहे. त्याचप्रमाणे ज्या वेळी हे माहित असतं  कि, कधी तरी नक्कीच भेट होणार, मग तो विरह सुसह्य असतो. म्हणून तू त्या दिवसाची वाट पहा आणि मला अनुमती दे.

एक मोठी जबाबदारी तुझ्या शिरावर आहे ती म्हणजे, बभ्रुवाहन हा आपला पुत्र ज्याच्या पालन पोषणाची जबाबदारी. त्याच्या रूपात मी माझा अंशच तुझ्या सोबत ठेवून जात आहे. तो राजा चित्रवाहन यांचं राज्य व वंश जरी पुढे नेणार असला तरी वास्तविक रूपात तो माझा अर्थात कुरुवंशाचाच अंश आहे. त्यामुळे त्याचं  पालन करणं  हे तुला अति आनंदित करेल. "

 अर्जुनाच्या या बोलांनी आणि सांत्वनपर उद्गारांनी चित्रांगदा आश्वस्त झाली आणि तिने अर्जुनाला अनुमती अनुमती दिली. चिंत्रांगदेला आणि आपला पुत्र बभ्रुवाहन यांना राजा चित्रवाहन यांच्या सुपूर्त करून अर्जुन, निश्चिन्त  मनाने मणिपूरातून प्रस्थान करता झाला. मजल दरमजल करत तो गोकर्ण तीर्थाच्या दिशेने निघाला. गोकर्ण हे शिवाचं प्रसिद्ध ठिकाण आहे. ज्याच्या दर्शनमात्रें पापहरण होता आणि मोक्षप्राप्ती होते अशी त्याची ख्याती होती. पुण्यवान तर येथे येऊन तरतातच पण पापी देखील मोक्षपदाला प्राप्त होतात अशी या तीर्थाची ख्याती आहे.

अश्या अनेक तीर्थाना भेट देऊन अर्जुन काम्यक वनात पोहोचला. तिथे आपलं सर्व क्रियाकर्म उरकून अर्जुन विश्रामासाठी एक छान जागा बघतो. एका सुंदर तळ्याकाठी एका मोठ्या वृक्षाखाली स्वच्छ। केलेली जागा अर्जुनाच्या दृष्टीस पडली. 

क्रमशः

भाग १० समाप्त 

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले 
ll शुभम भवतू ll 
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...