Skip to main content

भोग आणि ईश्वर ५४४

भोग आणि ईश्वर  ५४४ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
  
ज्यावेळी दुःखं आणि भोग यांचा काळ येतो, तो सर्वात प्रथम बुद्धीचा आणि त्यायोगे मनाचा मार्ग धूसर करतो. म्हणजे आपण इतर गोष्टी विसरून जातो आणि सर्वात प्रथम, याचं विचारात गढून जातो की, असं घडलच कसं. कारण आपला स्व त्यावेळी आपल्याला, मार्गदर्शन करत असतो. हा स्व, अश्यावेळी बरोबर उलट शिकवणं वा विचार निर्माण करतो, ज्यायोगे आपण कोणी महान वा उच्चतम आहोत आणि आपल्या बाबत असं का घडू शकतं,  या विचाराने मन, चक्रावून जातं. 

हा विचार मनात, पूर्वसंचितातील विचारांची, ज्ञानाची प्रगल्भतेची शिदोरी, त्यावर या जन्मात झालेले संस्कार आणि त्या संस्कारा तून झालेली जाणिवांची  उत्पत्ती, या सर्वातून येतात. म्हणजे आपला स्व हा,या सर्वातून किती प्रगल्भ व सुसंस्कृत झाला आहे किंवा अपरिपक्वच आहे, यावर अवलबून असतो. जसजशी हि प्रगल्भता वाढत जाते, माणूस दुःख दैन्य व भोग याच्या परीघ काळात, योग्य पासून ते  अयोग्य पर्यंत अनेक प्रकारचे  विचार करतो. अनेकवेळा, प्रगल्भता असूनही, एखाद्या योग्य क्षणी माणूस चुकीचा विचार करून, दुःखाची आणि भोगांची व्याप्ती वाढवतो. 

पण हे अचूक साध्य कसं करायचं किंवा हा योग कसा जुळून येईल, हे कसं साधायचं, याचा जरा विचार करूया. काही काही जिवात्मे,आपलं,ज्ञान संस्कार व  प्रगल्भता याद्वारे, अश्या काळात कशाप्रकारे वर्तन, विचार हवं, हे जाणून, त्याप्रमाणे, आपल्यात बदल करवून, अश्या काळातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी योग्य ते प्रयत्न करतात. काहीजण मुळातच उत्तम गुणांचे व सुयोग्य जाणिवांचे धनी असल्यामुळे, त्यांना आपल्या वागण्यात, बोलण्यात कोणताही बदल करावा लागत नाही. तेदेखील योग्य कर्म व विचार यांद्वारे, सर्व प्रकारच्या काळात सुखरूप तावून सुलाखून बाहेर पडतात. 

ते सर्व काळासाठी योग्य आणि प्रगल्भ वागतात. त्यांचा स्व हा त्यांच्या वैचारिक चिंतनामुळे आणि जागृत विवेकामुळे, मर्यादेत वा नियंत्रणात असतो. त्यामुळे कोणत्याही मनःस्थितीत व परिस्थितीत, विचारांचे आणि कृतीचे फार मोठे फेरबदल संभवत नाहीत. म्हणून यांचे विचार व कर्म यातील ताळमेळ संतुलित असतो. आता या सर्व उदाहरणातील व्यक्तींच्या स्वभाव, संचित, विचार व कर्म यांहून भिन्न असणारे किंवा कमी विवेकी व विचारी,  ते पूर्ण अविचारी व अविवेकी लोकांचं काय आणि कसं होत असेल वा होतं, याचा आता विचार करूया. 

बहुतांश जन हे उपभोग व सुख या काळात, पुढचा कोणताही विचार न करता, आपल्या कर्मगतीला पूर्ण श्रेय देऊन आपला स्व सुखावून घेतात. यामध्ये तात्विक व वैचारिक समाधान प्राप्त होतं. पण वास्तविक यामुळे, आपल्याच विचारांवर एकप्रकारचा मायेचा व गैरसमजाचा पडदा तयार होतो. हा पडदा सुप्त असतो. पण यदाकदाचित आयुष्यात कधीही भोग वा दुःखाचे प्रसंग आले, तर हा पडदा दूर होऊन मनात असंख्य योग्य वा अयोग्य विचार, येतात. 

हेच विचार माणसाला अश्या काळात मार्गदर्शन करतात. आपण जाणतोच की, मार्गदर्शक योग्य असेल तर,  मार्ग, दिशा, विचार, कृती आणि परिणाम योग्यच होतात. पण मार्गदर्शक चूक किंवा अयोग्य सांगणारा असेल तर, मार्ग, दिशा, विचार कृती आणि परिणाम अयोग्य व चुकीचे असतील, हे नक्कीच. ज्याप्रमाणे सागरात निघालेलं जहाज, योग्य मार्गदर्शनाअभावी भरकटू शकतं. याउलट उत्तम कप्तान असेल तर तेच जहाज आपल्या मार्गावर योग्य दिशेने, वेगाने व पुरेश्या अचूकतेने जातं. 

या दिशादर्शक, मार्गदर्शक आणि योग्य विचाररूप तत्वाबद्दल आपण उद्याच्या भागात चर्चा करूया. पण तरीही आपली नामाची काठी न सोडता.  

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२८/०५/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...