Skip to main content

भोग आणि ईश्वर ५५६

भोग आणि ईश्वर  ५५६ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
 
आपण मागील भागात पाहिल्या प्रमाणे अनेक संवेदक (सेन्सर्स) व नियंत्रक (कंट्रोल), जे प्राण्यांमध्ये कार्यरत असतात, ते मानव निर्मिती करताना, ईश्वराने काढून टाकले. कारण या सर्वांच्या बदल्यात, ईश्वराने मानवाला, मन, बुद्धी, पूर्ण विकसित मेंदू आणि विचारांचं मोठा भांडार, मनात जागृत, अर्ध जागृत व सुप्त असे प्रकार, हे सर्व सांभाळण्यासाठी बुद्धी, गहनातील गहन ज्ञान जाणण्यासाठी, जाणिवांची केंद्र, मनात अमाप सामर्थ्य, शकतो, बल, इत्यादी सर्व बहाल केलं. 

उद्देश एकच की, मानव या सर्वांचा उपयोग करून, पूर्ण विकसित देह व त्यातील बुद्धीच्या सामर्थ्याने आत्मउद्धार, आत्त्म उन्नत्ती साधून, नर ते नारायण ही प्रगती साध्य करून, ईश्वर ते ब्रम्हांड ते ईश्वर हे चक्र पूर्ण करून, अंती निजधामाला प्राप्त होईल. पण मनाच्या एका कमजोरीला, नित्य बळी पडून, मोह लोभ इत्यादी भावभावनात गुरफटून जातो. नित्य चुकीच्या कर्मात गुंतत जातो, दुःखाच्या भोगांच्या प्रसंगात, प्रसंगोपात, ईश्वराला दोष देऊन, किंवा विसरून, आपल्या कर्मगतीलां सुधारण्यास ऐवजीं पुन्हा पुन्हा त्याच चरकात फिरत राहतो. 

म्हणजे इतर प्राण्यांहून अनेक बाबतीत वरचढ बनवूनही, निव्वळ मनाच्या अव्यापारेशू व्यापारात अर्थात व्यापात अडकत जातो. आज युगानयुगे अनेक व्यवधानं जपत आणि अनेक व्याप वाढवत नेऊन, अनेक गुंते निर्माण करता झाला आहे. वास्तविक सहज आणि साध्या राहणीत, अनेक गोष्टी साध्य होऊ शकत होत्या. पण वाढत्या व्यापात, वाढत जाणारे धोके, वाढती संकटं, वाढती दुःख, वाढत्या गरजा, त्या वाढत्या गरजांसाठी, वाढते मार्ग आणि इत्यादी अनेक. 

स्वतः वाढवलेल्या व्यापामुळे, जन्माच्या मूळ उद्देशाला विसरून जन्म, बालपण, तारुण्य, वार्धक्य आणि मृत्यू, या चक्रात व चारकात स्वतःसह बुद्धी व मन यांना कष्टवत गेला. ज्यामुळे जन्म आणि मृत्यू, यातील ईश्वराने मुक्तपणे कर्म करत राहून, अंती मोक्षाच्या वाटेकडे निघायचा कानमंत्र, आत्मा हा मन, बुद्धी व देहाच्या सानिध्यात आल्यावर विसरल्यामुळे येणारे भोग हे ईश्वरी संकटं मानतो. Where premise is wrong conclusion has to be wrong. 

अर्थात जिथे समज चुकला, जाणीवा नष्ट झाल्या आणि जिथे मार्गच भ्रष्ट झाला तिथे निष्कर्ष अर्थात परिणाम चुकणार हे निर्विवाद. अर्थातच या सर्वांच्या मुळाशी जाऊन, जिथे चूक करायला सुरवात केली, तिथून ती चूक सुधारून, मग योग्य मार्गावर अग्रेशीत होऊ शकतो. 

काय आहे तो मार्ग किंवा ती चुकीची समजूत, जी मुळात सुधारण्याची गरज आहे, यावर उद्याच्या भागात.विचार करूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०९/०६/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...