Skip to main content

भोग आणि ईश्वर ३१०

भोग आणि ईश्वर  ३१० 

माझ्या पोस्टला माझ्या नावासकट पुढे नेण्याला माझी काहीही हरकत नाही. 

मनाचा एक गुण आहे, एकदा एखादा नाद, छंद लागला की,तो जोपासत जायचं आणि त्याचीच कास धरायची. म्हणजे तेच चिंतत आणि कर्मत जायचं. सहसा मन दुःख, भोग, अनिष्ट फल यांच्या प्राप्तीच्या भीतीत वावरतं.  काही काळानंतर मनाचा तो एक छंद होऊन जातो. कोणत्याही गोष्टीत प्रथम नकार आधी विचारात आणायचा. अश्या साशंक मनाने केलेली कामं, पूर्ण परिणाम वा फल दाखवत नाहीत वा देत नाहीत. 

कारण, आपण मागे पाहिलं त्याप्रमाणे, मनाचा हा सर्व खेळ वा कारभार, लहरींवर चालतो. किंबहुना सर्व जगत अगदी ब्रह्मांड हे, या लहरींच्या आधारावर चालतं. वास्तविक विज्ञानाने या लहरीचं कार्य, महत्व व कार्यक्षमता गेल्या शंभर ते दीडशे वर्षात जाणली आहे आणि उपयोगात आणली आहे. दूरध्वनी, तारा, भ्रमण ध्वनी, उपग्रहाद्वारे संदेशवहन, परग्रहावर किंवा दूर अंतराळात पाठवण्यात येणारी यानं अश्या सर्वच गोष्टी लहरींच्या माध्यमा तून हाकारल्या आणि नियंत्रित केल्या जातात. 

पण जगताच्या निर्मितीत ईश्वराने याच लहरींचा वापर करून, किंवा निर्मिती करून,खूप उपकार केले आहेत. मनाची बांधणी व कार्यप्रणाली ही, लहरींवर आधारित ठेवून, वास्तविक विधात्याने संपूर्ण ब्रह्मांडाला उपकृत केले आहे. म्हणून तर मन , मनात आणलं तर अलौकिक गोष्टी साध्य करू शकतं. आपण मागे चिंतन केलं त्याप्रमाणे, ज्या प्रकारच्या लहरी  मनातून निर्माण होतात, त्याप्रकारचं कार्य प्रत्यक्षात होतं आणि त्या प्रकारचं फलित समोर येतं. 

कारण ऊर्जा, बल, तेज हे सर्व लहरींच्यामार्फत आणि त्याच प्रेरणेने कार्य करतात. म्हणजे जर साशंक हेतूने किंवा ज्याला half heartedly म्हटलं जातं, तसं काम करायला गेलं, तर परिणाम वा फल त्याचप्रमाणे प्राप्त होतात. म्हणूनच कोणताही संदेह, शंका, गैरहेतु मनात धरून, कोणतंही कार्य करू नये. आपण पौराणिक कथां मध्ये वाचलं आहेच की , अगदी असुरांनी सुद्धा दृढनिश्चय भावाने तप व साधना केली, त्यावेळी, त्यांनाही, त्याचं फल, वरदान वा सिद्धी यारूपात, प्राप्त झालं. अर्थातच त्यांनी त्याचा दुरुपयोग केल्यामुळे, शेवटी त्यांचा नाश झाला, हा भाग वेगळा. त्याचं कारणसुद्धा कर्मफल हेच देता येईल. 

म्हणूनच परिणाम व भोग यांच्या भीतीने आपण आपल्या सद्य कर्मांची बेरीज चुकवून, संचितातील जमा कमी करून, देय मात्र वाढवत नेतो. मुळात, भोग वा दुःख जर येणारच आहे आणि त्याच्या वेदना, ज्यावेळी ते घडेल तेंव्हा आपल्याला सहन कराव्याच लागतील, तर आता त्याच्या भीतीच्या  विचारांचा त्याग करून सद्य कर्म व्यवस्थित घडवत जावं. संचितातील भोग व दुःख सहन करण्याची व त्यातून पार पडण्याची शक्ती, ऊर्जा मिळण्या साठी प्रयत्न वा त्यासाठीची जमा आज नक्कीच मिळवू शकतो. 

ते करण्याचं सर्वात मोठं साधन म्हणजे अत्यंत सकारात्मक भावनेने ईश्वर, जो अंतःकरणाने अत्यंत दयाळू व प्रेमळ आहे आणि विश्वाची जननी आहे, त्याचं सतत स्मरण. असं स्मरण करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे लहान मूल जसं, काही त्रास झाला, दुखलं, खुपलं वेदना झाली, भूक लागली की, आईला बोलावतं, त्याप्रमाणे आपण विश्वाच्या मातेचं स्मरण केलं पाहिजे. 

लहान मुलाच्या बाबतीत जसं, त्या मुलाचं दुःख आई भोगू शकत नाही किंवा कमी सुद्धा करू शकत नाही, पण त्यावर मायेची, स्नेहाची फुंकर मारून,होणाऱ्या वेदनांचा मानसिक त्रास नक्कीच कमी करू शकते. त्याचप्रमाणे ईश्वर त्याच्या परीने, सहाय्य करून, आपल्याला परिणामांच्या, भोगांच्या व दुःखाच्या वेदनेतून, नक्कीच मानसिक आधार देऊ शकतो. त्याच आधारा वर आपण सद्य कर्मात गफलत वा चूक होऊ देऊ नये, या एकमेव उद्देशाने ईश्वर नक्कीच सहाय्यभूत होऊ शकेल. 

याच्या पुढील चिंतन उद्या पाहूया. तोपर्यंत आपल्या नामयज्ञाच्या वेदीवर नामाच्या आहुती देतच राहू. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२६०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०६/१०/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...