Skip to main content

भोग आणि ईश्वर ५५२

भोग आणि ईश्वर  ५५२ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

कृपा म्हणजे एखाद्याने आपल्यावर केलेले असे काही उपकार, ज्यामुळे आपला एखादं कार्य सुलभ होतं किंवा एखादं बिघडलेलं काम सफल होऊ शकतं. अशी मदत, सहाय्य हे कोणत्याही स्वरूपाचं असू शकतं. जे आपल्या कल्पनेच्या बाहेरचं असतं. पण ते आपल्या कार्यात आलेली बाधा, अडचणी अडथळे दूर करून, आपल्या कार्याला आपल्याकडून करून घ्यायला सहाय्यभूत होतं. 

म्हणजे एखाद्या बिकट आर्थिक संकटात वा समस्येत एखादी अनोळखी व्यक्ती अश्या प्रकारची छोटीशी वा थोडीशी मदत किंवा अगदी एखाद्या योग्य व्यक्तीची ओळख करून देते, जी व्यक्ती किंवा ज्या व्यक्तीच्या माध्यमातून आपलं काम होत वा होऊ शकतं. 

आता यावर आपण असा विचार करू की, सर्व कर्मा धिष्टित असताना, घडणाऱ्या सर्वच गोष्टी, या कर्मफळाचं द्योतक किंवा परिणती नाही का. मग यात उपकार किंवा कृपा हा भाग आला कुठून. याबद्दल  दृष्टांतादाखल एक कथा पाहूया. पितामह भीष्म यांनी शभर जन्मापूर्वी केलेल्या एका छोट्या अपराधाची वास्तविक त्यावेळी चूक वाटलेल्या साध्या गोष्टीची शिक्षा बाकी होती. म्हणजे कर्म घडलं होतं. पण त्याचा फल बाकी होतं. 

पण त्या कर्माचं परिमार्जन शंभर जन्मानंतर अर्जुना हातून शरपंजरी होण्यात घडलं. तसं पाहिलं तर इतकीच वाटणाऱ्या, या गोष्टीत किती गहनार्थ दडला आहे, तो पाहू, म्हणजे उपकार व कृपा याचा वास्तविक अर्थ लक्षात येईल. मुळात कर्माचं फल शिल्लक होतं, कारण त्याचा परिमार्जन भिष्मांच्या मागील शंभर जन्मातील पुण्याईमुळे होऊ शकलं नाही. 

पण हे कर्मफल भोगून होत नाही तोपर्यंत मुक्ती व मोक्ष घडणार नाही. हे भगवान श्रीकृष्ण जाणून होते. महाभारत युद्धापर्यंत पुण्यप्रभावामुळे त्या कर्माचा दोष, भिष्मांच्याच प्रभावामुळे भोगणं पूर्ण होत नव्हता. महाभारत युद्धातसुद्धा, जर भीष्म समोर उभेच असते तर, पांडवांचं पारडं कधीच जड झालं नसतं. धर्माच्या युद्धात अधर्माचं पारडं कायम स्वरुपी जड असणं, हा धर्माची जीत होण्यात खूप मोठा अडसर झाला असता. 

त्यामुळे, यातून योग्य मार्ग भगवंतांनीच काढला. भीष्मानी हा पेच ओळखून, आपल्याला मार्गातून दूर करण्याचा मार्ग आपणहून सांगून, भगवंताचा भार थोडा हलका केला. पण त्यासाठी द्रौपदीच्या, भीष्म भेटीची योजना घडवून आणली. शिखंडीला पुढे करून, अर्जूनाकरवी, भिष्माना बाणाच्या सहाय्याने क्षतिग्रस्त करण्याची योजना, खुद्द भगवंतांची. ती त्यांनी घडवून आणली, पार्थाकडून. 

पितामह शरपंजरी झाले आणि त्यांच्या संचितात असलेल्या एकमेव पाप कर्माचं परिमार्जन झाल. त्यांच्या मुक्तीचा मार्ग मोकळा झाला. मृत्यु साक्षात भगवान श्रीकृष्ण यांच्या साक्षीने झाल्यामुळे, प्रत्यक्ष स्वर्गाची द्वारं, त्यांना खुली झाली. अधर्माच्या बाजूने, उभं राहिल्याच्या अपराधाची वा चुकीची शिक्षा, त्यांना याचं जन्मात मिळाली. धर्म युद्धात धर्माचा विजय आणि अधर्माचा पराजय होण्याचा मार्ग सुलभ झाला. 

आता या एकाच उदाहरणात भगवंतांनी किती उपकार व कृपा केली, याचा आता अंदाज येईल. याबद्दल अजूनही चिंतन उद्या पुढे सुरू ठेवू. पण नामाला न सोडता. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०५/०६/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...