Skip to main content

भोग आणि ईश्वर ३०६

भोग आणि ईश्वर  ३०६ 

माझ्या पोस्टला माझ्या नावासकट पुढे नेण्याला माझी काहीही हरकत नाही. 

असा हा चेंडूच्या उदाहरणावरून आपण जाणलेला कर्मगती, दिशा, त्याचं परतून आपल्याकडे, परिणाम स्वरूप येणं, यांचा हा खेळ म्हणजे आयुष्य आहे. पण हे जाणूनसुद्धा त्यातून बाहेर पडण्याचा व या कर्मफलाच्या कक्षेबाहेर जाण्याचा मार्ग वा विचार आपल्या डोक्यात येत नाही. कारण हे सर्व अंतर्मनावर अवलंबून आहे. अंत र्मनाचा संबंध आत्म्याशी आहे आणि आत्म्याचा संबंध या  मागील सर्व देहांनी जे जे केलं, ते सर्व भोगून संपवणं. 

म्हणजे त्या खेळातील चेंडूप्रमाणेच, त्याला गती व फिरकी देऊन फेकणारा एक आणि त्याला झेलणारा दुसराच, असतो. आता याच्यापुढे जाऊन, पुढचा विचार करूया. एकाने फेकलेला चेंडू दुसरा झेलतो. अर्थात दुसरा जो आहे, त्याला दोन विकल्प आहेत. एक म्हणजे, तो चेंडू झेलून, तसाच, न फेकता, स्वतःकडे ठेवेल किंवा पुन्हा तो फेकेल. हा विकल्प त्याला फक्त मागच्या खेळाडुकडून आलेल्या चेंडूबाबत आहे हे नक्की. 

म्हणजे त्याला जो नवीन चेंडू टाकायचा आहे, त्याबाबत पुन्हा दोन विकल्प आहेत. एक म्हणजे तो चेंडू, स्वतःकडे येईल, या बेताने टाकू शकतो किंवा पुन्हा दुसऱ्याच नवीन खेळाडुकडे, अर्थात नवीन जन्माकडे जाईल, या बेताने टाकेल. म्हणजेच हे कर्माला लागू केलं, तर, फलरूप आलेल्या परिणामांना तोंड देताना, संयत राहून  व संयम  बाळगून तो प्रतिक्रिया देऊ शकतो, जेणेकरून, पुढे कोणत्याही कर्मात बद्धता येणार नाही. त्याच प्रमाणे नवीन कर्म करतानासुद्धा, त्यातून बद्धता निर्माण होणार नाही, याप्रकारे तो कर्म करू शकतो. 

आता बद्धता येणार नाही अशी कर्म करायची, म्हणजे नक्की काय. आपल्या उदाहरणामध्ये, जर समोर भिंतच नसेल, तरच फेकलेला प्रत्येक चेंडू, परत न येता, लुप्त होईल. म्हणजे कर्म तर करायचं, पण त्याच्या परिणामात वा फलात अडकायचं नाही, किंवा त्याची बद्धता येऊ द्यायची नाही.  आपल्या उदाहरणात आपण ३६० अंशात भिंत कल्पूनसुद्धा, पाहिलं की, कर्माबद्धता येतेच, जन्म कोणताही असुदे आणि कर्म कोणत्याही जन्मातील असुदे. 

मग अशी कोणती गोष्ट आहे, ज्यायोगे, कर्म करूनसुद्धा, त्याच्या फलाची बद्धता न येता, मनुष्य जन्ममरण फेऱ्यातून, सुटू शकतो. याचं उत्तर, पदोपदी वेद, उपनिषद शास्त्रपुराणं, संत महंत यांनी देऊन ठेवलं आहे. हे कमी म्हणून की काय, स्वतः भगवंतांनी याचं उत्तर, भगवद्गीतेत दिलं आहे. ते म्हणजे प्रत्येक कर्म हे ईश्वर व सद्गुरू यांना अर्पण करून, करायचं. म्हणजे काय तर त्यांच्या स्मरणात, आपलं नित्य कर्म करत करत राहायचं. 

यातून दोन गोष्टी साध्य होतील. एक म्हणजे कर्म तर घडेल, पण त्याची बद्धता मात्र येणार नाही आणि स्मरण होत राहील. पण हे कसं शक्य आहे. तर, कर्मात असलेलं मन हे ईश्वरी स्मरणात गुंतवून, कर्म त्याच्या स्वाधीन करायचं. म्हणजे असं की, समोर भिंत नसून, प्रत्यक्ष ईश्वर, फेकलेला प्रत्येक चेंडू झेलायला तयार आहे, ही कल्पना मनात योजून, प्रत्येक कर्माचा तो सहभागी आहे, या विचाराने प्रेरित व भारित होऊन, प्रत्येक कर्म हातून घडत जाईल, हे पाहायचं. 

हे कसं काय शक्य आहे, याचा उद्या विचार करूया. पण आपलं नामस्मरण करण्याचं महत्कार्य आपण करतच राहूया. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२६०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्या मुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०२/१०/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...