Skip to main content

भोग आणि ईश्वर ३०९

भोग आणि ईश्वर  ३०९ 

माझ्या पोस्टला माझ्या नावासकट पुढे नेण्याला माझी काहीही हरकत नाही. 

मन हे परिणाम या गोष्टीला खूप घाबरतं. मुळात मराठीत एक म्हण आहे, कर नाही त्याला डर नाही. म्हणजे आपण कर्म योग्य करत असू, तर परिणामांची आपण भीती बाळगायचं कारण नाही. पण तरीही मन घाबरतं. काल म्हटल्याप्रमाणे याचं मुख्य कारण, भीती अनिष्ट, चुकीचं आणि दुःखकारक व भोगप्रद घडण्याची शाश्वती किंवा चांगलं घडेलंच याची अशाश्वती हे आहे. म्हणजे आपलं जीवन हे शाश्वती व अशाश्वती या दोन बिंदूंभोवती फिरत असतं. 

या दोन केंद्रांमध्ये ज्या घटना घडतात किंवा जे अनुभवायला मिळतं, त्यावर आधारित मानसिकता, बहुतांश लोकांची तयार होते. या सर्वांनी मन संवेदनशील वा अतिसंवेदनशील होतं. पण हा विचार वा आधार घेऊन किंवा गृहीत धरून केलेली वाटचाल, अप्रत्यक्षपणे त्रासदायक आहे. अश्या मिश्र विचारांना नियंत्रणात ठेवून, त्यांना सकारात्मक करायला किंवा वळवायला अनेक गोष्टी आहेत. त्यावर मागे पण आपण विस्तृतपणे विचार केला आहे. पण गेल्या काही भागात आपण बघत असलेल्या चेंडूच्या उदाहरणाकडे पुन्हा वळूया. 

आपण फेकलेला प्रत्येक चेंडू भिंतीवर आपटून परत येईल किंवा समोरील व्यक्ती त्या चेंडूला झेलेलं. ही झाली अशाश्वती. पण त्याला अश्याप्रकारे फेकावं, जेणेकरून जरी तो झेलला गेला तरी किंवा भिंतीवर आपटून परत आला तरी योग्यप्रकारे किंवा इष्ट परिणाम देईल. म्हणजे प्रत्येक कर्म एका विशिष्ट हेतूने करून, येणाऱ्या परिणामांची शाश्वती वाढवायची, ही झाली साधना. म्हणजे मुळात साधनेचा आटापिटा वा उद्देश हा परिणाम शाश्वत होण्यासाठी आहे. 

अर्थातच याचा अर्थ असा होतो की, साधना ही,  काही परिणाम येऊच नये, यासाठी नसून, घडणारे इष्ट किंवा शुभफलदायी घडेल वा घडावं यासाठी आहे, हे प्रथम ध्यानात घ्या. म्हणजेच आपण एखादं साधन ज्यावेळी करतो, त्यावेळी त्यात मनातील संकल्प काय आहे आणि मनाचा सहभाग कसा आहे, हे बघणं महत्वाचं ठरतं. आपण एका विशिष्ट क्षणी एखादी साधना किंवा काही स्तोत्र मंत्र, इत्यादी विधी करून चांगल्या गोष्टी घडाव्या हा हेतू मनात ठेवतो. 

पण याआधी जे घडलंय त्यापैकी ज्या कर्माची फल बाकी आहेत, ते येईल व ते स्वीकारावं लागेल, ही मानसिक तयारी असणं खूप महत्वाचं आहे. अन्यथा खूपवेळा असं घडतं की, आपण खूप तयारीने काही साधन करतो, एक विशिष्ट हेतू मनात धरून आणि त्याचवेळी किंवा त्यानंतर काही काळात लगेचच. आपण लगेच उलट विचार करतो की, बघा देवाचीच इच्छा नाही मी काही करावं. अशा विचार करून, आपण लगेचच सुरू केलेले प्रयत्न थांबवतो किंवा साशंक मनाने करतो. मनाच्या सिद्धांता प्रमाणे ते साशंकतेने केलेल्या गोष्टीचे उचित परिणाम देत नाही आणि देणारही नाही. म्हणून कर्म करताना आणि साधना करताना योग्य विचार असणं गरजेचं आहे. 

यावर अजूनही सखोल चिंतन अपेक्षित आहे. ते उद्याच्या भागात पाहू, पण दृढ इच्छेने आणि सकारात्मक मनिषेने आपलं नाम स्मरण सुरूच राहूदे. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२६०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०५/१०/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...