Skip to main content

देवकी ६

देवकी - ६ 

या आयुष्याचं मर्म काय, जगण्याचं वर्म काय हे माहीत नाही  आजतरी. पण वसुदेवांशी का गाठ मारली माझी, विधात्याने  हे मात्र त्या क्षणी जाणवलं, समजलं. आजही मी हाच विचार करते आणि थरकाप होतो अंगाचा की जर त्या दिवशी वसुदेव नसते तर माझा अंत कंसाच्या हातून निश्चित होता. पण त्यानंतरचं जीणं हे तर मृत्यूहूनही भयंकर अस दुःस्वप्न आहे. ही कारागृहातील रात्र, नव्हे तर, प्रत्येक क्षण अंतरात्म्याचा ठाव  घेतो, काळजाचा ठोका चुकवतो. प्रत्येक पळ मृत्यू एक एक पाऊल पुढे येतो आहे, हीच जाणीव काळीज पोखरून टाकते आणि मग जाणिवा चेतना व संवेदना आत्मक्लेश देतात. का हे अस जीणं वाट्याला यावं, आपल्याच. 

फक्त वसुदेवांची आयुष्यातील उपस्थिती हाच काय तो जगण्याचा आशावाद. मृत्यूच्या या घनघोर तांडवात मला आधार हा फक्त त्यांचा आहे, वसुदेवांचा. त्यांचा धीरोदात्तपणा कधी काळजाचा ठेवा बनतो तर कधी आश्चर्य वाटतं. कसं काय एखादा मानव मृत्यू प्रत्यक्ष धर्मपत्नीच्या भावाच्या रुपात थैमान घालत असताना शांतपणे वचन बद्धता पाळण्याचं धैर्य दाखवू शकतो. इतका टोकाचा स्वभाव व वर्तणूक असलेली दोन व्यक्तित्व माझ्या इतक्या निकट आहेत. एक जन्मतः भाऊ, पण आज कट्टर वैरी झालेला आणि एक साता जन्माचा सोबती. पण या जन्मात ओळख होऊन फार काळ न लोटलेला, तरीही आपल्या जीवासाठी कोणतंही धाडस करायला न भिणारा. 

अंतर्मनात ही चाललेली घालमेल, कोणालाही आपल्या चर्येवरील भावावरून सहज समजू शकेल. पण ह्या जगण्यातील दाहकता कदाचित जो हा जन्म जगेल त्यालाच कळू शकेल. पण हे विधात्या, हे सर्वेश्वरा, असं जीणं, असं वास्तव आणि हा अंतरात्म्याला पिळवटून काढणारा, जाळणार आणि तरीही न संपणारा विस्तव , हा वणवा अनंतापर्यंत कोणाच्याही वाट्याला येऊ देऊ नकोस, इतकाच आर्जव आज मी तुला करू शकेन आणि माझं काही जरी पुण्य प्रारब्धात शेश असेल तर या अर्जवाचा नक्की विचार करावास , हे जगतपालका. 





















भाग ६   समाप्त .......

क्रमशः 

संकल्पना मांडणी व लेखन : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...