Skip to main content

भोग आणि ईश्वर ४९६

भोग आणि ईश्वर  ४९६ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
  
यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्।
विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।। 

आपण काल पाहिलं की श्रद्धा ही विश्वासाची परिसीमा आहे. म्हणजेच विश्वास हा जेंव्हा शतशः असतो किंवा संपूर्ण असतो, त्यावेळी तो श्रद्धेचं रूप घेतो. वास्तविक अर्थाने आपण एखादी गोष्ट, व्यक्ती किंवा पूजनीय व्यक्तित्व आपल्या अस्तित्वापेक्षाही परम सत्य मानतो, त्यावेळी तिला श्रद्धा म्हटलं जातं. आपण श्रद्धेच्या माध्यमातून आपल्या आराध्याला आपल्याहून भिन्न मानत नाही, त्यावेळी श्रद्धा दृढ झाली आणि मी व आराध्य यात काही अंतर उरलं नाही, अशी दृढता व विश्वास त्यात निर्माण होतो. 

अनेकांना या गोष्टीचा वा भावाचा प्रत्यय त्यावेळी येईल किंवा येतो, जेंव्हा श्रद्धेचा भाव मनातील इतर सर्व भावांना व्यापून उरतो. त्यावेळी श्रद्धा मनातील सर्व केंद्रांवर वा शक्तीस्थानांवर विराजित होते. अर्थात आपल्यातील इतर सर्व भाव, त्या एकाच भावात लुप्त होऊन, एक अलौकिक भाव तयार होतो. अश्या स्थितीला मानव येण्यासाठी स्मरण, शरण व श्रद्धा या त्रिसूत्रीचा दृढतेने अवलंब अत्यंत महत्वाचा आहे. 

या त्रिसूत्रीच्या पालनाचं मूळ, हे भगवंत वचनात आहे. मामेकम् शरणम् व्रज. आता यातील एक म्हणजे कोण हा देखील एक प्रश्न नेहमी निर्माण होतो. त्यावर प्रत्येक जण आपल्या श्रद्धा स्थानाला श्रेष्ठ मानून, त्यालाच तो एक मानतो. ते अनेक अर्थाने सत्य आहे. याचं कारण असं की, ईश्वराच्या कथनानुसार आणि वेद पुराणं यांनी, ज्याप्रमाणे ईश्वराच्या अस्तित्वाचं आणि प्रकटीकरणाचं सत्य मांडलं आहे, त्यानुसार सर्व जीवात तो आहे. 

पण त्या आत्मतत्वाची जाणीव ज्यांना झाली, त्या त्या थोर विभूतींना, साधू संत, भक्तजन यांना, ईश्वर आपल्या हृदयात स्थान देतो. तरीही चैतन्यरूपात त्यांचं अस्तित्व, शिल्लक असतच. दुसरं म्हणजे ईश्वराने हेदेखील सांगितलं आहेच की, मी अनेक रुपात येऊन, प्रकट होऊन, ज्याचा जसा भाव असेल, त्यानुसार त्याला प्राप्त होतो. म्हणजेच ज्याला आपण आराध्य मानलं, गुरुस्थानी मानलं, पूजनीय मानलं, त्या देहात, प्रतिमेत वा व्यक्तित्वात, भक्तांच्या त्या भावामुळे, परम ईश्वर त्या स्वरूपाने प्रकट होऊन, इप्सित व इच्छित देण्यासाठी सज्ज असतो. 

म्हणजेच तोच अनेक रुपात येतो, अनेक देहात राहतो आणि भक्तांच्या इच्छांची पूर्तता करतो. म्हणजेच त्या अनेकात तो एक आहे. किंवा त्या एकातच ते अनेक आहेत. किंबहुना ते भिन्न सद्गुरू, संत, महंत, ऋषीमुनी हे त्याच एकोहं द्वितीयो नास्ती याचं सोदाहरण आहे. किंबहुना असंही म्हणता येईल की, भाव, भक्ती, श्रद्धा, विश्वास जपण्यासाठी तो एकच असलेला ईश्वर, अनेकांना त्यांच्या त्यांच्या आराध्य रुपात प्रकटून त्याना अपेक्षित दिसतो वा जाणवतो.एकप्रकारे हा आभासातून सत्य सांगण्याचा प्रकार आहे. 

अर्थात, तुम्ही कोणत्याही रुपात माझं पूजन करा, स्मरण करा वा शरण येऊन, श्रद्धारुप अंतःकरणाने पहा, तुम्ही इच्छिलेल्या, स्मरलेल्या रुपात मीच असेन. म्हणून मामेकम् शरणम् व्रज. 
अजूनही चिंतन, श्रद्धा आणि भक्ती यावर, उद्याच्या भागात करूया. नामाचं चिंतन नित्य करतच राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१०/०४/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...