Skip to main content

भोग आणि ईश्वर ५६५

भोग आणि ईश्वर  ५६५ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
 
एक महत्वाचा मुद्दा कालच्या चर्चेतून पुढे येतो, तो म्हणजे आपण आपल्या भक्ती व श्रद्धेच्या परतफेडीमध्ये, काही अपेक्षा कारण हे, आपल्याच त्या भक्ती व श्रद्धेला व्यवहाराच्या पातळीवर आणून ठेवल्या सारखं आहे. कारण एका गोष्टीच्या बदल्यात, दुसरी काही अपेक्षा कारण हा शुद्ध व्यवहार आहे. आणि तो व्यवहाराच्या पातळीवर योग्य आहे. पण भक्ती, श्रद्धा व विश्वास, यांच्या प्रांगणात अशी अपेक्षा किंवा तसा काही विचार येणं, ही सुद्धा हीन आणि हानिकारक गोष्ट आहे.

मुळात आपण भक्ती व श्रद्धेने काही करतो, त्यावेळी ती निरपेक्ष बुद्धीने केलेली असावी. म्हणजे मी इतकं करतो, त्यामुळे मला त्यासाठी ईश्वर काही देत नाही. किंवा त्याची काहीच दाखल ईश्वर घेत नाही,असा कटू, नकारात्मक विचार गैर आहे. कारण मुळातच आपल्या काही सत्कृत्यांच्या बदल्यात, आपल्याला, सर्वात सक्षम आणि बुद्धी, मन आणि आत्मा यांना शुद्ध करण्यास योग्य असलेला most capable, देह मन देऊन देवाने अनंत उपकार केले आहेतच. 

कारण कितीही पुण्य गाठीशी असलं तरीही, ते योग्यवेळी कामाला यायला, ईश्वरी आणि सद्गुरूंची कृपादृष्टी आवश्यक आहे, यात कोणतीही शंका नको. म्हणजेच आपण आता, या घडीला सर्वात सक्षम पंचमहाभूतरूप देहात आहोत, हीच खूप मोठी हरिकृपा आहे. मी तर म्हणेन की, यासाठी आयुष्यभर, अर्थात हा देह आहे तोपर्यंत, आपण प्रत्येक क्षण त्याचे आभार मानले, तरी तीसुद्धा खूप मोठी स्मरणभक्ती होईल. 

अश्या या देहात येऊन, अनेक मनोव्यापार व देहाच्या गरजांसाठी ती आत्मारुप चैतन्यशक्ती आपण वापरतो, हे किती व्यर्थ कर्म आपण करतो, याची नुसती जाणीव झाली तरी, आपण आजपर्यंत किती काळ, क्षण आणि वेळ वाया घालवला, हे ध्यानात येईल. म्हणूनच अधिक वेळ वाया न घालवता, जिथे आहोत तिथे व तिथूनच आपल्या प्रिय ईश्वराचे व सद्गुरुंचे आभार मानून, त्यांची ही दिव्यदृष्टी व कृपा अशीच आपल्यावर राहो, ही प्रार्थना नित्यस्मरण करून, आपण केलीच पाहिजे. 

यामधे अजून एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की, कोणी काय करतो किंवा कोणी काय करत नाही, हे चिंतन करणं किंवा याचं विचार करणं, हे आपलं कार्य वा आपल्या धर्माचा अर्थात कर्माचा भागच नाही. त्यासाठी ईश्वर सक्षम आहे. पण आपण आपला आजपर्यंत वाया गेलेला काळ व वाया घालवलेले क्षण, कुठेतरी परत मिळवण्याचा किंवा compensate करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. अन्यथा हा देह व्यर्थ मिळवून, पुन्हा त्याच जागेवर, मृत्युसमयी आपण उभे असू. 

यामधे अजून एक गोष्ट ध्यानात घ्या की, या जन्मानंतर पुढील जन्म आणि तोही मानवी देहात, प्राप्त होणं, ही खूप मोठी भाग्याची व कर्मासंचीताची गोष्ट असेल. ती पूर्णपणे, जर आणि तर वर अवलंबून असलेली गोष्ट आहे. पण आज आता, या क्षणाला माझी जागी झालेली जाणीव, तशीच धरून मी या देहात येऊन करावयाच्या मुख्य कर्माला सुरुवात करणं जरूर आहे, ती लगेचच सुरू केली पाहिजे. ते कर्म किंवा ती गोष्ट म्हणजे त्या ईश्वराला नित्य स्मरून, त्याचे आभार मानून, त्याच्या नित्य स्मरणाची बुद्धी, त्यानेच द्यावी, अशी प्रार्थना, याचना, अर्चना केलीच पाहिजे. 

त्यासाठीच सर्व पूजापाठ, भक्ती श्रद्धा विश्वास, सेवा दान पुण्याप्राप्ती करणं हे योजलेलं आहे, हे कायम लक्षात ठेवा. याचं विषयावर उद्या पुढे चर्चा व चिंतन सुरू ठेवू. पण तोपर्यंत, त्यालाच प्रिय असलेलं त्याचच दिव्य नाम आपण स्मरतच राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१८/०६/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...