सुभद्राहरण १८
ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll
समस्त द्वारकावासी उत्सवाच्या तयारीला लागले. यात्रेला जाण्याची धामधूम सुरू झाली. ललना साजशृंगाराला लागल्या. पुरुष मंडळी जरुरी सामान शकटात अर्थात घोडागाडीत भरून त्यांची तयारी करू लागले. व्यापारी आपला विक्रीचा माल शकटात भरून सेवक वर्गाशी ने आण करावयाच्या मोबदल्याबद्दल घासाघीस करत होते. ज्यांची मोबदल्याची बोलणी अंतिम होत होती ते व्यापारी आपला माल सेवकांकरवी एक वा एकापेक्षा जास्त शकटात भरून निघण्याच्या तयारीत होते.
कपडालत्ता, दागदागिने, लाकडी खेळणी, शोभेच्या वस्तू, साजशृंगाराचे सामान अश्या अनेक वस्तूंनी शकटं भरू लागली. भरलेली शकटं सैनिक व्यवस्थेत द्वारका नगरीच्या सीमेपर्यंत नेऊन उभी करण्यात आली. सर्वात जास्त शकटं साजशृंगार , दागदागिने, हिरे रत्ने , मोती यांची होती. अर्थातच द्वारकेत सुबत्ता असल्याकारणे यात्रेत आलेले जन या प्रकारच्या वस्तू जास्त घेणार याची व्यापारी मंडळींना अनुभवामुळे खात्री होती.
हा रैवतक पर्वतावरील महाशक्तीचा उत्सव म्हणजे एक पर्वणीच होती. वृष्णी संघ, भोज आणि अंधक वंशाचे लोक हा उत्सव आयोजित करत असत. रैवतक पर्वतावरील महाशक्ती अर्थात देवीचा हा उत्सव व त्यानिमित्ताने प्रतिवर्षी भरणारी ही यात्रा असे. ज्यामध्ये द्वारकेत आल्यापासून यादव देखील मोठ्या उत्साहाने सहभागी होत असत. या उत्सवात सर्वसामान्य जनता उत्साहपूर्वक सहभागी होऊन, देवदर्शन व त्याबरोबर मनोरंजन, सामान , रत्न, हिरे मोती दागदागिने कपडेलत्ते यांची अमाप खरेदी करत असे.
दरवर्षीच्या या उत्सवासाठी सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात येत असे. समस्त सहभागी द्वारकाविसीयांसाठी निम्म्याहून अधिक चतुरंग दळभार त्यांच्या सोबत जात असे. कारण संपूर्ण राजपरिवार या उत्सवाला उत्साहात जात असे. याचकारणे, दळभाराचे दोन भाग करण्यात येत असत. एक जे रैवतक उत्सवाला सुरक्षेसाठी जात ते आणि जे द्वारकेच्या सुरक्षेसाठी द्वारकेत राहून सर्व व्यवस्था , द्वारका, राजप्रासाद रिकामी असलेली घरं यांच्या सुरक्षेसाठी मागे अर्थात द्वारकेत ठेवले जात ते.
अर्थातच जे रैवतक उत्सवाला सुरक्षेसाठी जात त्यांना आनंद होत असे. हा आनंद सर्वांना घेता यावा यासाठी प्रतिवर्षी अशी व्यवस्था केली जात असे की ज्यांना आधीच्या वर्षी जायला मिळालं नाही ते या वर्षी सुरक्षाव्यवस्थेसाठी उत्सवाला जात असत. जेणेकरून प्रत्येकाला हा आनंद घेता यावा. म्हणजेच कोणावर अन्याय झाला असं कोणालाही वाटायला नको.
सर्वसामान्य जनता तर हळू हळू तयार होऊन नगरसीमेपाशी जमा होऊ लागली आहे. सैन्यव्यवस्था चोख तयार होऊन आपल्या सुरक्षेची तालीम करत उभी आहे. प्रत्येकाला मिळालेल्या सुचनेचं त्यांचे त्यांचे वरिष्ठ वा गटप्रमुख पुन्हा एकदा पालन करण्याचा आदेश देत आहेत. काही सेना मागे काही मध्ये मध्ये आणि काही सर्वात पुढे अशी व्यवस्था करून सर्व सज्ज आहेत निघण्याच्या आदेशाची प्रतीक्षा करत.
हळू हळू राजप्रसादातून प्रमुख मंडळी अर्थात वसुदेव देवकी, उग्रसेन, दादा बलराम रेवतीदेवी, कृष्ण रुक्मिणी यांसह समस्त स्रीवर्ग तयार होऊन आपापल्या रथात आरूढ होतच आहेत. अर्थात ज्याप्रमाणे स्रीवर्गाची तयारी शेवटपर्यंत पूर्ण होत नाही तेच इथेही घडत आहे. निघे निघेपर्यंत स्त्रियांना काहीतरी राहिलं असच सतत वाटत आहे. म्हणून समस्त पुरुषवर्गाने आपापल्या स्त्रियांना बळेबळेच बाहेर काढलं. रुक्मिणी रथारुढ होऊन कृष्णाच्या प्रतीक्षेत आहे आणि अर्थातच आता सर्वांचं लक्ष कृष्ण व कृष्ण भगिनी सुभद्रा यांच्या अगमनाकडे लागलंय.
