Skip to main content

भोग आणि ईश्वर ३३५

भोग आणि ईश्वर  ३३५ 

संपूर्ण विश्वाच्या, ज्ञान व विज्ञान यांची विस्तृत माहिती, आपण कालच्या भागात घेतली. त्यावरून एक गोष्ट नक्कीच लक्षात आली की, लहरी व तरंग यावर आधारित सर्व व्यवस्था तयार करून, त्यातूनच या विश्वाचं सूत्र संचालन, विश्वाची नियंत्रकशक्ती या विश्वातील अणूरेणूंवर नियंत्रण ठेवून, त्याचा क्षणाक्षणांचा डेटा अर्थात तपशील वार माहिती जमा करून, त्याचा सर्व हिशोब ठेवते. 

हा सर्व हिशोब कर्माच्या माध्यमातून, सुत्रबद्धतेने टिपून घेतला जातो. त्याचा व्यक्तिगत पातळीवर ताळेबंद मांडला जातो. प्रत्येक पुढील जन्मांसाठी तो हिशोब, संचिताच्या माध्यमातून  प्रवाही राहून, त्यात भर किंवा घट प्रत्येक क्षणक्षण होत असते आणि ती नोंदली जाते. पण ही सर्व माहिती इतक्या सूत्रबद्ध रीतीने मिळवून,  नोंदवून ठेवली जाते व प्रत्येक देहाच्या आत स्थित आत्म्याच्या प्रवासात ती अगदी योग्य पद्धतीने उपयोगात आणली जाते. 

त्यासाठी कर्मफल साखळी आणि त्याची समिकरणात्मक रचना विधाता करू शकतो, त्याअर्थी विधाता हा खूप मोठा वैज्ञानिक आहे, ज्याने, या विश्वाची, अशी काही रचना  केली आहे की, या सर्वांतून जाणारा प्रत्येक जीव, जोपर्यंत कर्माची साखळी तोडून पुढे जात नाही, तोपर्यंत तो जीव या चक्रातून बाहेर पडू शकत नाही. 

यासाठी ज्ञान अर्थात जाणिवांची जागृती, निष्काम कर्म अर्थात कर्मांच्या साखळीतून बाहेर काढणारं कर्म आणि भक्तीरुप शरणागती व अर्पण या माध्यमातून त्या ईश्वरी, विश्वात्मक शक्तीकडे पुन्हा परत जाण्यासाठी किंवा त्या शक्तीला प्राप्त करण्यासाठी, आपण प्रोत्साहित झालं पाहिजे किंवा व्हावं यासाठी, तीच शक्ती प्रेरणा व बल देते. पण या सर्वांची वैज्ञानिक मांडणी करताना जशी टॉवर आणि पॉवर स्टेशन्स असतात, तशीच व्यवस्था विधात्याने निर्माण केली. 

त्यापैकीच या भूतलावरील व्यवस्था कैलासावर करण्यात आलेली आहे. हे एक पॉवर स्टेशन आणि रिले ट्रान्समीटर आणि तत्सम व्यवस्था ज्ञान व विज्ञान या दोन्ही स्वरूपात अस्तित्वात आहे. याचं कार्य हे एखाद्या मोबाईल टॉवर प्रमाणे सुसूत्रपणे युगानुयुगे होत आहे. म्हणजे आधुनिक विज्ञानाप्रमाणे कार्यक्षम व कार्यरत आहे. 

याच्या कार्यासाठी जी मांडणी करण्यात आली आहे, त्यातील खूप महत्वाचा घटक अर्थात शिव पार्वती या रुपात या जगताच्या कारभाराला जाणून, याला एक सूत्रीय पद्धतीने चालवून, त्याला कर्मफल स्वरूपातून नियमित करत, प्रत्येक जिवात्म्याला अंती त्याच ठिकाणी अर्थात कैलासावर जाऊन, पुन्हा पुढील प्रवासा साठी याच जीवनचक्राचा भाग व्हावं लागतं. कदाचित प्रत्येक मृत देहातील जीवाला कैलासवासी, उगाचच म्हटलं जातं नसावं. 

त्यामागे हीच विश्वाच्या चैतन्यशक्तीची सबस्टेशन व्यवस्था किंवा सप्त स्थानकातील, एक स्थानक म्हणता येईल. येथून कदाचित पुढील व्यवस्थेसाठी किंवा पुन्हा मागील प्रवासासाठी जीवात्मा धाडला किंवा परतवून दिला जातो. त्यासाठीची, या ग्रहावरील स्थानिक व्यवस्था म्हणून या कैलासकडे पाहता येईल. कदाचित जोपर्यंत गोष्टी इथून नियंत्रित करण्यायोग्य असतील आणि येथून जगताची सूत्र हलवली जाऊ शकतात, तोपर्यंत विश्वा त्मक शक्ती कधीही स्वतः या जगतात दखल वा हस्तक्षेप करत नाही. कारण त्याप्रकारचं रेपोर्टिंग सिस्टीम या दोन स्टेशन्स मध्ये असणार. 

यावर अजूनही विस्तृत विवेचन उद्या करूया. पण तोपर्यंत आपण त्या विश्वात्मक शक्तीला साद घालत राहूया, नामाच्या माध्यमातून. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२६०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
३१/१०/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...