Skip to main content

भोग आणि ईश्वर ५४७

भोग आणि ईश्वर  ५४७ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
    
आपलं जीवन हे कर्मफलाची साखळी आहे आणि मागील कर्मांची फळं भोगण्याचा काळ. त्यामुळे यात वाटेवर कधी काटे तर कधी फुलं येणार. सर्वसामान्य गृहस्थ फुलांनी सुखावतो आणि काट्यांनी घायाळ होतो. पण या दोन्ही अवस्थेत वा स्थितीत जो आपली मनःशांती ढळू देत नाही आणि समोर येईल ते मनःपूर्वक स्वीकारतो, तो या जीवनातील आपली लढाई उत्तम रीतीने खेळला असं नक्कीच म्हणता येईल. पण ही अशी मनःस्थिती लाभायला नक्कीच कर्माची दोरी बळकट असावी लागते. 

पण घटना घडत असताना आणि मनाचा तोल जात असताना, आपल्याला सावरण्यासाठी लागणारा आधार म्हणजे आपल्या वरील सद्गुरू किंवा ईश्वरी कृपा. पण ही कृपा लाभायाला सुद्धा आपल्या गाठीशी काही पुण्याची जमापूंजी असावीच लागते. याचसाठी आपण काही गोष्टी नित्य कर्माचाच भाग म्हणून करायला हव्यात. कारण आज जी कर्म करू किंवा करत आहोत, ते भविष्यात आपल्याच कर्माच्या जमेचा भाग होऊन, आपल्याच पुढे येणार, हा सृष्टिकर्त्याचा नियम आहे, हे सर्व ज्ञात आहेच. 

म्हणून अशी कृपा वा करुणेचा लाभ, काही विशिष्ट लोकांना अनेक स्वरूपात प्राप्त होतो. कधीकधी आपल्याला तो समजतो किंवा कधीकधी आपल्याला तो त्यावेळी जाणवत नाही. एखादं उदाहरण घेऊन, हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपण काही कारणा स्तव कुठेतरी प्रवासाला निघतो काही कारणाने किंवा ज्याला योगायोगाने म्हणुया. असं काही अपरिहार्य काम निघतं, ज्यामुळे आपलं जाणं रद्द होतं. 

नंतर आपल्याला माहिती मिळते किंवा समजतं की, ज्या प्रवासाला किंवा गाडीला आपण जाणार होतो, त्या प्रवासात किंवा गाडीत काही कारणाने नुकसान किंवा काही चुकीची घटना घडली आहे आणि आपण त्यातून सुखरूप राहिलो आहोत किंवा आपलं नुकसान होणं टळलं आहे. यामधे आता काही प्रश्न उपस्थित राहतील, त्याचा विचार करूया. 

एक म्हणजे यात प्रारब्धाचा भाग किती. दोन म्हणजे जर टळलं तर प्रारब्धातच नव्हतं, मग कृपा वगैरे इतर प्रश्न कुठे येतात. आता आपण याबाबत असा विचार करूया, की मुळात जन्म आणि मृत्यू हे दोन्ही म्हटलं तर आपल्या हातात नाहीत, म्हटल तर संपूर्ण ब्रम्हांडं हे कर्मधिष्टित आहे. म्हणजे आपल्या जन्मा पासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येकच गोष्टं विधिलिखित असते. पण हे विधिलिखित आपणच आपल्या कर्माने लिहून ठेवतो.

याचाच अर्थ असा होतो की, देह निर्माण होणं, हेसुद्धा कर्मानेच ठरवलेलं असणार. आपण कोणत्या काळात, कोणत्या देहात, कोणत्या प्रांतात जन्म घेणार, हे आपल्याच पूर्वकर्माने आपणच कधीतरी लिहून ठेवलं असणार, जे विधी व विधाता फक्त कर्तव्य कठोरपणे, अंमलात आणतो. म्हणजे विधाता हा एखाद्या बँकेच्या त्या प्रबंधकाप्रमाणे आहे, जो आपल्या खात्यावर जमा असेल, तर आणि तरच आपल्याला पैसे काढण्याची अर्थात सुख उपभोगण्याची संधी देईल, पण तेही योग्य वेळीच. ही योग्य वेळ आपणच ठरवलेली असते. 

या सर्वाचा गहन अर्थ लक्षात घेता हे ध्यानात येईल की, जर काही शिल्लक नसेल तर विधाताच काय पण ब्रम्हदेव सुद्धा काही करू शकणार नाहीत. मग अश्यावेळी थोड फार का होईना, पुण्यकर्म, चांगुलपणा असलेल्या व्यक्तींचं काय, यावर उद्या विचार करूया. तोपर्यंत सद्गुरू कृपेचा धनी होण्यासाठी नाम घेतच राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
३१/०५/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...