Skip to main content

भोग आणि ईश्वर ३२१

भोग आणि ईश्वर  ३२१ 

माझ्या पोस्टला माझ्या नावासकट पुढे नेण्याला माझी काहीही हरकत नाही. 

मुळात मनामध्ये शंका , भीती, काळजी इत्यादी नकारात्मक स्थिती का उत्पन्न होतात,याचं अध्यात्मिक आणि मानसिक कारण आहे, असुरक्षितता. ही असुरक्षितता दोन कारणांनी येते. एक म्हणजे उद्याची चिंता आणि दुसरं म्हणजे मागील गोष्टींच्या जाणीवा. आता यातील, उद्याची चिंता यावर नन्तर चिंतन करूया. पण मागील गोष्टींच्या जाणीवा, म्हणजे नक्की काय, यावर जरा विचार करूया. 

जाणीवा दोन प्रकारच्या असतात. एक जागृत मनातील आणि दुसऱ्या सुप्त मनातील. जागृत मनात, आपण केलेल्या चुका वा प्रमाद इत्यादी, जे ज्ञात व स्मरणात असतं, त्यातून उत्पन्न होणारी भीती किंवा काळजी असते. भीती म्हणजेसुद्धा काय, तर आपण केलेल्या चुकांची आपल्यासमोर येऊ शकणारी, फलं, जी भविष्यात येऊ शकतात, त्यावर मन आताच साशंक होतं आणि काळजी करायला लागतं. 

मुळात काळजी म्हणजे काय, तर समोर काय येईल आणि कोणत्या रुपात येईल, याबाबत शाश्वती नसणं आणि अशी शाश्वती नसल्यामुळे, नकारात्मक विचार करणारं मन आधी अनिष्ट विचार करून, चिंताक्रांत होतं. याचकारणाने स्वास्थ्य बिघडतं. मन हे एक विचित्र इंद्रिय आहे. त्याला सरळ विचार करायला सांगितलं तर ते उलट विचार, आधी करतं. ही गोष्ट बहुतेक जणांच्या  मनाबाबत अशीच असते.यात एखादा अपवाद असू शकेल. अगदी मी मी म्हणणाऱ्या खंबीर मनाच्या व्यक्तीसुद्धा, वेळ आली की, काळजी व चिंता करतात. 

आता या काळजीचं व चिंतेचं एक महत्वाचं कारण, घडू शकणाऱ्या वा घडतील असं वाटणाऱ्या अनिष्ट गोष्टीपेक्षा, त्यांना तोंड देण्याची मनाची व देहाची तयारी नसणं. यामध्ये मूलतः अहं हा स्थायी भाव असतो, ज्यामुळे मला असं काही बघावं वा अनुभवावं लागेल हा अहं जागृत असणं.  या अहं किंवा मी पायी मन, नकारात्मक व अनिष्ट गोष्टींचे अनुभव स्वीकारायला तयार नसतं. म्हणून अश्या स्थितीत ती गोष्ट मन स्वीकारत नाही, ज्यातून,चिंता वा काळजी जन्म घेते. 

या सर्वांमध्ये प्राप्त परिस्थिती न स्वीकारणं, हे मनात मान्य करून, यासाठी मनाची खांबीरता वाढवणं, अत्यंत आवश्यक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट जी, या सर्वांमध्ये जास्त खटकणारी आहे, ती म्हणजे, आपल्याला असं वाटतं किंवा वाटत राहातं की, असं माझ्या बाबत कसं होऊ शकेल. पण यामध्ये आपण एक गोष्ट नेहमी दुर्लक्षित करतो,ती म्हणजे, जर श्रीराम श्रीकृष्ण, ज्ञानोबामाऊली, तुकोबाराय यांसारख्या संतांना जर प्रारब्ध आणि प्रारब्धाचे चटके चुकले नाहीत तर, आपण त्यांच्या तुलनेत खूपच लहान व्यक्ती आहोत. त्यामुळे यात विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे, की अश्या चिंता व काळज्या यावर उपाय काय. 

यावर  उद्या चर्चा करूया. पण नामाच्या धारेने, न्हाऊन निघायचा भक्तियोग साधत राहू. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२६०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१७/१०/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...