Skip to main content

भोग आणि ईश्वर ३१४

भोग आणि ईश्वर  ३१४ 

माझ्या पोस्टला माझ्या नावासकट पुढे नेण्याला माझी काहीही हरकत नाही. 

आपण प्रार्थना, अर्चना स्थापना या मागील शास्त्रीय सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी मंत्रोच्चार, आरती, विशिष्ट लयीत प्रार्थना इत्यादी करून, त्याद्वारे प्रतिष्ठापना करतो आणि आपल्या भक्तीला सुरवात होते. मग आपण मनातील भावभावना, इच्छा, आकांक्षा, अपेक्षा देवापुढे, वा त्या सगुण रुपात प्रकट झालेल्या, विशिष्ट दैवी शक्तीपुढे मांडून, एकप्रकारे आवाहन करतो. मुळात या सर्व गोष्टी प्रकट रुपात कराव्यात की नाही हा एक मुद्दा आहे, त्यावर चिंतन करूया. 

आपण बाह्य देहाने अर्थात जिव्हा, वाणी यांनी करत असलेली प्रकट प्रार्थना व अर्चना इत्यादी, कोणीतरी महान व्यक्तींनी आपल्या मनातील भाव कल्पून, त्यांना विशिष्ट शब्दात काव्यात गुंफून, तिला प्रार्थना स्वरूप दिलेलं आहे. त्यातील प्रकट विचार हे बहुतांशी, आपल्या मनातील प्रातिनिधिकच असतात. यावर जे आपल्याला अजून मांडवसं वाटतं, ते आपण व्यक्तिगत नमस्कार करताना, मनात म्हणतोच. हे मनातील प्रकटन आपणच म्हटलं आहे, कुणीही ऐकलेलं नाही, मग हे त्या शक्तीपर्यंत पोचतं कसं, हा मुद्दा अनेकदा मनात येतोच. 

त्या मागचं शास्त्र किंवा शास्त्रीय बैठक ही अशी आहे की, आपण जे वैखरीने किंवा मनात प्रकट करतो, ते लहरि रूपात त्या शक्तीपर्यंत आपल्या मनाच्या इच्छाशक्तीच्या जोरावर पोहोचतात आपण व्हाट्सऍपवर बरेचदा encryption आणि decryption शब्द वाचले असतील. ते विज्ञान याच संकल्पनेवर आधारित आहे. म्हणजे तिथे जसं, आपण व्हाट्सऍपवर type करून post केलेला एक message, समोरील व्यक्तीला, encrypt अर्थात coded language मध्ये जातो. आपल्या messageला coded करण्यासाठीचा programme, व्हाट्सऍप तयार करणाऱ्या कंपनीने, तयार करून, मगच हा अँप आपल्यासमोर आणलेला असतो. 

सदर message समोरच्या व्यक्तीच्या mobile मध्ये पोचल्या नंतर, तो coded message, decode किंवा decrypt होतो म्हणजेच आपल्याला समजेल अशा language व font मध्ये convert अर्थात परावर्तित होतो आणि आपल्याला दिसतो. हेच तत्व अनेक युगां पासून आपल्या मंत्रांच्या बाबतीत आहे. किंबहुना देवाशी किंवा त्या संबंधित शक्तींशी, आपल्या प्रत्येक संवादा बाबत हीच तत्वप्रणाली अस्तित्वात आहे. आपण जाहीरपणे अथवा मनात एखादा विचार वा प्रार्थनारूप, मंत्ररूप संवाद किंवा विचार , त्या शक्तींपुढे मांडतो, त्यावेळी तो, लहरींमध्ये परावर्तित होतो. 

त्या विशिष्ट शक्तीकडे, आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर, तो विचार वा संवाद, पोहोचतो. तो विशिष्ट कंपनलहरींचा संदेश तिथे पोचल्यावर, तो त्या शक्तीतील चेतना जागृत करतो. त्या शक्तीला जागृती आल्यावर, त्यावर काय प्रतिसाद द्यायचा, यावर त्या शक्तीकडून चिंतन झाल्यावर, आपल्याला प्रतिसाद अनेक स्वरूपात मिळू शकतो. एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. 

आपण एखादी व्यक्ती, वस्तू वा नोकरी किंवा तत्सम काही प्राप्त व्हावं, यासाठी मनातून व मनापासून इच्छा व्यक्त करतो. त्या इच्छेसाठी व इच्छेनुसार कर्म करतो किंवा बल त्या इच्छेला दृढनिश्चय रुपात आपण देतो. कदाचित याचा उचित परिणाम असेल, एखादी व्यक्ती, जी त्या कार्याला गती देईल, ती आपल्याला भेटते. अर्थात पुढे कार्य होईल की नाही, हे प्रारब्ध आणि साधना यातील संघर्षावर अवलंबून आहे.त्यावर आपण नन्तर चिंतन करू. 

तर हे coding आणि decoding स्वरूपातील, त्या शक्तींशी आपला संवाद, हा मुख्यतः मनावर किंवा मनाच्या प्रबलतेवर अवलंबून आहे किंवा असतो. कारण ते मनच, या सर्वातील ती मुख्य chip आहे, जी आपले विचार codify करून transmit करते. आता हे coding कसं असावं, जेणेकरून आपले विचार व इच्छा योग्य पध्दतीने transmit होईल, यावर उद्या विचार करूया. पण नामाच्या माध्यमातून, इष्ट शक्तीप्रत, आपली इच्छा पोचवण्याचं आपलं व्रत आपण सुरूच ठेवूया. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२६०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१०/१०/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...