Skip to main content

भोग आणि ईश्वर ३१५

भोग आणि ईश्वर  ३१५ 

माझ्या पोस्टला माझ्या नावासकट पुढे नेण्याला माझी काहीही हरकत नाही. 

या सर्वात मनाचा सहभाग आणि कार्य अत्यंत महत्वाचं आहे. कारण त्या इष्ट शक्तीला मनाच्या भावाची भाषा प्राप्त होते, जाणता येते आणि जाणून त्यावर प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद देता येतो. हे कसं, तर कालच म्हटल्या प्रमाणे, मन ही विधात्याने या देहात बसवलेली ती chip व Programne आहे,जी इच्छा, आकांशा यांना coded language मध्ये transmit करू शकते. 

म्हणूनच आपल्याला कायम एक शब्द सांगितला जातो, मनोभावे पूजन , भजन, प्रार्थना, स्मरण किंवा कोणतंही कर्म करावे. यातील मन व मनाचा भाव, हा पूर्णपणे, त्या कर्मात रत, एकाग्र असलाच पाहिजे. कारण ती शक्ती, जी भाषा जाणते वा decode करू शकते ती, मनाची भाषा आहे. याचसाठी म्हटलं जातं, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. ज्या ज्या कार्यात मन ओतलं जातं, त्या त्या कार्यात यश प्रदान करण्यासाठी,  ईश्वरी शक्ती स्वयंमेव सहाय्य करते. म्हणजे मनाच्या पूर्ण सहभागाने सर्व सिद्धी प्राप्त करता येतात, कौशल्य प्राप्त होतं, यश प्राप्त होतं. 

आपण त्या कर्मात मन ओतताना,  मनाने व मनापासून ते कर्म करणं क्रमप्राप्त आहे, अपेक्षित आहे.  पुराणात आपण वाचलेल्या असुरशक्तींनीसुद्धा, मनाने केलेलं तप, त्यांना सामर्थ्य, शक्ती व वर प्रदान करतं झालं. मनाला अजून एक वरदान आहे की ते प्रकट किंवा अप्रकट चिंतन करो, ती इच्छा  वा त्या लहरी इच्छित शक्तीप्रत पोचतात, त्यांच्या मागे जोडलेल्या वा लावलेल्या इच्छेच्या बळावर. यात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, अप्रकट चिंतनातून इष्ट  ईश्वरी शक्तीप्रत आपल्या इच्छा सहज व सुरक्षितपणे पोहोचतात. 

हे कसं, तर आपण खूपवेळा या गोष्टीचा सहज अनुभव घेतला असेल, ज्यावेळी आपण एखादी इच्छा वा प्लॅन, कार्य करण्याआधी, जर कोणाकडे बोलतो तर हा नकारात्मक शक्ती प्रभावाने , त्यावेळी त्या कार्यात विघ्न तरी येतात किंवा कार्यनाश होऊ, शकतो. कदाचित हा अनुभव सरसकट येईल, असंही नाही. पण मुख्यतः काही विशिष्ट वेळी, स्थळी या गोष्टी प्रकट केल्यास, त्या इच्छा फलद्रूप होण्यात बाधा वा अडथळे येऊ शकतात. 

याचं खूप महत्वाचं कारण म्हणजे त्या वेळी, स्थळी किंवा एखाद्याच्या मनात, नकारात्मक व अनिष्ट शक्ती कार्यरत असतात. आता यात त्या अडथळे येण्यात, सदर व्यक्तीचा प्रत्यक्ष हातभार नसेलही, पण या अनिष्ट शक्ती, आपलं उद्देश साध्य करण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न करतात. आपण मागे पाहिलं आहे,या विश्वात धन आणि ऋण असे दोन प्रकारचे भार किंवा बल अथवा शक्ती वातावरणात असतात. 

त्यांचं मुख्य कार्य किंवा निर्मिती ही, विश्वात किंवा ब्रह्मांडात ताळमेळ अर्थात balance टिकवण्यासाठी आहे.  कारण फक्त धन वा फक्त ऋण भार असेल, तर या एकाच प्रकारच्या भाराने, विश्व नष्ट होऊ शकतं. म्हणून दोन्ही भार वा बल असणं गरजेचं आहे. विज्ञान किंवा भौतिक शास्त्र जाणणारे हे समजू शकतील. 

यावर अजून चिंतन करू, पण पुढील भागात. तो पर्यंत नामाने आपल्या मनातील भार धन ठेवण्याचा प्रयत्न करत रहा. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२६०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
११/१०/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...