Skip to main content

भोग आणि ईश्वर ३३३

भोग आणि ईश्वर  ३३३ 

आपल्या आयुष्यात आपल्या मनःस्थितीत बदल किंवा बरेचवेळा आमूलाग्र बदल व्हायला, एखादी, घटना, परिस्थिती, दुर्भाग्य किंवा सौभाग्य, एखादी प्रचंड लाभ किंवा प्रचंड हानी, इत्यादी महत्वपूर्ण गोष्टी कारणीभूत होतात. म्हणजेच ज्यावेळी मनाला एखादा झटका अर्थात शॉक बसतो, त्यावेळी त्या धक्क्यातून मनातील सर्व शक्तिकेंद्रे व बलस्थानं यांना धक्का लागतो, किंवा दिला  जातो. 

बरेचवेळा असे प्रसंग हे आत्मपरिक्षा पाहण्यासाठी असतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. असे अनेक साधक, ऋषीमुनी, भक्त, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, चिकित्सक, चिंतक आहेत, जे अपघाताने त्या त्या क्षेत्रात आले आणि त्या योगे त्यांनी महान कार्य घडवलं. म्हणजेच विधात्याची, त्यांना त्या क्षेत्रात, कार्य घडवून आणण्याची इच्छा असावी. यात दुसरी बाजू म्हणजे, त्यांचा मागील संचिताचा व प्रारब्धाचा आलेख वा लेखाजोखा तसा असावा की, असं अलौकिक कार्य, त्यांच्याच हातून घडावं. 

या सर्वांमागची प्रेरणा, त्यांच्या आतील आत्मशक्तीत वसलेली, विश्वाप्रेरणा व विश्वनाथाची शक्ती, हीच असणार, असं म्हटलं जातं की, या भूतलावरील म्हणजेच या पृथ्वीवरील सर्व कार्याची शक्ती, कार्याचा ओज व कार्याची कारकशक्ती ही विधात्याने कैलासावर स्थापित केली आहे. ज्याला जनसामान्य आदीदेव, शंकर इत्यादी अनेक नामांनी संबोधून, पूजन करतात. पण कोणत्याही नावाने पूजलं, तरीही यामागे, विश्वापलीकडे राहून, विश्वावर नियंत्रण करणारा, एकच असूनही, अनेक रुपात प्रकट झालेल्या या शक्तीची ही योजना आहे. 

या पंचमहाभूतरुप जगतात, शक्तीचा, अध्यात्माचा, वृत्तींचा, स्थितींचा, परिस्थितीचा, ओज, तेज, स्थिरता, प्रेरणेचा, योजनेचा समतोल,ताळमेळ अर्थात balance बिघडतो, त्या त्यावेळी,या जगतात अस्तित्वात असलेल्या या शक्तीकडून, ढासळलेला हा तोल सुरळीत करण्या साठी,त्याचप्रमाणे, विश्वाची गती सुरळीत पणे चालण्या साठीची प्रेरणा, योजना व शक्तिपात वा शक्ती प्रभाव दाखवून, विधात्याला इच्छित असलेल्या  विश्वयोजनेला गती देण्याचं कार्य, या कैलासवरून चालतं. 

आताच्या भाषेत सांगायचं तर, विश्वाबाहेरील मुख्य शक्ति केंद्रांचं, या भूतलावरील, हे स्वयंचलित व स्वयंनियंत्रीत असं sub station आहे. ज्याद्वारे, विश्वनियंत्याकडे या भूलोकीचा सर्व वृत्तांत व लेखाजोखा, इतिवृत्त, रिपोर्ट पोचतो आणि विधात्याच्या पुढील कित्येक शतकाच्या योजनांचा मसुदा प्राप्त करून, त्यांना कार्यरत करणं व त्याचं सूत्रबद्ध नियोजन व परिचालन करवून घेण्यासाठी सर्व देखरेख ठेवणं हे नित्य कार्य ही शिवशक्ती करते. 

आता आपण विचार करू की, मग शिवशंकरासोबत असणारी देवी पार्वती ही कोण आहे. तर याचं उत्तर आहे की, आपण आधुनिक व वैज्ञानिक जगतात पाहतो की, प्रत्येक शक्तिकेंद्राला एक वा अनेक पॉवर स्टेशन्स किंवा सबस्टेशन्स असतात, जी त्या मुख्य शक्तिकेंद्राला ऊर्जा व बल प्रदान करून कार्यरत करतात. म्हणूनच ज्या ज्या वेळी अतिरिक्त शक्तीची व बलाची आवश्यकता असते, त्यावेळी गरजेनुसार या शक्तीचा उपयोग उपयुक्तपणे केला जातो व विश्व तारणार्थ रणांगणात उतरवलं जातं. 

ही शक्तीरूप स्टेशन व त्याची supportive सिस्टिम स्वयंचलित असल्यामुळे, विश्वाबाहेरील शक्तीला, या विश्वाच्या घडामोडीत दैनंदिन लक्ष घालावं लागत नाही. किंवा या शक्तिकेंद्राच्या माध्यमातून सर्व वृत्तांत सूत्रबद्ध रित्या आणि विस्तृतपणे म्हणजे क्षणाक्षणांचा वृतांत बाहेरील मुख्य शक्तिकेंद्राला प्राप्त होत असतो. कदाचित इंद्र,  मृत्यूयोजना, चित्रगुप्त इत्यादी संस्था सुद्धा, ज्यांना लोकपाल संबोधलं गेलं आहे, ते येथूनच सर्व वृत्तांत तपशीलवारपणे प्राप्त करून, आपलं आपलं नेमून दिलेलं कार्य करत असतील. 

कर्माची नोंद, त्याचा लेखाजोखा हे सर्व इथूनच, प्रत्येक जीवाच्या लेखपटलावर किंवा ललाटपटालावर अंकित करण्याचं काम या केंद्राद्वारे होत असावं. यावर उद्या विस्तृत चिंतन पुढे सुरू ठेवू, कारण विषय गहन आणि मोठा आहे आणि मनात आणि जाणिवात मंथन व चिंतन घडवणारा आहे. पण आपण नामातून आत्मचिंतन साधण्याचा आपला नेम सुरूच ठेवूया.  

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२६०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२९/१०/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...