क्रमशः
भाग १८ समाप्त
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll शुभम भवतू ll
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll
ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll
समस्त द्वारकावासी उत्सवाच्या तयारीला लागले. यात्रेला जाण्याची धामधूम सुरू झाली. ललना साजशृंगाराला लागल्या. पुरुष मंडळी जरुरी सामान शकटात अर्थात घोडागाडीत भरून त्यांची तयारी करू लागले. व्यापारी आपला विक्रीचा माल शकटात भरून सेवक वर्गाशी ने आण करावयाच्या मोबदल्याबद्दल घासाघीस करत होते. ज्यांची मोबदल्याची बोलणी अंतिम होत होती ते व्यापारी आपला माल सेवकांकरवी एक वा एकापेक्षा जास्त शकटात भरून निघण्याच्या तयारीत होते.
कपडालत्ता, दागदागिने, लाकडी खेळणी, शोभेच्या वस्तू, साजशृंगाराचे सामान अश्या अनेक वस्तूंनी शकटं भरू लागली. भरलेली शकटं सैनिक व्यवस्थेत द्वारका नगरीच्या सीमेपर्यंत नेऊन उभी करण्यात आली. सर्वात जास्त शकटं साजशृंगार , दागदागिने, हिरे रत्ने , मोती यांची होती. अर्थातच द्वारकेत सुबत्ता असल्याकारणे यात्रेत आलेले जन या प्रकारच्या वस्तू जास्त घेणार याची व्यापारी मंडळींना अनुभवामुळे खात्री होती.
हा रैवतक पर्वतावरील महाशक्तीचा उत्सव म्हणजे एक पर्वणीच होती. वृष्णी संघ, भोज आणि अंधक वंशाचे लोक हा उत्सव आयोजित करत असत. रैवतक पर्वतावरील महाशक्ती अर्थात देवीचा हा उत्सव व त्यानिमित्ताने प्रतिवर्षी भरणारी ही यात्रा असे. ज्यामध्ये द्वारकेत आल्यापासून यादव देखील मोठ्या उत्साहाने सहभागी होत असत. या उत्सवात सर्वसामान्य जनता उत्साहपूर्वक सहभागी होऊन, देवदर्शन व त्याबरोबर मनोरंजन, सामान , रत्न, हिरे मोती दागदागिने कपडेलत्ते यांची अमाप खरेदी करत असे.
दरवर्षीच्या या उत्सवासाठी सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात येत असे. समस्त सहभागी द्वारकाविसीयांसाठी निम्म्याहून अधिक चतुरंग दळभार त्यांच्या सोबत जात असे. कारण संपूर्ण राजपरिवार या उत्सवाला उत्साहात जात असे. याचकारणे, दळभाराचे दोन भाग करण्यात येत असत. एक जे रैवतक उत्सवाला सुरक्षेसाठी जात ते आणि जे द्वारकेच्या सुरक्षेसाठी द्वारकेत राहून सर्व व्यवस्था , द्वारका, राजप्रासाद रिकामी असलेली घरं यांच्या सुरक्षेसाठी मागे अर्थात द्वारकेत ठेवले जात ते.
अर्थातच जे रैवतक उत्सवाला सुरक्षेसाठी जात त्यांना आनंद होत असे. हा आनंद सर्वांना घेता यावा यासाठी प्रतिवर्षी अशी व्यवस्था केली जात असे की ज्यांना आधीच्या वर्षी जायला मिळालं नाही ते या वर्षी सुरक्षाव्यवस्थेसाठी उत्सवाला जात असत. जेणेकरून प्रत्येकाला हा आनंद घेता यावा. म्हणजेच कोणावर अन्याय झाला असं कोणालाही वाटायला नको.
सर्वसामान्य जनता तर हळू हळू तयार होऊन नगरसीमेपाशी जमा होऊ लागली आहे. सैन्यव्यवस्था चोख तयार होऊन आपल्या सुरक्षेची तालीम करत उभी आहे. प्रत्येकाला मिळालेल्या सुचनेचं त्यांचे त्यांचे वरिष्ठ वा गटप्रमुख पुन्हा एकदा पालन करण्याचा आदेश देत आहेत. काही सेना मागे काही मध्ये मध्ये आणि काही सर्वात पुढे अशी व्यवस्था करून सर्व सज्ज आहेत निघण्याच्या आदेशाची प्रतीक्षा करत.
हळू हळू राजप्रसादातून प्रमुख मंडळी अर्थात वसुदेव देवकी, उग्रसेन, दादा बलराम रेवतीदेवी, कृष्ण रुक्मिणी यांसह समस्त स्रीवर्ग तयार होऊन आपापल्या रथात आरूढ होतच आहेत. अर्थात ज्याप्रमाणे स्रीवर्गाची तयारी शेवटपर्यंत पूर्ण होत नाही तेच इथेही घडत आहे. निघे निघेपर्यंत स्त्रियांना काहीतरी राहिलं असच सतत वाटत आहे. म्हणून समस्त पुरुषवर्गाने आपापल्या स्त्रियांना बळेबळेच बाहेर काढलं. रुक्मिणी रथारुढ होऊन कृष्णाच्या प्रतीक्षेत आहे आणि अर्थातच आता सर्वांचं लक्ष कृष्ण व कृष्ण भगिनी सुभद्रा यांच्या अगमनाकडे लागलंय.
क्रमशः
भाग १८ समाप्त
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll शुभम भवतू ll
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll
Comments
Post a Comment