Skip to main content

भोग आणि ईश्वर ३२७

भोग आणि ईश्वर  ३२७ 

माझ्या पोस्टला माझ्या नावासकट पुढे नेण्याला माझी काहीही हरकत नाही. 

आपण प्रथम स्थितीत फक्त मनाला शांत करून त्याला स्थिर करण्याचा अभ्यास करत आहोत. यामध्ये आणि ध्यानामध्ये मूलभूत फरक हा आहे की, ध्यानामध्ये आपण विचाररहित, अर्थात शून्यात जाण्याचा प्रयत्न करतो. तिथे विचारांना पूर्ण थांबवून, त्यांना आत ओढून, अंतरात्म्यात डोकावून, आतील विश्व पाहण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तिथे हळूहळू विचार स्तब्ध करत करत, शून्यवस्था प्राप्त करायची आहे. 

म्हणजे आतील शांततेचा अनुभव घेऊन, त्या अनुभूती तून, निरव शांततेकडे आपण जातो. हा हळूहळू समाधी कडे जाणारा वा नेणारा असा विलक्षण सुखद अनुभव असतो. पण त्या अवस्थे कडे जाण्यासाठी व जाण्याआधी अनेक पायऱ्यांवरून जावं लागतं.  त्या अवस्थेकडे जाण्याची सध्या गरज नाही. पण आपल्याला मनातील विचारांना, दिशा द्यायची असल्यामुळे,  यातील प्रथम पायरीचा आपण विचार करत आहोत. 

आपण एखादी धून, नाम वा स्वर यांच्या नादावर मनाला हळूहळू एका ठराविक विचारांवर किंवा पातळीवर घेऊन जाणार आहोत. म्हणून आपण विचारांना शांत करत, एकच विचार किंवा एकच दिशा देण्याचा प्रयास करत आहोत. कारण आपल्याला आपल्या मूळ तामसी वा तिखट किंवा रागीट किंवा अस्थिर स्वभावाला नियंत्रणात आणण्यासाठी, हे सर्व करत आहोत. म्हणून यामध्ये सर्वात महत्वाची स्थिती आपण विचारांना नियंत्रित करणार आहोत. 

म्हणून प्रथम स्थितीत, आपण एका नादावर मनाला आणि विचारांना स्थिर करत न्यायचं आणि तिथे गेल्या नंतर, आपण त्या विचारांना विचार करायला लावायचं. म्हणजे नक्की काय तर, प्रथम स्थितीत मनाची गती स्थिर होत आल्यानंतर, त्या हळूहळू शांत होऊन स्थिर झालेल्या मनात, आपणच आपल्याशी संवाद साधण्याचा, प्रयत्न करायचा आहे. यामध्ये, आपण आपल्या मनाला हे विचारायचा प्रयत्न करायचा आहे की, आपण का अकारण उसळी मारतो. मनात मनाला विचारायचं की, अचानक राग यायचं किंवा अविचारी व्हायचं काय कारण आणि गरज, यासाठी आपण स्वतः मनात संवाद साधायचा. 

या संवादात मुख्य ही जाणीव, स्थिर झालेल्या मनाला करून द्यायची की, अविचार करणं किंवा अविचारी कृती करणं किंवा रागाची अचानक उसळी मारणं का होतं. यामागे काय कारण मीमांसा आहे. हे या संवादातून आपल्याला मुळात हे जाणून घ्यायचं आहे की, आपला राग का, कधी येतो, त्याला नियंत्रित कसं करता येईल. मनाला एकदा ही विचार करण्याची सवय लागली किंवा लावली तर, आपण अविचारातून विचाराकडे जातो. याचा खूप मोठा लाभ आपल्या अचानक, अविचारी राग वा क्रोध नियंत्रित करण्यासाठी होतो. यासाठी मनाला स्थिर करून, त्याला विचार करायला लावणं महत्वाचं आहे. कारण अविचार नियंत्रित करण्यासाठी, विचार हे एकमेव उत्तम अस्त्र आहे.  आपलं अविचारी, शीघ्रकोपी, क्रोधीत मन, अश्या पद्धतींने आपण नियंत्रित करून, उत्तम समाधानाचा अनुभव घेऊ शकतो. ज्यांमुळे आपल्याला शारीरिक , मानसिक आणि आत्मिक लाभ मिळू शकेल. 

उद्या पुन्हा अजून पुढे जाऊया. तोपर्यंत आपण नामाचा आपला रोजचा दिनक्रम सुरूच ठेवणार आहोत, कारण त्याचे लाभ अगणित आहेत. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२६०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२३/१०/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...