Skip to main content

भोग आणि ईश्वर ५५०

भोग आणि ईश्वर  ५५० (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
     
अनेक्षितपणे काही गोष्टी वा घटना आपल्या आयुष्यात आपल्या प्रत्यक्ष प्रयत्नाशिवाय घडून येतात. ज्यामध्ये आपल्या स्मरणा प्रमाणे आपण खास काही केलेलं नसतं. पण कर्मधर्म संयोगाने, काही असं घडतं की आपला काम होण्यासाठी त्या गोष्टीची खूप मदत होते. म्हणजे आपण एखाद्या संकटात किंवा समस्येत किंवा एखाद्या गहन प्रश्नात अडकलेले असतो. त्यावेळी आपल्या प्रत्यक्ष प्रयत्ना शिवाय एखाद्या व्यक्तीची भेट होते आणि 

आपला कार्य सफल व्हायला त्या व्यक्तीच्या क्षणिक भेटीची सुद्धा खूप मदत होते. मी स्वतः अनेक समस्येतून किंवा कठीण काळातून जाताना, अश्या गोष्टींचा अनुभव घेतला आहे. अगदी नोकरी संबंधी समस्येत असताना, अचानक एखादी व्यक्ती लोकल ट्रेन मधे भेटून, एखादा ओळखीचा फोन नंबर देऊन, माझं काम झाल्याचा अनुभव मी एकदा नव्हे तर एकापेक्षा जास्त वेळा अनुभवला आहे. 

नोकरी ही एक उदाहरणार्थ मांडलेली घटना आहे. पण असे कित्येक अनुभव किंवा अनुभूती ज्याला आपण म्हणू शकतो, त्याचा अनुभव आणि लाभ आपल्यापैकी अनेकांनी घेतले असतील. अगदी  जवळची एखादी व्यक्ती आजारी आहे आणि त्याच्या उपचारासाठी, एखाद्या चांगल्या डॉ ची ओळख किंवा तपशील आपल्याला कोणीतरी, सहज भेटी दरम्यान, दिल्याचं नक्कीच आपल्याला लक्षात येईल.

वास्तविक अश्या गोष्टी आपल्या कर्मातील फलाचा भागच असतो. पण तो चांगल्या कर्माचा भाग असल्यामळे, तो योग्य वेळी घडणं हा सद्भग्या योग, आपल्यावरील ईश्वरी कृपेचा द्योतक आहे. म्हणजेच, आपल्या खात्यात पुण्यकर्म असं आणि ते पुण्यकर्म, अत्यंत योग्य समयी आपल्याला उपयोगी पडेल असं घडणं, हा योग नक्कीच विशेष कृपा दर्शवतो. कारण प्रत्येक कर्माच फल हे मिळणार, हे जरी खरं असलं, तरी त्यांचा क्रम आणि त्यांच्या फलांचं साक्षात समोर येणं, हे पुन्हा आपल्याच कर्माफलाचाच परिणाम असतो. 

पण हे असं योग्य वेळी आपल्या चांगल्या कर्माचं प्रकट होऊन आपल्या उपयोगी येण्यासाठी आपल्यावर ईश्वर वा सद्गुरू यांची अमाप कृपा असल्याचं सिद्ध करतं. म्हणजे यातून हे सिद्ध होतं की, आपल्या कर्म फलाचा क्रम काही प्रमाणात बदल्याणाचा अधिकार ईश्वर व सद्गुरू कडे असतो. यामधे पुन्हा एक महत्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे. असा अधिकार वा सिद्धी, ईश्वर वा सद्गुरू का आणि कधी व कसे वापरत असतील. या सर्वांवर दीर्घ चिंतन, उद्याच्या भागात करूया. पण नामाने असा योग साधण्याचा प्रयत्न आपण करतच राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०३/०६/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...