Skip to main content

भोग आणि ईश्वर ५५७

भोग आणि ईश्वर  ५५७ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

या जगतात ईश्वराने मानवाला मनाबरोबर अलौकिक इच्छा आणि त्यासह मनात अमाप शक्तीचं वरदान दिलं. उद्देश हा होता की, या अफाट इच्छाशक्तीच्या बळावर, मानव, दृढ निश्चयाने व अजोड कर्तृत्वाने, ते सर्व आत्म सात करेल, जे एखादा योगी, तपस्वी, ऋषी व मुनी साध्य करू शकतात. खरतर हा साधा विचार कोणत्याही सामान्य माणसाच्या मनात येत नाही की, त्याला जमतं तर मला का नाही जमणार. 

या एका विचाराने अनेक अशक्यप्राय गोष्टी साध्य होऊ, शकतात. पण माया आणि मनाला ओढणाऱ्या इतर अनेक प्रलोभनं, दुःखात व सुखात मन घेत असलेल्या वेगवेगळ्या भूमिका, या देह बुद्धी यांना भ्रमित करून, कर्माच्या चुका करायला भाग पाडतात. पण खरा धोका हा या समजुतीमुळे होती की मला देवाने या देहात मनाप्रमाणे वागण्याचं, जगण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. याचाच अर्थ ईश्वर माझ्या जीवनात कोणतीही दाखल देणार नाही. 

हे तांत्रिक दृष्ट्या जरी खरं असलं तरी, यातील खरा गहन अर्थ माणसाला कधीच लक्षात येत नाही. किंवा लक्षात येतो त्यावेळी, बऱ्याच कर्माच्या गोष्टी हातून घडून गेलेल्या असतात. त्यामुळे त्यांची फळं, समोर एक एक करून यायला सुरुवात होते. परिणामी, ज्यावेळी ही फळं अनिष्ट मनाविरुद्ध, दुःखद असतात, त्यावेळी मन बुद्धीला चुकीचा निष्कर्ष काढायला लावतं

एक गोष्ट कायम ध्यानात राहुद्या की, मन हेच सर्व कर्मांचं प्रेरणास्थान आणि कर्ता आहे. मनातूनच विचार निर्माण होतात. तेच विचार बुद्धी पुढे नेते आणि त्यावर देह कार्य करतो. या सर्वच चक्रात, मन बुद्धी व देह परस्परांना पूरक साथ देतात. अनेक प्रकारची चुकीची कर्म घडतात. नंतर याचे परिणाम, देह बुद्धी व मन यांसह आत्मादेखील भोगतो. कदाचित एखाद्या जन्मातील कर्माच्या परिणामांची जबाबदारी भलत्याच जन्मात, वेगळाच देह व बुद्धी भोगते. 

भोगताना खरतर याचं जन्मातील बुद्धीसुद्धा संभ्रमित होते, हे माझ्यासमोर काय आलं. त्यावर याचं जन्मातील बुद्धी व मन सहसा अविश्वास दाखवतात. तर मग दुसऱ्या जन्मात असलेला वेगळा देह, बुद्धी आणि त्या जन्मातील मन जर अविश्वास वा नाराजी , नक्कीच दाखवू शकतात. कारण संचित, प्रारब्ध हे n मानणारे लोकसुद्धा या जगतात आहेतच. हा सुद्धा एक प्रकारचा भ्रम किंवा मायेचा प्रकार आहे. 

मुळातच जिथे तुमचा जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टीच जिथे आपल्या हातात नाहीत, तिथे मग आपल्या नियंत्रणात काय आहे, असा विचार मनात आल्याशिवाय राहणार नाही. यावर उद्याच्या भागात चर्चा करूया. अर्थातच नामाने आपल्या संचितातील खडतर खडक फोडण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१०/०६/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...