भोग आणि ईश्वर ३११
माझ्या पोस्टला माझ्या नावासकट पुढे नेण्याला माझी काहीही हरकत नाही.
खरतर मनाच्या अनेक स्थिती आहेत. म्हणजे शांत, गंभीर, धीरगंभीर, मृदू,कणखर, राकट, तिरकस, इत्यादी अनेक. हे झाले स्वभावविशेष. पण हे स्वभावविशेष माणसाच्या मनाचं बाह्य प्रकटीकरण आणि त्याचं प्रत्यक्ष स्वरूप वागण्यातून प्रकट करतं. इच्छा सर्व प्रकारच्या स्वभावाच्या माणसांची, सुखाकडे जाण्याची वा सुख प्राप्तीचीच असते. कोणीही कधीही दुःख मिळावं म्हणून कर्म करत नाही किंवा आयुष्य जगत नाही.
म्हणजेच जर सर्वांचा उद्देश एकच आहे अर्थात मनात एकच उद्देश धरून सर्व काम करतात वा पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, तरीही प्रत्येकाचा स्वभाव व वागणूक एक नसते. उदाहरणार्थ प्रत्येक जण परीक्षेत अव्वल क्रमांक मिळावा म्हणून कष्ट घेत नाही आणि जे घेतात, त्यामध्ये काही अव्वल येतात, बाकीचे त्या खाली येतात. म्हणजे मनात फक्त इच्छा असून भागत नाही. किंवा मनातील इच्छा फलद्रूप होण्यासाठी इच्छाशक्ती दांडगी आणि त्यानुसार कर्म असणं अत्यंत जरुरी आहे.
मानवी स्वभाव हा सकार आणि नकार या आत्मकातून आकाराला येतो, हे आपण पाहिलं आहे. पण कर्म करण्यासाठी त्यामागे मनाचा सकारात्मक सहभाग हा अत्यंत गरजेचा आहे. अव्वल ते नापास या मधला फरक हा कर्मातील या मनाच्या सकारात्मक व पूर्ण सहभागावर अवलंबून आहे. कारण नुसते प्रयत्न हे पुरेसे नसून त्यात मनाचा पूर्ण सहभाग गरजेचा आहे. किंबहुना ती पहिली पायरी आहे. असाच सहभाग जर असेल तर असाध्य ते साध्य आणि अशक्य ते शक्य होऊ शकतं किंवा शक्य करता येतं.
या संपूर्ण सहभागासाठी एखादी गोष्ट मनाला पूर्ण मान्य असणं आणि त्याबाबत मनात कोणत्याही प्रकारचा संदेह, शंका, किंतु असता कामा नये. म्हणजेच सहभाग पूर्ण मिळवण्यासाठी मनाला एखाद्या विषयातील पूर्ण ज्ञान असणं किंवा देणं ही यामागील पहिली पायरी आहे. जर एखाद्या विषयातील ज्ञान पूर्ण असेल, तर ती गोष्ट करू शकणारा वा इच्छिणारा ते पूर्ण ज्ञानाने व समजून पूर्ण एकाग्रतेने करेल.
अश्याप्रकारे ज्ञान देण्याचं एक मोठं उदाहरण म्हणजे विषादग्रस्त अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करण्यासाठी श्रीकृष्णानी, जगातील सर्वात शुद्ध आणि समस्त जगताच्या कल्याणाचं ज्ञान, प्रदान करून, त्याची मनोभूमिका पूर्ण तयार केली. त्याला जन्मो जन्मीची कर्मगती, ती फलद्रूप होण्यासाठी जन्मांची साखळी, ती साखळी तोडण्यासाठी काय केलं पाहिजे, त्यातून कायमस्वरूपी सुटका करून मोक्ष प्राप्तीसाठी भक्ती, संपूर्ण शरणागती पर्यंत सर्व ज्ञान त्याच्या मनातून आत्म्या पर्यंत उतरेल याची पूर्तता करून, मगच त्याला युद्धासाठी सक्षम मनःस्थितीत आणून, पुढील सर्व कर्म त्यांच्यामार्फत करवून घेतलं.
यात अजून एक गोष्ट जी खरी महत्वाची आहे, ती म्हणजे जेंव्हा आपण पूर्ण ज्ञान मिळवून, प्रत्येक कर्म पूर्ण झोकून देऊन आणि सद् इच्छेने करत गेलो, तर ज्याप्रमाणे अर्जुनासह युद्धात डावपेच टाकून, अनितीने वागणाऱ्या सर्व प्रमुख कौरवांना कारस्थानं करून यमसदनी धाडलं. म्हणजेच आपली एखाद्या कार्यातील मनाची गुंतवणूक जर ज्ञान व जाणीवा या माध्यमातून संपूर्ण असेल तर, जगतपिता स्वतः आपल्या पाठीशी उभा राहतो. पण त्यासाठी आवश्यक ज्ञान कर्म आणि भक्तीरुप समर्पण असणं अत्यंत महत्वाचं आहे.
उद्या यापुढे चिंतन करूया. पण नामरूप ज्ञानाचा दिवा अखंड लावून समर्पणाची ज्योत तेवतच ठेवूया.
भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. पेमेंटसाठी नं. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२६०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.
आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०७/१०/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
Comments
Post a Comment