Skip to main content

भोग आणि ईश्वर ३२६

भोग आणि ईश्वर  ३२६ 

माझ्या पोस्टला माझ्या नावासकट पुढे नेण्याला माझी काहीही हरकत नाही. 

आपण मनाला शांत, संयमित करून, त्याद्वारे आपला स्वभाव वा स्वभावातील दोष दूर करण्याच्या प्रयत्नांचा अभ्यास करत आहोत. यामध्ये आपण, पहिली स्थिती पहिली, ज्यामध्ये आपण एखादं लक्ष ठेवून, किंवा एखादी धून, नाद वा स्वर यांच्या माध्यमातून एकाग्र होण्याचा प्रयत्न करत आहोत. हा अभ्यास करताना, काल म्हटल्या प्रमाणे, हा अभ्यास, फार कमी वेळासाठी सुरू करून, हळूहळू वाढवत न्यायचा. 

हे लिहिताना इतकं सहज लिहिता आलं, तरी करताना इतकं सहज जमेलच असं नाही. यात मुख्य अडचण ही मनाकडूनच निर्माण केली जाते किंवा येत जाते. कारण माणसाचं मन ही या जगतात अस्तित्वात असलेली,सर्वात चंचल अशी गोष्ट आहे. एक क्षण सुद्धा ते थाऱ्यावर रहात नाही किंवा एका जागी स्थिर राहू शकत नाही. आता ही अशक्यता, शक्य करणं, हे तुमच्या स्वतःच्या दृढ निश्चया वर अवलंबून आहे. 

ज्या मनाला आपण एकाग्र करणार आहोत, त्याच मनाच्या निश्चयावर आपण, हा अभ्यास सुरू करणार आहोत. थोडं विचित्र वाटेल, विचार करायला. पण यात एक गोष्ट ध्यानात ठेवा की, या प्रक्रियेत, विवेक विचार आणि ईश्वर वा गुरुकृपा हे घटक आपल्याला सहाय्य करतात. प्रथम निश्चय हा गंभीर असावा, त्यात खंबीर असावं. एकदा एखादी गोष्ट करायची, हे ठरलं की, आत्म शक्ती त्यामागे प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचं काम करतं. 

आपण एक उदाहरण घेऊ. शाळा कॉलेजच्या काळात, परीक्षा असताना, खूप वेळा आपण मनाविरुद्ध दृढपणे बसून अभ्यास केला असेलच. त्यावेळी आपण नक्कीच आपल्या मनाविरुद्ध जाऊन, कार्य करून, उत्तम अभ्यास करू शकलो वा केलाय. मग तोच विचार वा उदाहरण मनात धरून आपण हा अभ्यास सुरू करू शकतो. म्हणजे जर निश्चय केला आणि गंभीरपणे, पाठपुरावा केला तर, आपण नक्कीच पहिल्या स्थितीला पार करू शकतो. 

या मध्ये आपण, काही सेकंद ते काही मिनिटं, इतका काळ जरी एकाग्र होण्याचा प्रयास केला आणि त्यात आपल्याला यश प्राप्त झालं तर,आपण नक्कीच, यातील पुढील स्थितीकडे वळू शकतो. यामध्ये, अभ्यासाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे मनाला शांत व स्थिर करणं, हा मुख्य हेतू आहे वा असला पाहिजे.कारण नुसतं बसून आपण साध्य काय करायचं, हे माहीत नसेल तर, सर्व प्रयत्न व प्रयास व्यर्थ असतील. म्हणून प्रत्येक स्थितीला ध्येयनिश्चिती असलीच पाहिजे. 

ज्याला टार्गेट म्हणतात ते नसेल तर देहाला, बुद्धीला व मनाला आपण कार्याला का लावायचं, हे समजणार नाही आणि समजलं नाही तर जमणार नाही. म्हणून प्रथम स्थितीत आपलं अंतिम ध्येय हे मनाला शांत आणि स्थिर करणं, हे असणार आहे. यामध्ये खूप महत्वाची गोष्ट,जी इतर एकाग्रता साधण्याच्या  अभ्यासात,केली जाते,जी इथे टाळायची आहे, ती म्हणजे, इथे आपल्याला विचार रहित वा शून्य स्थितीला जायचं नाही. किंवा ते आपलं, लक्ष्य नाही व नसेलही. सहसा शून्य स्थितीचं लक्ष हे ध्यान धारणा इत्यादी मध्ये आहे. पण इथे आपल्याला विचारांना मार्गस्थ करायचं आहे किंवा ज्याला आपण channalise करणं म्हणतो ते करायचं आहे. 

म्हणून हे करताना, प्रथम स्थितीत, आपण काय काय काळजी घ्यावी किंवा घेतली पाहिजे, काय काय लक्षात ठेवलं पाहिजे, यावर उद्या विचार करूया. पण आपला नामाचा अभ्यास, प्रयास व कर्म नित्य सुरू ठेवूनच. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२६०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२२/१०/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...