Skip to main content

भोग आणि ईश्वर ५४३

भोग आणि ईश्वर  ५४३ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
 
सद्गुरू प्राप्ती आणि त्यांच्या कृपेचा लाभ, हे मुख्यतः प्रारब्ध, संचित, पूर्वकर्म यांचा परिपाक असतो. मुळातच आत्मा देह बदलत बदलत अनेक जन्मातून,अनेक कर्माच्या गाठी उकलत, पुन्हा नवीन कर्माच्या गाठी बांधत मार्गक्रमण करत असतो. प्रत्येक जीव, याच माध्यमातून व याच मार्गाने जातो.  संचिता तील ठेव ही खूप मोठी जमा पूंजी असते, ज्यावर सध्याच्या जन्मातील काही योग, भोग व उपभोग अवलंबून असतात.  

भोग आणि उपभोग याबद्दल आपण याआधी बोललो आहोत आणि त्याची जाण अनुभवामुळे प्रत्येकाला असेलच. पण योग यासाठी म्हटलं की, काही गोष्टी फक्त योग असेल तरच घडून येतात.त्या सांसारिक वा प्रापंचिक परिणामात बसत नाहीत.  पण त्या जीवनाला कलाटणी किंवा त्यात अमुलाग्र बदल घडवून, आत्मजीवनाला आवश्यक वळण देणाऱ्या असतात.  कारण देह व देहाचे भोग व उपभोग हे नेहमी देहापर्यंतच मर्यादित असतात. आपण ते भोग व उपभोग मनाच्या माध्यमातून, आत्म्या पर्यंत पोचवून, जन्मोजन्मी साठी पुढे नेतो.  (यावर विस्तृत विवेचन नंतर करूया). 

योग ही अशी गोष्ट आहे, ज्यामुळे मनुष्यजन्म, आत्म्याच्या देहातील प्रवासात, काही टप्पे पार करतो. किंवा एखादा महत्वपूर्ण टप्पा पार करून, पुण्यात्मक पायरी पार करून अग्रेशित होतो. अश्या वळणाची वास्तविक प्रत्येकाला आवश्यकता असते. अन्यथा पुनरपि जननं आणि पुनरपि मरणं हेच सुरू राहून, प्रत्येक देहात आत्मा फक्त मागील पानावरून पुढे आपलं आयुष्य नेतो.  

पण यामधे आत्म्यापेक्षा देहाचा मनाचा व बुद्धीचा सह भाग जास्त प्रमाणात असतो. कारण देहातील आत्मा, देहाला चैतन्यत्व देऊन, आयुष्य असेपर्यंत देहाला पूर्णपणे साथ देतो.  पूर्णपणे यासाठी म्हटलं की, देह, मन आणि बुद्धी ही त्रयी मिळून, आत्म्याला कर्मफलाच्या फेऱ्यात गुंतवून, पुढील जन्मात, नवीन देहात, उरलेल्या कर्म फलाचा हिशोब चुकता करण्यासाठी सोडून देतात. पण तरीही कोणत्याही कर्मात, देहात श्वास असेपर्यंत, आत्मा साथ सोडत नाही. या मागे विधात्याची अशी योजना असावी की, मन व बुद्धी यांना हे गमक कधीतरी उकलेल आणि सुधारणा होईल. 

अनेक जन्मात अनेक वेगवगळ्या देहात देह,बुद्धी व मन यांनी केलेले कर्माचे संस्कार फेडण्यात, पुढचे अनेक जन्म निघून जातात. असा हा भोग आणि उपभोग यांचा फेरा आत्मा मनोमय कोषाच्या माध्यमातून, पुढे पुढे नेत असतो. यात चिंतनाचा महत्वाचा भाग म्हणजे, कोणत्या तरी जन्मात कोणत्या तरी देह, बुद्धी व मन यांनी केलेल्या कर्माचं फलित भलत्याच जन्मात, कोणी भलताच देह भोगतो वा उपभोगतो. बरं यात उपभोगाच्या काळात, आपण मायेच्या प्रभावात रत असल्यामुळे, हा कर्म फलाचा पडदा दूर होत नाही.  किंवा आभासी जगतातील खोट्या खोट्या गोष्टींच्या प्रलोभनांच्या जाळ्यामुळे, जाणीवा बंद किंवा लुप्त असतात.  

ही जाणिवांची रंध्र किंवा त्यांच्यावरील मायेची आच्छादनं भोग, दुःख, दैन्य या काळात दूर होतात. पण त्यावेळी अयोग्य विचार केला तर, पुन्हा वेगळ्या भावातील माया, आधीच्या मायेची जागा घेऊन, फसवून चुकीच्या मार्गावर घेऊन जाते. अर्थात ही दुसरी माया नसून, आधीच्या उपभोग काळातील मायेनेच हे प्रसंगोपात बदललेलं रूप असतं. पण या भोग वा दुःख यांच्या काळात, वास्तविक जाणीवा जागृत करून,योग्य मार्ग धरण्याची आवश्यकता असते. म्हणून इथेच व अश्याच ठिकाणी, योग या गोष्टीची आवश्यकता असते. 

यावर अजूनही चिंतन अपेक्षित आहे, पण ते उद्याच्या भागात. अर्थातच तोपर्यंत नित्य नामाचा संकल्प व नेम न मोडणं हे आपलं, देह, बुद्धी व मन या त्रियीचं कर्तव्य आहे, हे लक्षात राहूदे. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२७/०५/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...